अमानवीय जखिण आणि ताई

Submitted by वेडा कल्पेश on 15 July, 2015 - 01:46

खालील घटना तंतोतंत सत्य आहे आणि माझ्या डोळ्या देखत घडलेली आहे या आधी हि मी ती फेसबुक वर शेअर केली होती. पण आता मी सुधा मा.बो कर झालो आहे त्यामुळे ती मी इथे पोस्ट करत आहे

"मी कल्पेश मूळचा मुंबई मधील गोरेगाव चा. तब्बल १३ वर्षापूर्वी माझ्याबरोबर घडलेली एक घटना आज येथे शेर करावीशी वाटली..
.
.मी तेव्हा 13 वर्षाचा होतो . आणि गावा वरुन आत्ये भावच्या लग्नाची पत्रिका नुकतीच आली होती.मे महिना होता. आणि शाळेला भरपूर सुट्ट्या सुधा होत्या . त्यात गावाला जाण म्हणजे आनंदाची पर्वणीच माझ्यासाठी. एकदाचे आम्ही गावाला येऊन पोहचलो . लग्न असल्यामुळे सगळी भावंड अगोदरच गावाला आली होती. आणि तेव्हा मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे लाड होत असत......

आत्याच गाव चिपळूण पासून सुमारे 12 की. मी अंतरावर आहे गावाच नाव केळने. गाव डोंगराच्या मधे असल्याने निसर्गाने जणू सगळी सुंदरता त्यात भरली होती. आत्ता मैं स्टोरी ला सुरवात करतो.......

तो लग्नाच्या आधीचा म्हणजे हळदिचा दिवस होता घरात लग्न असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या कामात व्यस्त होते. सगळ्या भावंडानी काम वाटून घेतली होती. मी आणि माझी ताई रेखा आमच्या दोघांवर पाणी भरण्याचे काम सोपवण्यात आले. पाणी भरण्या साठी विहरीवर जाव लागत असे. ती विहीर घरा पासून 5 मिनटांच्या अंतरावर होती. आणि ती विहीर जमिनीला लागून होती म्हणजे तिच्या बाजूला सुरक्षा कड नव्हती . त्या मुळे लहान मूलाना सहसा तिथे जाऊ दिले जात नव्हते. विहीर तशी खोल नव्हती 4 ते 5 फुट पाणी असेल त्यात.आणि विहरीच्या बाजूला एक मोठे चिंचेचे झाड होते..

तर झाल अस की रेखा ताई आणि मी दोघ निघालो पाणी भरण्यासाठी दुपारचे 12. ते 12.30 वाजले असतील काही वेळात पोहचलो विहरी जवळ तेवा तिथे कोणीच नव्हते. आमच्या गप्पा चालू होत्या ताई विहरीतून पाणी काढून हंडा भरत होती आणि मी त्या विहरीत वाकून बघत होतो. विहरीत समोरच्या चिंचेची पान पडत होती. सगळ वातावरण एकदम शांत होत . तेवढ्यात ताई म्हणाली तुला माहीत आहे का कल्पेश या झाडावर जखिण राहते अस म्हणतात. ते ऐकून मी ताई ला चिडवत म्हणालो राहते ना मग बोलव मी नाही घाबरत कोणाला . तर मस्करी म्हणून ताई जोरात बोलली ए जखिणी ये आणि धर आमच्या कल्पेश ला. ती हे बोलताच आम्ही दोघे पण हसायला लागलो आणि ताई ने भरलेला एक हंडा माझ्या डोक्यावर दिला आणि म्हणाली हो पुढे आणि ती तिचा हंडा उचलू लागली तसा मी घरच्या दिशेने वळलो. मी 4 ते 5 पावल टाकली असतील अचानक धाड असा मोठा आवाज झाला.. अचानक अंगातून एक शीरशिरी उठली . मी मागे वळून पहिले तर ताई कुठेच दिसत नव्हती. मी घाबरलो पाय थरथारू लागले पण ताई चा विचार करून हिंमत केली आणि विहारी जवळ गेलो आणि खाली डोकवून पहिले. आणि जे पहिले ते कधीच विसरू शकत नाही

