छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला , सैन्याने औरंग्याची नोकरी केली तर ती वतनदारीसाठी ,

अणि मग भोसले , छत्रसाल वगैरे राज्य करु महसूल गोळा करायचे तीही एक प्रकारे वतनदारीच ना ?

प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे पुस्तक देवळाचा धर्म धर्माचि देवळे ह्यात मुसलमान शासक देवळे का फोडत ह्याचे कारण नमुद केले आहे. पान.५,६पहावे.

http://prabodhankar.org/node/260/page/0/4

<<

प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे पुस्तक देवळाचा धर्म धर्माचि देवळे ह्यात मुसलमान शासक देवळे का फोडत ह्याचे कारण नमुद केले आहे. पान.५,६पहावे.

http://prabodhankar.org/node/260/page/0/4

>>

आणि हिंदु नी मशिदी का फोडल्या याचे विवेचन पान क्र. ?? की फोडल्याच नाहीत?

अणि मग भोसले , छत्रसाल वगैरे राज्य करु महसूल गोळा करायचे तीही एक प्रकारे वतनदारीच ना ?
>>>>

मोगलांनी फेकलेली वतनदारी आणि स्वतःचं स्वराज्य स्थापन करणारे कर्तृत्ववान राज्यकर्ते यातला फरक जर तुम्हाला कळला असता तर काही प्रश्नच नव्हता ना!

तो घोडा बोलो या चतुर, एक पे रैने का जी!
नाव बदलले ते आवडले आहेच पण ते सरळ मान्य करणे जीवावर येते आहे असे एकंदरीत दिसते.

>>>.

मलाही लिहून सरळ मान्य केले आहे की. ह्यात जीवावर येणे ते काय? म्हणजे अजून काही वेगळे असते का मराठीत?

पण आय डोन्ट केअर का लिहिले? तर मी होऊन नाव बदलायलाच पाहिजे ह्या लढ्यात पडलो नसतो. तसे बाफ देखील काढले नाहीत, तो विषय होऊन अनेक दिवस झाले आणि जेंव्हा मयेकर रस्त्याचे नाव का बदलेले ह्यावर पोस्ट लिहित होते तेंव्हा त्यांनाही लिहिले की तो विषय नाही. अजून किती क्लिअर असावे?

औरंगजेब चांगलाच आहे असे लेख यायल्यासुरूझाल्यावर मी ते ट्विट आणि ते पुरावे लिहिले आहेत.

अर्थात दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आकळयुन घ्यायच्या नसतील तर मी काय करू शकतो?

अजूनही नाव बदलायचे का? आय डोन्ट केअर! कोणी बदलले तर आवडेल. झाले असावे क्लिअर बहुदा. Happy

पण मग त्याच्याच परक्या बापजाद्यांनी बांधलेल्या लाल किल्ल्यातून १५ ऑगश्ट्चे भाषण्ही बंद करा >>> Lol

लाल किला हा ऐतिहासिक मॉन्युमेंट आहे. तो खरा इतिहास आहे. कोणत्या रस्त्याचे नाव कधी कुणी बदलले, हा म्हणजेच इतिहास नाही रे भाऊ !!

इथेही आणि बाकी सोशल मिडीयावरही काही लोकांचा जाम गोंधळ झाला आहे. त्यांना वाटते की रोडचे नाव बदलले म्हणजे इतिहास बदलला. किती सरफेसवर ( मे बी उथळ ) त्यांची विचारसरणी आहे.

तुझा नेमका विरोध कशाला आहे ते काही कळत नाही. पण असो विरोध आहे ना म्हणजे झालं तर. दॅट इज इम्पॉरटंट

साती,

माझे सर्व बाफ "उद्देश" घेऊन असतात असे का लिहित आहात? मी वर लिहिले आहे. औरंगजेबाला कसा चांगला आहे हे पोचविण्याचे कार्य काही मंडळी करत आहेत. माझ्या दृष्टिने औरंगजेब हा माणूस असहिष्णू होता. ह्यात नेमका काय उद्देश आहे? हे मांडने गैर आहे का? दरवेळी उद्देश सफल झाला का असे लिहिता, पुढच्या वेळी धागा काढतानाच विचारीन हो ! Happy मे बी उद्याच.

