Submitted by अज्ञात on 27 December, 2012 - 02:43
सुखाच्या घडीला, निभावू कसे
निळ्या आसमंती, शशीचे हसे
नसे स्वप्न हे, नाही आभासही
मिटे पापणी ना, असे हे पिसे
स्पर्श अस्पर्श खोल, आत कोषातले
आस वेल्ह्या नभाचे, तरंग वेगळे
ओलवेली तृषा तृप्त, परस अंगणी
कोण गाथा रुधीरास, सांगते भले ?
मनाच्या अवेळा, मनाच्या कला
भाववेड्या दशा, सोबतीला मला
हून पंखात, वारा भरे पोकळी
झेप घेई व्यथा, भंगवून शृंखला
..........................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुर्दैवाने नीटशी समजली नाही.
दुर्दैवाने नीटशी समजली नाही. मात्र सर्वच ओळी स्वतंत्रपणे आवडल्या. धन्यवाद!
(No subject)
पहिले कडवे फार आवडले.
पहिले कडवे फार आवडले.
(No subject)
दुसरे कडवे पहिल्याच्या लयीत
दुसरे कडवे पहिल्याच्या लयीत नसणे व बरेच अगम्यही वाटत असणे यामुळे पहिलेच आवडले असे म्हणत आहे
(No subject)
मलाही व्यवस्थित समजलि नाही
मलाही व्यवस्थित समजलि नाही
समजली नाही.
समजली नाही.
शेवटची ओळ समजली नाही.पण येवढे
शेवटची ओळ समजली नाही.पण येवढे पिसे कसले ? समजले.
छान कविता ...! बाकी बेफिकीर
छान कविता ...!
बाकी बेफिकीर यांच्याशी सहमत..!
शेवटची ओळ समजली नाही.पण येवढे
शेवटची ओळ समजली नाही.पण येवढे पिसे कसले ? समजले.
सत्य आणि आभास या दोहोंच्या मधे, मनात एक परिसर असतो. तिथल्या वावरातल्या ह्या संवेदना आहेत. निसर्गाच्या सौंदर्याप्रती रेखलेल्या ह्या रेषा आहेत येवढंच सांगु शकतो मी.
वाचुन समजायला जरा अवघडच
वाचुन समजायला जरा अवघडच जातेय....