Submitted by कविन on 3 June, 2013 - 01:06
जंगले ही माणसांची
तरी बेट झाली माणसे
भिडती सिमा तरी ना
भेटती ही माणसे
ना जणू आली त्सुनामी
वाहिले नाही जणू
कोरडी इतकी कशाने
आज झाली माणसे?
टाळण्या अपघात येथे
काळजी घेती किती!
राखूनी अंतर स्वतःशीच
चालती मग माणसे
काय ह्यांच्या अंतरंगी?
कोणती ह्यांची लिपी?
वाचता येती न मजला
दुर्बोध इतकी माणसे
मी तरी कोठे निराळी?
जर पाहते परिघातूनी
अन म्हणे का कोण जाणे
कळलीच नाही माणसे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे
छान आहे
छान ..... काहीशी गझलेच्या
छान .....
काहीशी गझलेच्या अंगाने जाणारी कविता.
"टाळण्या अपघात येथे.....माणसे" >>> हे कडवे विशेष.
शेवट छान जमलाय. मस्त कविता.
शेवट छान जमलाय. मस्त कविता.
धन्यवाद मनापासुन
धन्यवाद मनापासुन
मलापण गझलच्या जवळची वाटली.
मलापण गझलच्या जवळची वाटली.
अंजू उकाका <<<+१ हेच सांगायला
अंजू उकाका <<<+१
हेच सांगायला आलो होतो
थोडेफार वृतासाठी व एखाद दुसरा शब्दाचा बदल खयालासाठी केला व महत्त्वाचे म्हणजे ४ ओळीचे कडवे न करता २ ओळीचा शेर केला की होईल ही गझल
तशीही फार छान आहेच ही ..कविता म्हणून
कोणतं कोणतं कडवं कोट
कोणतं कोणतं कडवं कोट करु??
सगळीच्या सगळी कविता आवडली
मस्तच