असो कधीतरी आपल्या पूर्वग्रहांना सोडून नेमका विषय काय आहे, (कोण मांडत आहे हे सोडून) ते जर जाणण्याचे कार्य केले तर कदाचित येथील कदाचित विषय कळेलही.

असो कंटाळा आला.

>>> महाराजांकडे मुस्लिम सैन्य का होते?<< असे कितीसे मुस्लिम सैन्य महाराजांकडे होते <<<<
यावरुन मला प्रश्न पडलाय की....
ध चा मा केला याची अतिचर्चा झाली आजवर, पण नारायणरावावर प्रत्यक्षात तलवारी चालविणारे कोण होते?

हूं.... गोळी झाडणार्‍यापेक्षा गोळीचे पैसे देणारा कोण हेच महत्वाचे असते.

माझे सर्व बाफ "उद्देश" घेऊन असतात असे का लिहित आहात? >>

कारण तुमचे इतिहास /राजकारण यांवर लिहिलेले लेख हे एक ' प्रचारकी उद्देश' मनात घेऊन लिहिलेले असतात हे सर्वज्ञात आहे.
जे तसे नसतात (उदा. ट्रेक्/सायकलिंग इ.) त्यांना त्या त्या वेळी अ‍ॅप्रिशीएट केलेले आहेच.

(बाकी औरंगजेबाचे नाव बदलले हे छानच झालं, म्हणजे मला कुणाला मी औरंगजेब रोडवर रहाते वगैरे सांगायला आवडले नसते कधी Wink )

कारण तुमचे इतिहास /राजकारण यांवर लिहिलेले लेख हे एक ' प्रचारकी उद्देश' मनात घेऊन लिहिलेले असतात हे सर्वज्ञात आहे. >>

Lol माझे राजकारणाचे विषय आणि पोस्ट थेट असतात. आडून आडून प्रचार नसतो. सरळ मुद्द्याने खोडने / पुरावे देणे / इकॉनॉमी असेल तर सोबत ग्राफ्स देणे कधीपासून प्रचारकी झाले? मुद्दा नसेल तर मी वाद घालत नाही हे पण सर्वज्ञात आहे.

उगाच माझ्याविषयी प्रचार करता राव अश्या प्रचारकी पोस्ट टाकून. असो हा धाग्याच्या विषय नाही. फक्त तुमची कंसातली पोस्टच फक्त इथे टाकली असती तर ते विषयाला धरून बोलणे झाले असते. Happy

अहो , तुमच्या प्रचारकीविषयी जे तुम्हाला आणि सगळ्यांनाच माहित्येय ते मी कशाला प्रूव्ह करत बसू म्हणून पुढच्या चार पोस्टस वाचवत्येय.
चालुदे विषयाशी संबंधित चर्चा, जी वर चाललेली आहेच.
Happy

दिमा,

तुम्ही फक्त बेफिकीर, स्पॉक वगैरेंना मध्ये आणले. इथे पगारे, जामोप्या अन इतर अनेक डु आय लुडबुड करत आह्त, त्यांच्या विषयीदेखील थोडे प्रेमाने बोला की राव. म्हणजे आम्हालाही वाटेल की तुम्ही बायस्ड नाही आहात.

पगारे शिवाजींचे किती गुरू ह्यावर चर्चा नाही. कृपया इथेही नेहमीचा गोंधळ नको. कृपयाच. तुम्ही असे करा मला विपु करा म्हणजे मग शिवाजी / संभाजी अन तुमच्या आवडत्या पेशव्यांचे पण गुरू मी सांगेन. कृपयाच !

शिवकालिन् सैय्यद शाह बाबा याकूत यान्च्या बद्द्ल कुणास काहि ठावुक आहे का?>>>>> तुम्हाला माहीत असेल तर लिहा की, आमाला नाय माहीत.

सातीजी साहेब, नम्रपणे एक विचारु इच्छितो, की कायदेशीर मार्गाने आपल्याला पटणा-या गोष्टींबाबत "प्रचारकी" लिहिणे यात काय समस्या आहे?
अशा प्रचारकी लिहिणा-या पगारे, मयेकर, सर्वश्रेश्ठ डोक यांना तुम्ही कधी त्यांच्या एकांगी प्रचारकी लेख / प्रतिसादाबद्दल काही म्हटले / विचारले आहेत काय?
असल्यास आपल्या संयमीत वागण्याचे खरेच कौतुक आहे.
नसल्यास आपणही सर्वश्रेषठ डॉक प्रमाणेच "लाख संतुलीत" आहात असे समजावे का? तसेच नसल्यास, महाराजांच्या अनेक शत्रुंपैकी एक असलेल्याच्या विषयाच्या धाग्यावर येऊन धाग्याबद्दल न लिहिता धागाकर्त्याच्या उद्देशाबद्दल लिहिणे कशासाठी ते लिहिलेत तर माझ्याही मनात तुमच्याबद्दल असलेला आदर आणिखीन वाढवेन म्हणतो.
धन्यवाद.

