Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 June, 2013 - 13:40
नको येवूस तू कधी
काही अडणार नाही
तुटुनिया गेली स्वप्ने
शोके रडणार नाही
झेलला मी आहे उरी
तप्त खदिरांगार ही
दु:खे कधीच कुठल्या
आता जळणार नाही
सारे आयुष्य फुंकले
असा खचणार नाही
प्रीतीच्या नाटया तुझ्या
पुन्हा बधणार नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान भाव, प्रत्येक कडव्याच्या
छान भाव, प्रत्येक कडव्याच्या शेवटाकडे थोडे अधिक लक्ष पुरवल्यास अधिक ठाशीवता येईल.. ले.शु.
भारतीताईंशी १००% सहमत मलाही
भारतीताईंशी १००% सहमत
मलाही जरा कमीच मजा आली पण चांगली आहे कविता
भग्न झाली स्वप्न सारी
तरी रडणार नाही <<<<<
माझा एक शेर आठवला ...............
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
~वैवकु
आशय चांगला आहे. भारतीताईंनी
आशय चांगला आहे.
भारतीताईंनी म्हटल्याप्रमाणे मांडणीकडे अधिक लक्ष पुरविणे आवश्यक वाटते.
भारतीताई,वैभव ,उल्हास, तुम्ही
भारतीताई,वैभव ,उल्हास, तुम्ही सांगितल्यावर लक्षात आले .धन्यवाद .थोडा आळस ,थोडी घाई ....
भारतीताई,वैभव ,उल्हास, यांनी
भारतीताई,वैभव ,उल्हास, यांनी दिलेल्या प्रतिसाद नंतर कवितेचे पुनर्लेखन केले . Its better now म्हणजे मला असे वाटते
विक्रांत, आता बेटर आहेच,पण
विक्रांत, आता बेटर आहेच,पण अधिक प्रवाहिता आणण्यासाठी अजून थोड्या अवधानाची गरज आहे असं मला वाटतंय..