दुष्‍काळ

Submitted by मंदार खरे on 15 January, 2013 - 01:20

धरणं रिती झाली नदीत राहीली वाळु
शुष्क झाले अधर अश्रु पिऊन येथे

धरित्रीस पड्ल्या सर्व अंगावर खोल भेगा
सांगाडे फक्त उरले दुभत्या जनावरांचे येथे

बाया बापड्या चालती कोसे दूर अंतरे
गावच्या विहिरीने गाठलाय शिशिरातच तळ येथे

मातेवर आली कशी वेळ ही जिवघेणी
पोट्च्या पोरांस विकूनी भरतेय खळगी येथे

लागली झाडांना इथल्या पुरती आतुन वाळवी
यायचा फुलोरा ज्यांना ऋतुत सार्‍या येथे

राहिले झोपडीत इथल्या आशेवरी काही वृद्ध
सांभाळत गावाच्या उरलेल्या दुष्काळी खुणा येथे

मंदार खरे
mandar.khare@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद!

तुकाराम चित्रपटातल्या दुष्काळावर सुचली

आणि सध्याची परिस्थीतीही तशीच आहे!

धन्यवाद

तुमचीही कविता वाचली छानच आहे

प्राजु यांची श्रावणावरची

कवितेची लिंक मिळाल्यास पाठवावी.....

धन्यवाद