अर्धवट वाक्ये उचलू नका हो भाऊ!
या धाग्याचा उद्देश 'औरंगजेब वाईट नव्हता तद्वत त्याचे नाव काढू नये' या कारणमिमांसेचा विरोध करणे हा आहे.(हे तरी बरोबर आहे ना?) आणि तो तर मी एकदमच मान्य केला आहे.
या व्यतिरिक्त ते नाव न काढण्याचे काही तर्क असतील तर ते लिहीण्याची ही जागा आहे का असे तुम्हालाच विचारतो.

मग शिवाजी / संभाजी अन तुमच्या आवडत्या पेशव्यांचे पण गुरू मी सांगेन. कृपयाच ! << तो लेख अन्यत्र पाडच

बाकी रस्त्याचे नाव बदलले हे मात्र चांगले झाले. त्या बद्दल आप चे अभिनंदन.

उत्तरेकडच्या इतिहासात मराठ्यांना तेव्हाही आणि राजकारणात आताही दुय्यम स्थानीच लेखले जाते त्यामुळे ट्विट मधे जे लिहले आहे ते वाचुन आश्चर्य नाही वाटले

केदार,साति ह्यान्नि तुमचे लेख प्रचारकि असतात लिहिले त्याच्याशि मि सहमत नव्हतो.मात्र तुम्हि मला डु आय म्ह्टलेत मि कुणाचाहि डु आय नाहि तरि तुम्हाला तसे वाटते ह्या वरुन् तुमच्या विचारशक्तिचि कल्पना आलि. तुम्हाला शिवाजि राजे हे एका धर्मासाठि लढले असे वाटते.तर मला आमचा राजा हा सर्व धर्मान्चा आदर करणारा दिलदार राजा वाटतो.तुम्व्ह्या धाग्यावर विरोधि विचार आले तर तुम्हाला लुड्बुड वाटते.मग धाग्याच्या हेडर मध्येच टाकायचे जे लेखाशि सहमत नाहित त्यान्नि मते मान्डु नयेत.हो ला हो करावे.

स्पॉक साहेबजी , मी साहेब नाही बाईसाहेब आहे हे सर्वप्रथम ध्यानात घ्या. नुसतं साती किंवा सातीताई म्हटलंत तरी चालेल.
Happy

मी प्रचारकी लिहिणे चुकीचे आहे असे म्हटलेय का? मी तर तुमचा उद्देश साध्य झाला का असे विचारले उलट.

लिहिताय तर कबूल करा. ते मी लिहीलंच नाही असं म्हणतायत.

पगारेंबद्दल मला काही ठाऊक नाही पण मयेकर आणि दीमा प्रचारकी लिहितातच याबद्दल मला खात्रीच आहे.
मी पण लिहितेच की.
(पण आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवित नाही.)
Happy

अरे आगाऊ हे बघ, मी आधीही लिहिले आहे की रस्त्याचे किंवा जागेचे नाव काय असावे ह्यावरून भांडणं नकोत.

जर नाव बदलले तर त्याचे मी स्वागत करतो, पण नाव बदलायलाच पाहिजे असा आग्रह करत नाही, ह्यात काय चूक आहे? मग सरळ सरळ लिहिता येत नाही अश्या टाईपचा टोमन का बरं मित्रा?

नावबदलामागे राजकारण आहे का? असेलही. किंवा नसेलही. अरविंद केजरीवालही जातीयवादीच का मग आता लगेच? कारण जर त्यांनी होकार दिला नसता तर झाले असते का?

असो परत चर्चा तू नावबदलावर वळवत आहेस. मला खरंच तिथे जायचे नाही. मी ऑलरेडी दोन तीनदा लिहिले आहे.

