सिंधुदुर्ग

Submitted by शितल पवार on 19 May, 2009 - 02:47

प्रत्येक भाषा काही अंतरावर गेल्यावर थोड्याफार फरकने बदलते, त्याच प्रमाणे मालवणी किंवा कोकणी म्हणून ओळखली जाणारी भाषाही कोकणात प्रत्येक भागात वेगवेगळी बोलली जाते. सिंधुदुर्गातल्या कोकणी / मालवणी लोकांसाठी गप्पा(गजाली) मारण्यासाठी हे नविन पान. बरं तर या लवकर आणि सुरवात करा गप्पा मारायला.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरे वा खुप दिवसांनी दिसलो ह्यो धागो. व्हिनस मी जातलय गणपतीक गावाक १७ तारखेक आणि परत २१ तारखेक.
तुमचा काय? विवेक भाउ गणपतीक खय ह्या वर्षी?

रीमा...
'गणपती'क सालाबाद प्रमाणे 'पुण्या'त्(च)...
तुमचो 'गणपती' देखिल 'दीड दिवसां'चो पाव्हणो असता...

कधी येता आणि कधी जाता तो कळनाच नाय...>>>... हां... कारण बाकीचे उरलेले दिवस बिचार्‍याक ठिकठिकाणी सार्वजनीक बनान बसान काढुचे आसतत नां...

अरे म्या पन ठरवतय गावाक येउचा..... दरवर्षी गावचो गणपती ठरलेलो असा ७ दिवसांचो..... मजा येता.... तेवढाच सर्व नातेवाइका एकत्र जमतत..... भेटतत..... बघतय गजालीवर येउचा

अरे इथे कोकण विभाग अन सिंधुदुर्ग धागाही आहे का..

मी सुद्धा सिंधुदुर्गकर !

सासर माझे देवगड तालूक्यात आहे, पण मला मालवणी बोलता येत नाही, म्हणून मी वाचक तूमच्या धाग्याची, म्हणून गजाली वगैरे वाचते, लिहू शकत नाही.

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg