चकवा
खरे तर वाचन म्हणजे माझा जीव कि प्राण, अगदी लहानपणापासून मला हे वेड आहे जे आजपर्यंत टिकून आहे. साधा भेळीचा कागद सुद्धा पुरतो मला वेळप्रसंगी...
‘त्या’ विलक्षण घटनाक्रमाला पण अशीच वरवर पाहता साध्या गोष्टीने सुरवात झाली होती. आपल्या आयुष्यातपण अशा बर्याच चांगल्या-वाईट गोष्टी असतात ज्या वर-वर पाहता साध्या, शुल्लक वाटत असतात पण त्याच शुल्लक गोष्टी वेळ आली कि किती महत्वाच्या होऊन जातात नाही का ?
आईशप्पथ...सव्वा दहा झाले...आज पण बॉसचा ओरडा खावा लागणार. श्या.... मनगटावर असलेल्या घड्याळात नजर घालून कळवळीनं कपाळावर हात मारला, त्यात पण केसांतून तसाच हात फिरवण्याचा मोह नाही आवरला. झपाझप पाउलं टाकत रस्ता क्रॉस केला. आज आकाश मोकळं होतं. बऱ्याच दिवसांनी पाउस उघडला होता. “ह्या गाडीला पण आजच बंद पडायचं होतं....” मनातल्या मनात दोष देत बिल्डींग खाली पोहोचलो. इतक्यात फोनची रिंग वाजली. एकदम धडकीच भरली, लिफ्टने न जाता तड्क पायऱ्यांनी धावत सुटलो. धापा टाकत ऑफिस च्या बाहेर आलो. केसं, इन सावरत दरवाजा उघडून आंत शिरलो. माहौल शांत होता तसा. बॉस आपल्या केबिन मध्ये पेपरात डोके घालून बसला होता.
ऐक ना...
कधीचंच म्हणतेय, तुला पत्र लिहू या... जमून आलंय आज.
तूही जरासा वेळ काढ, सर्रकन नजर मार, मग मग्न हो तुझ्या वैश्विक उलाढालीत...
तू कधी काळी निर्मिलेला एक कण आहे मी.
चालता बोलता... भावनांना जाणणारा...
तुझ्यालेखी यःकश्चित.
मला ना, फार मजा वाटायची....
नव-नविन भावनांशी ओळख होताना, आधी कधीच न जाणवलेलं पहिल्यांदा जाणवून घेताना, वाटत गेलं.. किती सुंदर आहे जगणं...किती रंगबेरंगी!!
भावनांचे गडद- फिके रंग पाहता भूल पडायची..
हरखून जायचे.
रोज नवं काही कळत गेलं.. आनंद मिळत गेला.
मग दु:खाचेही प्रकार कळले.
त्याला स्वीकारलं की सुख मिळतं, हा आता आता मिळालेला नवा धडा आहे.
पार्टी संपली, सगळे डुलत डुलत बाहेर आले. चला पान खाऊ घालतो सगळ्यांना बाब्या म्हणाला. बाब्याने किक मारताच मी उस्मान्या आणि दिल्या त्याच्या मागे आपापल्या गाड्यांना किका मारुन जाऊ लागलो. अजुनही जुन्या जकात नाक्यावरच पानाच दुकान उघड होत. केवळ अंगावरचे कपडे घेऊन आलेला बाबुलाल आता दुकानाच्या वरची दोन फ़्लॅट घेऊन मोठ्ठा पानवाला झाला होता.
मन आलेलं भरुन
अन रितेची हात
जसं उभं एक रोप
जणू उन्हा-पावसात
किती गेले दिस वर्ष
पाय उगाच चालत
नाही दिशा नाही वाट
काही आस नाही आत
आता अडखळे श्वास
आणी गिळवेना घास
सावळसंध्या डोळ्यामधी
दिसे अथांग ती रात
काय केले कुणासाठी
काय गेले की राहुन
सारं आयुष्य जगलो
पाणी जावं जणू वाहून
कधी वाटलं थांबावं
फुला-मुलांत रमावं
सख्या-सोयर्यांच्या संग
आपणही हसावं
पण संसाराचा भार
सदा उद्याचा विचार
सय पायांना चालीची
पुढे जाण्याचा आधार