क्रिकेट

ओळखा पाहू .... एक गंमतखेळ: क्रिकेट

Submitted by स्वरुप on 27 November, 2019 - 04:04

यावर्षीच्या गणेशोत्सवात खेळलेल्या "ओळखा पाहू .... एक गंमतखेळ" या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्या प्रतिसादावरुन प्रोत्साहित होवून हा खेळ आपण असाच पुढे चालू ठेवावा अशी एक कल्पना सहज मनात आली.
यातली रंगत कायम ठेवण्यासाठी दर एखाद महिन्याने आपण सर्वानुमते पुढच्या महिन्यासाठीचा विषय ठरवू शकतो.

अर्थात या खेळातली गंमत पूर्णतः आपल्या सगळ्यांच्या सहभागावर अवलंबून आहे.... गणेशोत्सवात दिलेल्या प्रतिसादाइतकाच भरभरुन प्रतिसाद मिळेल ही रास्त अपेक्षा!

जे लोक हा खेळ आधी खेळले नाहीयेत त्यांच्यासाठी थोडक्यात कल्पना देतो

विषय: 
शब्दखुणा: 

मन बलवान, लागे चट्टान..

Submitted by Barcelona on 7 October, 2019 - 01:54

तिसऱ्यांदा नापास! आता मात्र क्लेयरला काय करावे सुचेना. पण त्याच क्षणी तिने केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी पुन्हा परीक्षा द्यायचे ठरवलं.

गोलबॉर्न हे आजही वीस-बावीस हजार लोकसंख्येचे ऑस्ट्रेलियन गाव. गोरी, गोबरी, सोनेरी केसांची क्लेयर पॉलसॅक गोलबोर्नमधली एक साधारण हायस्कूलर. अशा लहानशा गावात संधीही काहीश्या मोजक्याच उपलब्ध. क्लेयरला क्रिकेट मनापासून आवडायचे. पण लहान गावात मुलींची टीम नव्हती. मुलांबरोबर खेळण्यात क्लेयर आणि तिच्या दोन-चार क्रिकेटप्रेमी मैत्रिणींना अज्जिबात रस नव्हता. टीव्हीवर मॅच बघणे, कधी क्रिकेटवरची मासिके-पुस्तके वाचणे ह्यावर ती आपली हौस भागवून घेत होती.

विषय: 

गुरूची विद्या गुरूला

Submitted by फारएण्ड on 15 September, 2019 - 23:14

ते दिवस अनेकांना आठवत असतील. भारताच्या संघाचा बकरा करण्याच्या ठराविक पद्धती होत्या - परदेशातील विकेट्स, स्पीड, स्विंग, बाउन्स, स्लेजिंग, माइंड गेम्स. विशेषतः परदेशातील दौर्‍यांमध्ये, पण कधीकधी भारतातही. कधी नुसत्या वेगावर, कधी बाउन्सर्सनी जखमी करून, तर अनेकदा पत्रकार, जुने खेळाडू यांच्यापासून ते संघाचे मॅनेजर, कोच यांच्यापर्यंत अनेकांनी संघाला कमी लेखणारी विधाने करून खेळलेल्या माइंड गेम्स.

शब्दखुणा: 

'दरी' वाढताना -- अफगाणिस्तान आणि भारत सामन्याच्या निमित्ताने

Submitted by Arnika on 29 June, 2019 - 06:39

आठवणीतला क्रिकेट विश्वचषक

Submitted by तुषार कुटे on 31 May, 2019 - 14:26

आमची क्रिकेट पाहायला सुरुवात 1993 मधली... याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजला हीरो कप च्या अंतिम सामन्यात हरवलं होतं. त्यानंतर थेट 1996 च्या विश्वचषकात क्रिकेटची आणि आमची गाठ पडली. हा विश्वचषक आहे तसा आठवणीतलाच. श्रीलंकेचा क्रिकेटमधली एक नवी शक्ती म्हणून याच वर्षी उगम झाला. शिवाय केनियाची एन्ट्री ह्याच विश्वचषकातली. उपांत्य सामन्यामध्ये श्रीलंकेकडून झालेली आपली हार कायम लक्षात राहील अशीच होती. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली होती आणि या विश्वचषकाच्या पराभवानंतर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघ बांधायला सुरुवात झाली.

विषय: 

भारत वि. ऑस्ट्रेलिया : २ - १ - उपसंहार

Submitted by रिव्हर्स स्वीप on 7 January, 2019 - 14:39

.... अखेर विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून टेस्ट सिरीज जिंकली.

या सिरीजपूर्वी १९४७ - ४८ सालच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन टूरपासून तब्बल ११ वेळा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज खेळली. यापैकी १९८० - ८१, १९८५ - ८६ आणि २००३ - ०४ या तीन सिरीज ड्रॉ झाल्या तर ८ वेळा भारताच्या नशिबी पराभव आला. या वेळेस मात्र अखेर आपण ऑस्ट्रेलियाला नमवले.

विषय: 

क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

विषय: 

ए सेंच्युरी इज नॉट इनफ- सौरव गांगुली

Submitted by डॉ अशोक on 20 July, 2018 - 21:14

ए सेंच्युरी इज नॉट इनफ
A Century.jpg

विषय: 

आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

विषय: 
शब्दखुणा: 

अच्छे दिन ! सरकार ऑनलाईन बेटींग अधिकृत करणार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 July, 2017 - 03:11

सरकार ऑनलाईन बेटींग अधिकृत करणार !

हे योग्य आहे की अयोग्य?

यातून सरकारला उत्पन्न नक्कीच मिळेल. मात्र लोकं जुगाराच्या आहारी जातील का?
यातून काळ्या धण्द्याला चाप बसेल की आणखी राजरोसपणे गैर धंदे होतील?
दारूने जशी कुटुंब उध्वस्त केली तशी भिती यात नाही का?
ईतर देशांत हे चालतही असेल पण भारताचे समाजजीवन पाहता हे ईथे योग्य ठरेल की अयोग्य?

माणूस जुगारात कसा वाहावत जातो याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. जर हे अधिकृत झाले तर आजवर ज्या कॉलेजच्या पोरांचा हे आवाक्यात नव्हते ते देखील याच्या नादी लागू शकतात का?

Pages

Subscribe to RSS - क्रिकेट