पित्र पाठ

Submitted by हर्ट on 15 September, 2014 - 11:24

नमस्कार,

मला पित्र पाठाबद्दल माहिती हवी आहे. नक्की काय करतात पित्र पाठ चालू असताना?

धर्मानुसार ... वा प्रथेनुसार काय करायला हवे पित्र पाठात?

धन्यवाद

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पितृ पक्षात सर्व गेलेल्या पूर्वजांचे नाते वाइकांचे श्राद्ध करायचे असते. डेसिग्नेटेड डेज असतात तुमचे गुरुजी सांगतील. विश्वास असल्यास करा. आमच्याकडे पुणे विद्यार्थी गृहाला एक दिवस जेवण देतो व देणगी देतो. बाकी काही करत नाही . You ca n use this period to introspect and think about the loved ones who have gone ahead and do things they would have liked.

आम्ही लहान मुलांच्या शाळेला देणगी देतो. कुलदेवीपुढे ओटी ठेवतो. घरातील देवापुढे नमस्कार करून काही चुकले इ. असल्यास माफी मागतो, शांती, समृद्धी मागतो. हेही कर्मकांड च आहे...पण कुणास गैरफायदा घेता येईल अशी शक्यता यात वाटत नाही.

ज्यांना पित्र मान्य आहेत,ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या साठी...........
मनुष्याला मुक्ती साठी सर्व पुण्य संचय या जन्मात सर्वांनाच शक्य नसते तेव्हा त्याला मुक्ती साठी जे पुण्य कर्म आवशक असते ते त्याचा पुढील पिढीने करावयाचे असते म्हणजे त्यांचा पुढील मार्ग सुकर होतो त्यातीलच एक भाग म्हणजे पितरांची सेवा असते म्हणून पितर अत्यंत आतुरतेने आपल्याकडून अपेक्षा करत असतात तेव्हा त्यांची सेवा हे अत्यंत शुभ व पवित्र कार्य आहे. ज्यांनी आपल्याला हे जग दाखवले त्या आपल्या पूर्वजांबद्दल अत्यंत आदर बाळगणे व तो व्यक्त करण्यासाठी पितरांची सेवा असते आपण पहिजे तो तर्क काढु शकता.अनुभव महत्वाचा.असतो.
म्हणून श्राद्ध पक्ष करताना मुख्य हेतू आपल्या पितरांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद घेणे हाच असावा .त्यासाठी ब्राम्हणांची संख्या अथवा शाखा ,स्वैपाकात पदार्थांची कमतरता ,दक्षिणा,हे सर्व उपलब्धतेवर व आपल्या पात्रते नुसार करावे .त्यासाठी अडून बसू नये .अथवा श्राद्ध,पक्ष टाळू नये. ते त्याच तिथीला कसे होईल ते पहावे .कारण त्या दिवशी पितर आतुरतेने वाट पहात असतात .व त्याच दिवशी ते मृत्यू लोकात येत असतात .त्यामुळे जर ते विन्मुख गेले तर आपणावर नाराज राहतात.म्हणून अगदीच गरीबातल्या गरीब व्यक्तीने देखील काहीही न घडल्यास गावा बाहेर अथवा वनात जाऊन वर हात करून पितरांना उद्देशून म्हणावे कि, मी इच्छा असताना देखील तुम्हाला जेऊ घालू शकत नाही पण तुम्ही आमच्या मनातील भाव ओळखून,आमची परस्थिती ओळखून आमच्यावर तृप्त असावे व क्षमा करावी म्हणजे पितर तृप्त राहतात.तसेच ठराविक तिथीला काही अपरिहार्य कारणामुळे करणे घडलेच नाही तर सर्व पितरी अमावस्येला मात्र जरूर करावे टाळू नये.
घरात स्वर्गवासी व्यक्तींचे फोटो लटकत ठेऊ नये फक्त श्राद्ध,पक्ष,अश्याच दिवशी त्यांची पाटावर मांडून त्यांची पूजा करावी.
तसेच पितरांची सेवा ही देव पूजा करण्यापूर्वी असते रोज पुजा करण्यापुर्वी दक्षीणे कडे तोंड करून आसनावर बसावे आणी पितरांना प्रार्थना करावी ... हे पितरांनो तुमची सेवा करावी असे ज्ञान झाले आनंद झाला तुम्ही आमच्याकडून सेवा स्वीकारावी ही तुमच्या चरणी नम्र विनंती आम्हाला देव कार्य करायचे आहे तेव्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा असे म्हणून जमिनीला माथा टेकून अत्यंत भक्तीने त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा

...

जिवत् पनि आइ-वडिलाचि सेवा करावि .हे केल्यास पित्र पाठा करायचि गरज नाहि.
त्याच्या कर्म नुसार पुढील गति मिळत असते.

