दहा वर्षे झाली गृहिणी बनून.
लग्नाआधी तीन आणि लग्नानंतर चार असा सात वर्षे जॉब करत होते.मग पहिलं मुल प्लस नवर्याची ट्रान्सफर यात करिअर मागे पडले.पहिले मुल तीन वर्षाचे झाले पुन्हा जॉब शोधायला सुरू केले, इंटरव्ह्यू दिले पण परत दुसऱ्या मुलाची तयारी आणि आगमन यात राहून गेले.
दुसरं मुल दोन वर्षाचे झाल्यावर पुन्हा एके ठिकाणी इंटरव्ह्यू दिला,अपॉइंटमेंट लेटर घेतले आणि कपाटात ठेवले आणि पुन्हा घरीच.
आता पुन्हा वाटु लागलेय कि वेळ वाया घालवता कामा नये.
वेळ: सकाळी 8.30
तिकडे बाथरूम चं दार उघडल्याचा आवाज आला आणि इथे स्वप्नाने इडल्यांचा पहिला सेट कुकर मध्ये ठेवला.शक्य तितक्या वेळा कुटुंबाला गरम पदार्थ खायला घातल्यास पदार्थ उरण्याचे चान्सेस कमी होतात.शिवाय गोवेकर बाई म्हणतात ताजं गरम खा, वेट लॉस ची हार्मोन जागी होतात.लॅपटॉप ओट्यावर कोरड्या बाजूला ठेवून जपानची मीटिंग चालू होती. मध्ये इडली चं मिश्रण ढवळत असताना तिला बरेच वेळा 'यु वेअर गोईंग टू क्रिएट इश्यू इन मिदोलो मे' ऐकू आलं.तिने घाबऱ्या घाबऱ्या मैत्रिणीला फोन करून विचारलं.
"अगं हे मिदोलो काय आहे?आता नव्या टूल मध्ये टाकायचे का इश्यू?जीरा कुठे गेलं?"
प्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर concept आहे. ही concept मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.
कोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.
आज झालो भ्रष्ट मी
पसरले माझे दोन हात
पाठीवरती वार करुनि
केला साहेबा कुर्निसात
लावूनी चरणधूळ ललाटी
पकडून धरली गच गोटी
मागे वळूनी पाहतो तर
त्याचीही हिरवी शेपटी
कोण खोटा कोण खरा
हिशेब मनी नाही लागला
ज्याला मी साहेब समजलो
तोपण साला राघू निपजला
=======================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
बाजारात मध्यवर्ती ठिकाणी आमचा एक गाळा आहे. साधारण ८० स्क्वे. फु. जागा आहे. आसपास दुकाने, वस्ती आहे. एखादं झेरॉक्स सेंटरही नाही. तिथे महा ई सेवा केंद्र चालू करता येईल का? असेल तर काय प्रोसेस असते आणि सुरुवातीचा खर्च किती येईल? कृपया कुणाला कल्पना असल्यास सांगा.
१) आत्महत्या आणि आरोप
२००८ मध्ये संदीप शेळके नावाच्या IIT मधून पास झालेल्या सॉ इंजिनेर ने पर्सिस्टन्ट मधून उडी घेऊन आत्महत्या केली होती
नंतर जवळपास एक महिन्यात अजून एकाने नागपुरात राहत्या घरी गळफास घेतला होता ,बातमी आली नाही पण मुक्तपीठ मध्ये आले होते
तसेच एकाने आत्महत्याची चिट्ठी लिहिली होती
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/IIT-alumnus-jumps-to-death...
आरतीसम्राट सीतारामसुत मोहन खामकर नावाचा एक पोष्टमन टपाल खात्यातून निवृत्त होत आहे. आज मोहन नावाचा प्राणी जवळजवळ ६० वर्षाचा झाला. येत्या २७ एप्रिलला षष्टयाब्दीपूर्ती सोहळा आहे. आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जवळजवळ चाळीस वर्षे सकल दुनियेची पत्रे घरोघर पोहचविली. मोहन जेव्हा पत्रे घेऊन सायकलीवर टांग टाकून गल्लोगल्ली अंगात खाकी अंगरखा, डोईवर खाकी टोपी, खांद्याला लटकवलेली खाकी पिशवी. हातात पत्र आणि हातात सायकल. घंटी वाजवून वर्दी देणारा दर्दी पोष्टमन आणि वाट पाहणारा टपालकरी यांच्यातील नाते म्हणजे जिव्हाळ्याचे नाते.
चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे. ती संगीताच्या क्षेत्रात गाण्यांना चाली लावण्याचे काम करते त्याशिवाय तीच व्यक्ती चित्रकारही आहे, तीच व्यक्ती गायकही आहे असे समजू. आता गाण्यांना चाली लावतो म्हणजे तो संगीतकार आहे. पण त्याची लेवल किंवा स्तर किती आहे याचे नेमके मापन कसे करणार? म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे? हे कसे मोजणार?