ताई विहरित उभी होती पूर्ण ओले केस डोळे लाल लाल झलेले होते आणि एक विचित्र हास्य तिच्या तोंडावर होते आणि सारखी मान वाकडी तीकडी करत होती तेव्हा
आणि अचानक तिने मला आवाज दिला की ये खाली ये मी तुला घ्यायला आली आहे . हे ऐकून माझी टरकलि . अंगात जेवढी शक्ति होती तेवढी एकवाटून मी घरच्या दिशेने पाळायला लागलो. धापा टाकत अंगणात येऊन पडलो माझी ती गत बघून सगळे माझ्या दिशेने धावत आले मला उचलले आणि पाणी पाजले मी बोललो ताई बावडीत पडली आहे हे ऐकून मामा , आणि दोन चार मोठी मंडळी विहरीच्या दिशेने धावले. अर्ध्या तासाने ते सगळे लोक ताई ला पकडून घेऊन आले . ती जोर जोरात किंचाळत होती. ओरडत होती. की मला तो पाहिजे ते ऐकून मी अजुन घाबरलो मोठ्या मंडळीनी लगेच गावातील एका मंत्रीक बाबाना बोलावले . आणि ताई ला त्यांच्या समोर बसवले काही मंत्र उच्चारण केले आणि ताई ला विचारले कोण आहेस तू आणि का या मुलीच्या मागे लागली आहेस. तेव्हा ती जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली मी चिंचेची शेंद्री जखिण आहे . हिने मला बोलवल आहे. त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आता मी या दोघाना पण सोबत घेऊन जाणार. तेव्हा सगळेच घाबरले मग मंत्रिकने काही अजुन मंत्र म्हटले आणि तिला विचारल या मुलांकडून चुक झाली त्याना क्षमा कर आणि त्या बदल्यात तुला हव ते देतो . तेव्हा ती म्हणाली नाही मला अजुन काहीच नको मला हे दोघ हवे आहेत माझी मस्करी करतात याना मी घेऊन जाणार तेव्हा मंत्रिकाने काही मंत्र म्हटला आणि त्याच्या पिशवीतून एक रखेची पुडी बाहेर काढली आणि ती तिच्या कपाळाला लावली तशी ती रडू लागली तिला त्रास होऊ लागला मंत्रीक पुन्हा म्हणाला जातेस की नाही तेव्हा ती म्हणाली मला हिरवी साडी आणि मांसाहाराच जेवण पाहिजे तरच मी याना सोडेन . मंत्रिकने ते कबूल केल द्यायच आणि मामाना एक साडी आणि मटनाच ताट घेऊन बावडी जवळ ठेवायला संगितल ते सर्व होई पर्यंत मंत्रिकच मंत्र बोलन आणि ताई च माझया कडे रागाने बघन चालूच राहील . मामा सगळ्या विधी करून घरी आला तसा मंत्रिकने ताई कडे बघितल आणि ओरडला जेया आता तुझी मागणी पूर्ण झाली आहे. आणि परत तो अंगारा काही मंत्र बोलून तिच्या आणि माझ्या कपाळाला लावला तसा ताई शांत झाली आणि पडली.......

मंत्रिकने एक दोरा आमच्या हाताला बांधला आणि निघून गेला. सगळ शांत झाले थोड्या वेळाने रेखा ताई उठली आणि म्हणाली अरे आपण इथे कसे आपण तर पाणी आणायला गेलो होतो ना ......... तेव्हा मामा बोलले हो पण तुला चक्कर आली म्हणून तुला घरी आणून झोपवले पाणी भरून झाल आता .... तिकडे जायाच नाही दुसर्या दिवशी लग्न आटोपल तसेच आम्ही मुंबई ची गाडी पकडली कारण अजुन काही विपरीत होऊ नये म्हणून आणि त्या दिवसाला आज १३ वर्ष झाली मी परत कधीच अत्याच्या गावाला गेलो नाही ...."

समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे भूताच्या भुमिकेत बाटलीत दाखवला होता
शिट्टी वाजवल्यावर तो अमानवीय कामे करून द्यायचा असाही काही सीन होता.
ते बायंगी प्रकरण होते का?<<<<< तो मराठी जीनी होता

Pages