वैभव यांचे रंगीबेरंगी पान

विश्वासघात

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

१९८५/६ चं गिरगाव. अगदी पुलंनी असामी असामीत रंगवल्यासारखं. मे महिन्यातल्या पायरी ।़।़ हापूस पासून ते शहाडे आणि आठवले पर्यंत जसं पुलंनी सांगितलं तसंच. या गिरगावात गोऱ्या रामाच्या मंदिरासमोरच्या गंगाराम खत्री वाडीत मी रहात असे.

विषय: 
प्रकार: 

जागतिकिकरण - मराठी भाषेपुढील आव्हान

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जागतिकिकरणामुळे जगभरात अनेक बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम जसा आपल्या जीवनाच्या आर्थिक आणि सामाजिक अंगांवर होत आहे तसाच तो सांस्कृतिक अंगांवरही होत आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती या बदलांना कशी तोंड देते यावर तिचे भविष्य अवलंबून आहे.

विषय: 
प्रकार: 

पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन नुकतेच सॅन फ्रान्सिस्को - बे एरीयामध्ये पार पडले. या संमेलनाविषयी मला अनेक मान्यवराशी - संमेलनाध्यक्ष गंगाधर पानतवणे, संगीतकार सलील कुळकर्णी, तरुणांचे नेते अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॅा. दा. ग. गोरे - बोलण्याची संधी मिळाली. मी बहुतेकांना संमेलनाच्या वादाविषयी, संमेलनातून काही सकारात्मक निष्पन्न झाले की नाही आणि मराठी साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याविषयी विचारले. त्यांची मते ध्वनिमुद्रीत करुन पॅाडकास्टच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवली आहेत.

विषय: 
प्रकार: 

नितीश कुमार - एक आशादायी सुरुवात

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कधी कधी मन विषण्ण होतं. सगळ्या बाजूने वाईट बातम्याच ऐकायला येत असतात. मुंबईमध्ये दहशतवादी हाहाकार उडवतात. आंतरराष्ट्रीय चित्रपट भारतातील दारीद्र्याचं (सत्य) दर्शन घडवतात. कुणी मित्र नुकताच भारतात जाऊन आलेला असतो. तो तिथल्या भ्रष्टाचाराचे नवीन अनुभव ऐकवतो. निराशेने मन अंधारुन जातं. पण अशा वेळी एखादी बातमी अशी येते की आपल्या आशा पुन्हा पल्लवीत होतात. अंधाऱ्या भुयारातून जात असताना प्रकाशाची लकेर दिसते. पुन्हा एकदा मन स्वप्नं बघायला लागतं - सोन्याचा धूर निघणाऱ्या - ऐतिहासिक पुस्तकांच्या कपाटात लुप्त झालेल्या भारताचं.

विषय: 
प्रकार: 

वसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारताला सत्ताधीश स्त्रियांचं वावडं नाही. संपूर्ण देशात स्त्रियांची परीस्थिती आजही वाईट असली आणि निवडून आलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी असले तरीही भारतीय राजकारणात स्त्रियांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची कामगिरी इतर स्त्रियांमध्ये लक्षवेधक आहे.

विषय: 
प्रकार: 

जग एकसमान आहे - इंग्रजी पुस्तक परीक्षण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नुकतेच प्रसिद्ध पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार आणि न्यूयॅार्क टाईम्सचे स्तंभलेखक श्री. थॅामस फ्रिडमन यांनी लिहीलेले 'The World is Flat' वाचनात आले. जागतिकिकरणाचे इतके चांगले विश्लेषण पहिल्यांदाच वाचायला मिळाले.

प्रकार: 

अविनाश धर्माधिकारी यांचे मुंबई हल्ल्यावरील भाषण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अविनाश धर्माधिकारी यांची मी आपल्याला ओऴख करुन देण्याची गरज नाही. अविनाशजींनी मुंबई हल्ल्यावर पुण्यात केलेले भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे दुवे खाली देत आहे.
ते क्रमाने पहा.

http://www.youtube.com/watch?v=a6sjEG1jFtA
http://www.youtube.com/watch?v=_2Pc2ex8wtc

विषय: 
प्रकार: 

आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आम्ही मुंबईकर
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं
कधी अडवाणीनी आम्हाला खेळवायचं
कधी सोनियानी चुचकारायचं
निवडणूका झाल्या की पुन्हा फेकून द्यायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

कधी आपआपसातच लढायचं

प्रकार: 

सरकार कधी जागे होणार?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कालच्या दहशतवादी कृत्यांनी तरी झोपलेल्या सरकारला जाग येणार आहे काय? किती दिवस हे सहन करायचं? भारताकडे गुप्तहेर खाते आहे काय? आणि असेल तर त्यांना आतापर्यंत एकही दहशतवादी कारवाई रोखता का आली नाहीये?

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - वैभव यांचे रंगीबेरंगी पान