नाझ्या एका भाच्याने मुलगी पाहिली महिन्याभरापूर्वी विचारविनीमय होईतो पित्रुपक्श लागला ..... आलं ना लक्शात ... माझा प्रश्न असा आपले पित्तर आपलं वाईट चिंतणार का .... शुभ कार्यात आपण त्यांना आवाहन करुन बोलावतोच ना .... मग हे अशुभ का समजतात?

sammi.jpgsammi.jpg

बापाची पित्र नाही घातली की सरड्या ढंढाळी रोग लागतो. जा लहान मुलांचे नॅपी घालुन येत जा. घाण वास मारत जाउ नको जिकडे तिकडे.

गावा बाहेर अथवा वनात जाऊन वर हात करून पितरांना उद्देशून म्हणावे कि,
<<
याच रिच्युअलवरून "काखा वर करणे" असा वाक्प्रचार आलेला आहे.
*
एक शंका :
श्राद्धतिथी वगळून इतर वेळी हे पितर नक्की 'असतात' कुठे?
मोक्षबिक्ष मिळाला असेल तर परब्रह्मात विलीन होत असतील, अन मिळाला नसेल, तर नेक्ष्ट जन्म घेऊन मृत्यूलोकात रिटर्न आलेले असतील.
मग 'त्या' तिथीला नक्की वाट कोण अन कशीकाय पहातो?

शिवाय मी श्राद्ध घातलं तर पितराला मुक्ती/मोक्ष कसा काय मिळतो म्हणे?
मग कर्मविपाकाचं काय? त्यांनी केलेली पापपुण्यं कुठे जातात? त्यांच्या कर्मविपाकात माझ्या श्राद्धकर्माचा स्वयंपाक मिसळून काय होतं नक्की?

इब्लिस मला पण हे प्रश्न पडतात . जे काही पितर पितृ लोकात असतील त्यांना श्रध घातल्यामुळे समाधान, आनंद मिळतो . positive energy मिळते म्हणे

latur yethe rotary club marfat darroj civil hospital yethe peshant sobat yenarya 50 natevaekana jewan denyat yete.tyasathi ru 1500/- bharun aapan punyasmaran karu shakato.kontehi dan garjuna denyat yave.

मला माहित आहे त्याप्रमाणे पितरांना वासना असते. त्यांना शरीर नसले तरी वासना संपल्या नसतात. पित्रुपक्षामधे आपल्या वासनापुर्ति साठी ते आपल्या जवळ आलेले असतात. शरीर नसल्यामुळे ते स्व:त अन्न सेवन करु शकत नाहीत फक्त वास घेउ शकतात. म्हणुन त्यांची आठवण करुन पिंड ठेवायचा. त्यांची वासनापुर्ति झाली की साहजीक त्यान्ना पुढिल गति मिळण्यासाठी मदत होते.
@इब्लिस - एरव्हि ते वायुरुपामधे भटकत असावेत.

पितरांच्या नावाने दान द्यायचे असेल तर द्यावे पण त्यांना गती मिळण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. पिंडदान करणे हेच महत्वाचे असते. त्यासाठी तर्पण विधी असतो.

पितर हे वायुरुप असल्यामुळे अतिशय सामर्थ्यवान असतात, पण त्याचवेळी ते वासनेमधे लडबडलेलेही असतात, जिवंतपणीच्या वासना न संपल्यामुळे. त्यामुळे त्यांनी काही उपद्रव देउ नये ही सुप्त इच्छाही असावी पिंडदानामागे.

अहो असामिअसामि,
तुम्हाला कर्मविपाक ठाऊक आहे की नै? म्हणजे ते चौर्‍यांशी लक्ष योनींचा फेरा, मागल्या जन्मातली पापपुण्यं एकत्र करून त्या मार्कांवर पुढल्या यत्तेतली बेंचवरची जागा ठरते.. वगैरे?

तर यानुसार बाय द टाईम वर्षश्राद्ध येते, तोवर आपले दिवंगत नातेवाईक त्यांच्या पुढल्या जन्मात जे कोणते रूप त्यांना मिळणार आहे त्या रूपाने जन्माला येऊन चुकलेले असतील की नाही? अन खूपच पुण्यवान वगैरे असतील तर परब्रह्मरूपात एकरूप होऊन त्या योनींच्या फेर्‍यातून मुक्त झालेले असतील.

मग आता हे वायूरूप वासनांनी लडबडलेले पितर कुठून उपटले वेगळेच?

आता तुम्ही म्हणता, वास आला तरी पितर खुष होतात. आता वर पत्की साहेबांनी ते काखा वर करायचं श्राद्ध सांगितलं आहे. त्यात त्या पितरांना कसला वास येणार नक्की?

धार्मिक बाबतीत पत्की साहेब अधिकारी दिसतात. शिवाय ते (सुधारून ठळक केलेल्या प्रतिसादात) पुढे म्हणतात, "पूर्वजांबद्दल आदर बाळगण्यासाठी हे कर्म आहे" तर मग आदर म्हणून इतर दानधर्म केलेला का चालणार नाही? तुम्ही म्हणता तसे पिंडदान अनिवार्य का?

