योग्य निर्णय
निमा आणि विनु शेजारच्या फ्लॅट मधल्या रूपेश दादाकडे आलेले. तिघे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. जवळपास वर्षभरापूर्वी दुसऱ्या शहरातून आपल्या आईवडिलांसोबत रूपेश इथे राहायला आला होता. आपल्या प्रेमळ, मनमोकळ्या स्वभावाने थोड्या दिवसात आसपासच्या सगळ्यांना त्यानं आपलसं केलं होतं. लहानग्यांशी छान मैत्री केली होती. शेजारी राहत असल्याने विनू व निमाशी तर त्याची खास गट्टी जमली होती.
" वर्षभरात आपण खूप मज्जा केली ना. " निमा उत्साहाने बोलत होती. " मकर संक्रांतीला, होळीला, रंगपंचमीला, गणपती बसवल्यावर. दादा यावेळी तू असल्यामुळे आम्हाला अजूनच मजा आली."
गो केकू गो!
“रावडी केशव कुलकर्णी(केकू)”
Fully Configured.
Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session.
ID No. ID zx 120 2792023 T=00
“Go Keku. Go.”
आजकाल मी गुरुजींना मॉर्निंग वॉकला घेऊन जायला सुरुवात केली. ते बरोबर आले तरी फारसे बोलत नसंत. किंबहुना बोलतच नसंत, असं म्हंटलं तरी हरकत नाही. पण एकतर्फी संवाद झाला,तरी मी तो चालू ठेवीत असे. कधी कधी ते रडवेला चेहरा करीत.कधी किंचित हसत.पण खळाळून हसत नसंत. अजूनही त्यांना आणल्याचा पश्चात्ताप होत नव्हता. कदाचित तो दिशाला होत असावा. पण ती माझ्या भीतीने बोलत नसावी. आता गुरुजींना येऊन महिना होत आला. माझी मुलं सुद्धा त्यांना आजोबा म्हणून हाक मारीत असंत. ते माझ्याकडे अनोळखी माणसाकडे पाहावं तसं पाहात.
पु. लं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. काही पुस्तके, कादंबऱ्या भावनिक करतात. अंतर्मुख करतात, तर काही खळखळून हसवतात. मात्र पु. लं हे असे लेखक होते. ज्यांची पुस्तके, कादंबऱ्या वाचताना कधी हसता हसता डोळ्यांतून अश्रू येतात. कधी एका क्षणी त्यांच्याच शब्दांनी गंभीर, जरासं अस्वस्थ झालेलं मन पुढच्याच क्षणी त्यांच्याच शब्दांनी हलकं होऊन जातं, आणि ओठांवर हलकंसं स्मित उमटतं.
•••••••
साहित्यिक पु. लं
मान्यता !.. (एक अंकी नाटक )
प्रवेश पहिला
स्थळ : ( कै. अरविंद जातेगावकरांचा बंगला , जुन्या पद्धतीने सजवलेल्या भल्या मोठ्या दिवाणखान्यात पितळी कड्या असलेल्या झोपाळ्यावर जातेगावकरांची धाकटी मुलगी मयूरी हलके हलके झोके घेता घेता पुस्तक वाचते आहे , तिच्याच समोर त्याच झोपाळ्याच्या पितळी कडयांना टेकून ,पाय लांब करून बसलेली तिची वाहिनी ईशा लॅपटॉप वर काही कामे करते आहे ,तिच्या गोऱ्यापान नाजूक पायातले पैंजण तिच्या हालचाली बरोबर मध्येच किणकिणत आहेत )
दिवाळी
शब्दांकन : तुषार खांबल
१. धनत्रयोदशी
घरात अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या रमेशला आज त्याच्या मुलांनी दिवाळीच्या खरेदीसाठी भंडावून सोडले होते. “संध्याकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होईल” असे खोटे आश्वासन देऊन रमेश घराबाहेर पडला खरा; पण परत कधीही घरी न जाण्याचा निर्णय घेऊनच. आपल्या कुटुंबाच्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, काय करायचे असे जगणे, हा विचार आज सतत त्याच्या डोक्यात घोळत होता आणि तसाच तो मिळेल त्या मार्गाने पुढे जात होता.
माझे विचार थांबेनात.ज्याअर्थी गुरुजींना इथे नसलेला सदाशिव दिसला आणि ते त्याच्याशी बोलत होते. याचा अर्थ त्यांना भास होत होते. खरंच दिशाचं म्हणणं ठीकच आहे.पण मानसोपचार तज्ज्ञ माहिती असणं आणि डॉक्टर माहिती असणं यात फरक आहे.तरीही मी चवकशी करायचं ठरवलं.ऑफिसला गेलो.जाताना गुरुजींना प्रेमाने झापून गेलो आणि वेळेवर जेवण्याचं वचन घेऊन गेलो.कामात दिवस कसा गेला कळलं नाही.संध्याकाळ झाली.काम चालूच होतं.आज तरी मी नऊच्या आत घरी जाणार नसल्याचं जाणवलं.एका मिटिंगसाठी बसलो होतो.चर्चा रंगात आली होती.अचानक दिशाचा फोन आला.मी बाजूला जाऊन वैतागून घेतला." काय आहे ? मला उशीर होणार आहे.तुम्ही जेऊन घ्या.
--------- स्टॅंडवर एसटी उभी होती. ऐन उन्हाची वेळ. मी गेली पंधरा मिनिटे आत बसून होतो. अडीचची एसटी पावणेतीन झाले तरी सुटत नव्हती. गावातल्या घराची विकटीक करून मी मुंबईला निघालो होतो. आई-वडील गेल्यापासून घर रिकामं पडलं होतं. गावात घर भाड्याने देऊन फारसं भाडं येणार नसल्याने मी ते रमणिकशेटला विकून आलो होतो. थोडंफार गलबलल्यासारखं झालंच होतं.नाही म्हटलं तरी ग्रॅज्युएशन पर्यंत मी तिथे दिवस काढले होते. गावाचा अखेरचा निरोप मी एकट्यानेच घेतला. माझी बायको दिशाला मी सोबत घेतलंच नव्हतं.