तर मला आमचा राजा हा सर्व धर्मान्चा आदर करणारा दिलदार राजा वाटतो.तुम्व्ह्या धाग्यावर विरोधि विचार आले तर तुम्हाला लुड्बुड वाटते. >>> "आमचा" बरं बरं !

मी तुम्हला डु आयडी कुटे म्हणालो. मी पगारे असे सरळ लिहिले आहे.

"तुम्ही शिवाजी विषयी लिहिता आहात. मी औरंगजेबा विषयी" अं विषय वेगळा आहे ना? की नाही? असो. लिहा तुम्ही तुम्हाला जे कळतंय ते. उगाच आपलं काहीतरी !

असं करा पगारे औरंगजेबाचे हिंदू गुरू लिहून टाका मग ते विषयाला धरून होईल. मग त्यापुढे औरंगजेबाने मुंज कधी केली? धार्मिक आरक्षण दिले का? औरंगजेबाच्या राज्यातील देवळांचे अती महत्त्व ह्यावर परिसंवाद ह्यावर आपण धागा काढू. ओके.

ओ किती एडिटताय?
मी आपलं स्पॉक साहेब मला 'साहेबांच्या' लिस्टमधून काढतायत की काय बघायला येत्येय तर तुमचंच चालू!
Wink

बर्याच प्रतिक्रियातुन शिवाजि महाराज् ह्यान्ना एकाच रंगात रंगवण्याचा प्रयत्न झाला.अन्यायाविरुध्द लढणार्या शिवाजि महाराजांना संकुचित करण्याचा प्रयत्न झाला.

शिवाजि महाराज,औरंगजेबाच्या कौटुंबिक भांडणात त्याच्या मुलाला संभाजि राजेंनि दिलेला आधार त्यामुळे औरंगजेबाचा झालेला संताप,महाराजांचे तोफखाना प्रमुख,आरमार प्रमुख,इतिहासकार काफि खान ह्यांनि शिवाजि राजांबद्दल केलेले लिखान, बरेच लिहायची इच्छा होति...,

मात्र धागाकर्त्याला माझ्या प्रतिक्रिया ह्या लुडबुड वाटत असल्याने नाइलाज आहे.....,,ह्या धाग्यावरची हिमाशेपो

मात्र धागाकर्त्याला माझ्या प्रतिक्रिया ह्या लुडबुड वाटत असल्याने नाइलाज आहे.....,,ह्या धाग्यावरची हिमाशेपो
<<

Lol
पगारे इतके नाराज नका होऊ, तुम्ही एक वेगळा धागा काढा आणि तिथे काफि खान, औरंग्याचे हिंदु गुरु, त्याने धार्मिक आरक्षण दिले का वगैरे मुद्दांवर सविस्तर लिहा. आम्ही ते वाचु. Happy

सकुरा | 4 September, 2015 - 10:53
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?या पुस्तकात बरिच माहिती लिहिलेली आहे.
<<

ह्या पुस्तकाचा लेखक कोणीतरी B-ग्रेडी टाईपचा असणार.

सातीताईजी बाईसाहेबजी (हे काँग्रेसी परंपरेला अनुसरु आहे. ते मागे पाकीस्तानातील एका सज्जन व्यक्ती बद्दल असे आदराचे उद्गार एकल्यापासुन सगळ्या कांग्रेसी समर्थकांबद्दला आदर दुनावला आहे. असो.),
लिहिताय तर कबूल करा. ते मी लिहीलंच नाही असं म्हणतायत. >>
हे सगळे ठिक आहे.
जबरदस्तीने "या" धाग्याच्या धाग्याकर्त्याकडुन असे का वदवुन घ्यायचे आहे तुम्हाला?
ते कबुल करो वा न करो त्याने काय फरक पडतो? तो त्यांचा वयक्तीक प्रश्न नाही का?
धाग्याच विषय काय अहे? ते बोला ना?
आणि जर पडतो, तर तसे तुम्ही पगारे, मयेकर , डॉक यांच्या धाग्यावर कधी त्यांना का नाही विचारले की कबुल करा तुम्ही पाकड्यांचे + सौदी मिठाचे समर्थक आहात म्हणुन?
आत्ताच इथे आणि "याच" धाग्यावर का सुचले?
तुम्ही नक्की डॉक प्रमाणेच किती "लाख संतुलित " आहात ते समजुन घ्यायचे होते म्हणुन विचारले.

Pages