तर यानुसार बाय द टाईम वर्षश्राद्ध येते, तोवर आपले दिवंगत नातेवाईक त्यांच्या पुढल्या जन्मात जे कोणते रूप त्यांना मिळणार आहे त्या रूपाने जन्माला येऊन चुकलेले असतील की नाही? अन खूपच पुण्यवान वगैरे असतील तर परब्रह्मरूपात एकरूप होऊन त्या योनींच्या फेर्‍यातून मुक्त झालेले असतील.>>
Not necessarily. प्रत्येकाला लगेच पुढील जन्म कुठल्यातरी योनी मधे मिळेलच याची शाष्वती नसते. तुम्ही म्हणताय ते "कर्मविपाक" ठाउक आहे आणि त्याप्रमाणेच हे शक्य आहे की पितरांना गती मिळाली नसु शकते.

मग आता हे वायूरूप वासनांनी लडबडलेले पितर कुठून उपटले वेगळेच?>> सगळेच पितर वायुरुपात असतिलच असे नाही. प्रत्येकाचे कर्म वेगळे त्यापमाणे गती निराळी. नाही का?
मानवेत्तर बर्याच योनी आहेत. आणि तुम्ही म्हणत असलेल्या "चौर्‍यांशी लक्ष योनींचा फेरा" यामधे सर्वान्ना देह मिळेलच अस ग्रुहित धरत आहात.

बर्‍याच म्हणजे कोणत्या? आपल्या पूर्वजांना कोणती योनी मिळाली ते त्या पिठात उमटलेले ठसे पाहून ठरवतात, तशी आणखी एकादी टेस्ट आहे का?
रच्याकने : आमचे सर्व पितर आमच्यासारखेच पुण्यवान असल्याने डायरेक्ट मोक्षास प्राप्त झाले आहेत. मग श्राद्ध कर्म कशाला करायचे?

आमचे सर्व पितर आमच्यासारखेच पुण्यवान असल्याने डायरेक्ट मोक्षास प्राप्त झाले आहेत.>>हे कसे काय समजले इब्लिस तुम्हाला? हे कसे सिद्ध करणार तुम्ही?

हे कसे सिद्ध करणार तुम्ही?
<<
पितर "असतात", अन आपण श्राद्ध केल्यावर त्यांना "गती" मिळते, हे तुम्ही जसे सिद्ध कराल, तसेच मी "हे" सिद्ध करीन. सेम एक्स्पेरिमेंट्स अँड प्रूफ्स, यु क्नो!
हाकानाका.

हा धागा धार्मिक विभागात आहे. Closure साठी असे काही साधे विधी करावेसे वाटले तर चूक काय? एखाद्या शाळेला देणगी देणे, थोडेसे चिंतन करण अशाही मार्गाने हे होऊ शकेल ना? व्यासंगी तलवारी पाजळल्याच पाहिजेत का?

अलीकडे प्रत्येक दिवस दगदगीचा असतो. प्रत्येक दिवशी आपण पितरांचे कृतज्ञतेने मन:पूर्वक स्मरण करू शकत नाही. तेव्हा ज्या तिथीला त्यांचे निधन झाले असेल ती तिथी पितृपंधरवड्यात येईल तेव्हा त्यांचे स्मरण करून त्यांच्याप्रती शांत चित्ताने कृज्ञतापूर्वक आदर आणि श्रद्धेची ओंजळ वाहावी. विश्वास आणि शक्य असेल तर अन्नदान करावे. अलीकडे बहुतेक लोक अन्नदानाचा मार्ग अनुसरतात.

आमचा पित्रावळीचा कार्यक्रम गावाकडे असल्याने शक्य होत नाही जायला दरवेळी. मागच्या वर्षी पुण्यात होतो त्या काळात. आता हजारो पितरांच्या कोण तिथी काढत बसणार म्हणून सर्वपित्रीला गाडी बाहेर काढली. दहा किलोच्या दोन पेडीग्रीच्या गोण्या घेतल्या. ती एक चिकन-राईस-एग वाली व्हर्जन असते ती घेतली. शाकाहारी-मांसाहारी दोन्ही पित्रे खुश झाली पाहिजेत असा विचार होता. रस्त्यात जिथं भटकी कुत्री भेटायची तिथं त्यांना द्यायचो. काही कुत्र्यांना लोकांनी लैच हऱ्यास केलेलं असतंय त्यामुळे त्यांना युयु करून मागे जायचो तर ती शेपटी हालवीत पुढे पळायची. असा दोन-तीन तास गोण्या संपेपर्यंत कार्यक्रम चालू होता. त्यानिमित्ताने कधी न पाहिलेल्या गल्ल्या हुंगून झाल्या. मांजरी-कावळे-गाई हेबी डोक्यात होते पण ते ऐनवेळी सापडणार नाही हे माहित असल्याने त्यांचा विषय सोडून दिला. काही भटकी कुत्री पेडीग्री खात नाही हा आश्चर्यकारक अनुभव आला.
शेवटी थोडा किरकोळ दानधर्म करून शेकडो पितरांना खाऊ घातल्याने समाधानपुर्वक घरी आलो. यावेळी घरीच असल्याने तो योग नाही. कुणाला इच्छा असल्यास ट्राय करून बघा हा प्रयोग.