मी शेतकरीच बोलतो आहे,...
तुम्हा सर्वांना आपुलकीनं सांगतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||धृ||
आजवर खुप भोगलं आहे
अजुनही खुप भोगतो आहे
जीवनावरती कर्ज काढून
जीवन आज जगतो आहे
आजही जगण्यासाठी धडपडतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||१||
दूष्काळानं होरपळलं आहे
अवकाळही छळतो आहे
आता निसर्गही आमच्या
जगण्याशीच खेळतो आहे
तरीही जगण्याला उमेदीनं पेलतो आहे
होय, मी शेतकरीच बोलतो आहे,...||२||
दुष्काळात अन् अवकाळात
कित्तेकजण दौरे करून गेले
कुणी सांत्वन करून गेले तर
कुणी-कुणी फक्त फिरून गेले
कुणी अजुनही कागदोपत्री फिरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||३||
शेतकर्यांच्या आत्महत्तेचे
इथे अभुतपुर्व तांडव होते
ते दूसरे-तिसरे कुणी नाही
तुमचे-आमचेच बांधव होते
त्यांच्यासाठी आजही जीव तळमळतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||४||
मात्र शेतकर्याच्या मदतीचे
आजही प्रश्न प्रलंबित आहेत
अन् सरकारी धोरणांमुळे
भावनाच आचंबित आहेत
मात्र मदतीसाठी,शेतकरी ना मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||५||
आत्महत्त्याग्रस्तांच्या आकड्यांतही
इथे भ्रष्टाचार घडतो आहे
अन् मृत्युच्या कारणांच्या
लिखावटीचा प्रश्न पडतो आहे
मृत्युच्या कारणांचे कुणी लेखी पुरावे मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||६||
तुम्हाला काय सांगु आमचे
जगणे कीती जर्जर आहेत
कसे लिहीणार मृत्युची कारणे
आम्ही आजही निरक्षर आहेत
कुणी गजेंद्रसिंह कारणे लिहून मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||७||
पण आता मृत्युचे कारणे
आम्ही लिहून ठेवणार नाहीत
अन् आत्महत्याग्रस्त म्हणून
शेतकरीही मरणार नाहीत
पण जगण्यासाठी मदतीचा हात मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||८||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
( कविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये )
सुंदर. आवडले शेतकरयाचे
सुंदर. आवडले
शेतकरयाचे दशावतार मांडले,मन भरुन आले.
लिहा. आनंदच होईल.
आपल्या मरण्याने काहीही फरक
आपल्या मरण्याने काहीही फरक पडणार नाहीये हे माहित असूनही राजकीय लोकांसमोर आत्महत्या करण्याचं कारण काय ?
असे दशावतार असतानाही लग्न करून संसार मांडायचा . ४-४ ५-५ मुलांना जन्माला घालायचं आणि पोसता नाही आलं कि आत्महत्या
करायची आणि त्यांना उघड्यावर टाकायचं . पोसायची ताकद नसल्यामुळे २ लहान मुलींचा त्यांच्या वडिलानेच खून केल्याची बातमी हि आलीय आज
पेपर मध्ये
सारीका३३३ अनुमोदन . सोबत आणखी
सारीका३३३ अनुमोदन .
सोबत आणखी एक बातमी आहे . माय बापानी मिळून स्वतःच्या तीन पोरांना मारुन टाकल आणि मग गळफास लावला .. ३५ एकर शेती आणि लेकराम्चे वय तरी काय तर सर्वात मोठी २२ , मग १९ , १७ , आणि १५ ..
एव्ढ्या मोठ्या पोरांना मारल कस असणार .. कारण अजुन कळलेल नाहिये आणि मोठी पोरगी आजीकडे होती म्हणुन वाचली . काहीच का विचार नाही कुणाचा :रागः
टीना आनी सारीका, शेती ही
टीना आनी सारीका,
शेती ही निसर्गावर अवलंबुन आहे व भांडवला शिवाय शेती नाहि.पाउस पडला नाहि तर उत्पन्न होत नाहि.पन बैंकेच कर्ज काहि थाबत नाहि.कर्ज फेडन्यासाठि जमीन विकने ह पर्याय उरतो. शेतकरी जमीनीला कालिआई म्हनतो आनि ती वीकने म्हनजे मरन.
ही मानसिकता साह्जासहजी बदलने शक्य नाहि.
क्रुपया त्यंच्या विषयि सहानभुति आसावी.
शेती ही निसर्गावर अवलंबुन आहे
शेती ही निसर्गावर अवलंबुन आहे व भांडवला शिवाय शेती नाहि.पाउस पडला नाहि तर उत्पन्न होत नाहि.>>>
कितीही पावूस पडला तरी पाणी अडवण्याच , पाणी जिरवण्याच ह्या लोकांना कधी कळणार ? स्वतः हि काही करत नाहीत , सरकार कडून हि काही करवून घेत नाहीत . दुष्काळावर किवा नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी काही पुढाकार घेताना दिसतात का ? आंदोलन करण , सरकारला धारेवर धरण असं काहीही करताना दिसत नाहीत . फक्त आत्महत्या करताना दिसतात . विकतचं बियाणं , विकतची खत ,औषधं कशासाठी ? बँकेकडून , सावकाराकडून कर्ज घेताना पण अंथरून पाहून पाय पसरावेत कि .
क्रुपया त्यंच्या विषयि सहानभुति आसावी.>>
सहानुभूती अर्थातच आहे .