संध्यासमयीच्या विझत्या सोनेरी किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दिवसभर तळपणारे रविराजही आता श्रांत, क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेनी मार्गक्रमण करत होते. तसं पाहता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. या अहोरात्र चालणाऱ्या प्रवासाची त्यांना सवय होती. रोज संध्यासमयी या सृष्टीचा निरोप घेताना मनात एक ओढ असायची - दुसऱ्या दिवशी पुन्हा परतून येण्याची… आपल्या सहस्त्ररश्मी पुन्हा एकदा धरतीवर विखुरण्याची ! पण आज मात्र रविराजाचं मन जणू छिन्न-विच्छिन्न होत होतं ; आक्रंदून स्वतःलाच विचारत होतं…'आता उद्यापासून कोणासाठी परतून यायचं ? आपलं हे ओजस्वी अस्तित्व कोणाला दाखवायचं ?
आज हॉस्पिटलचा दिवस. थोडी तयारी केली. एक जुनी फाईल शोधून जवळ घेतली. त्यात कुणा डॉक्टरच्या गिचमिडी हाताने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन होते.
कसलीतरी टेस्ट करायची होती. का? डॉक्टरला काहीतरी संशय आला होता म्हणून.
हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर मला कुणा स्वागतिकेला विचारायची गरज नव्हती मला सगळे प्रोसिजर माहित होते. लिफ्ट पकडून मी ज्या मजल्यावर जायचे होते तेथे गेलो. काऊंटरवर जाऊन पैसे भरले. फी दणदणीत होती. रोग होताच तसा लई भारी. काऊंटरवालीने सांगितले, “ह्या रूममध्ये जाऊन थांबा.”
एकूण चार तास वाट पहावी लागेल म्हणाली.
पाण्याची बाटली आणली आहे?”
“हो ही काय.”
मी , आधीच चिठ्ठी सापडत नव्हती म्हणून अस्वस्थ होतोच त्यात, इन्स्पेक्टर म्हणाले होते, आरोपी सापडलाय. एवढ्या लवकर यांना आरोपी कसा सापडला ? माझ्या मनात असं आलं म्हणून गैरसमज करून घेऊ नका. एवढं सगळं तुम्हाला सांगितल्यावर ,माझा या घटनेशी काहीच संबंध नव्हता हे पटलं असेलच .निदान तुम्ही तरी नक्कीच विश्वास ठेवाल.......मग मला अचानक वाटलं, पोलिसांनी हा गुगली तर टाकला नव्हता. पण मी ती शक्यता झटकून टाकली ,कारण माझा अजून तरी पोलिसांवर थोडा विश्वास होता. बघता बघता,गाडी पो. स्टेशनच्या आवारात शिरली. मी घाईघाईने इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिनमधे शिरलो. ते वाट पाहातच होते. त्यांनी बसण्याची खूण केली.
साल अमुक अमुक. महिना तमुक तमुक. स्थळ पुणेच. आणि शक्यता बहुतेक कॅन्सरची. एक महिना वाट बघितली. पण एक विशिष्ट लक्षण कमी होत नव्हतं. वाटलं, एवढ्यातच आपलं वरचं तिकीट कन्फर्म झालं की काय?
मग येतं वागण्या-बोलण्यात विलक्षण परिवर्तन. एरव्ही आपण कितीही आव आणत असलो तरी मृत्यूची भीती ही सगळ्यात प्रायमल भीती. ती खतरनाक ट्रान्सफॉर्म करते माणसाला. भलेभले गळाठतात, आपण काय चीज?
महिनाभर इंटरनेटवर शोधाशोध करण्यात, मनाची समजूत काढण्यात वेळ काढला.
आवराआवर निरवानिरव कशी करायची ह्याचे अतिरंजित आडाखे बॅकमाईंडला. ते तसेही काही सुचू देत नसतात. शिवाय वरवर सगळं नॉर्मल आहेसं दाखवणं भाग.
शोक
साहित्य क्षेत्रात जगन्मित्र असलेल्या प्रसिद्ध आणि प्रतिभासंपन्न साहित्यिकाच्या अचानक आणि अवेळी झालेल्या निधनाने मी सुन्न होऊन गेलो होतो. माझा आणि त्यांचा खूपच जवळचा, घनिष्ठ संबंध होता.
प्रोफेशनल फोटोग्राफर आणि तोही साहित्य क्षेत्राशी सदासर्वदा निगडित असल्यामुळे तसं विनयाने सांगायला गेलं तर मीही जगन्मित्रच होतो. साहित्य क्षेत्रात... त्यामुळे आता या साहित्यिकाच्या निधनाची बातमी कन्फर्म करण्यासाठी, त्याबद्दल दुःख आणि शोक व्यक्त करण्यासाठी मला फोन येण्याचा ओघ चालू होणार असं मला अपेक्षित होतंच, आणि घडलंही तसंच.
संबंधित व्यक्तींची आणि हॉस्पिटल/बँकची नावं बदलून लिहिलेली ही एक सत्यकथा आहे.
ह्या सत्यकथेला दोन पार परस्परविरोधी अंगं आहेत -- एक "स्वर्गकथे"चं, आणि दुसरं "नरककथे"चं.
--------------------
त्यांपैकी "स्वर्गकथा" अंगातल्या दोन व्यक्ती शुभा आणि माझी ताई.
शुभा.
वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्या आईवडिलांनी लग्न करून दिलेली आणि नववीपलिकडे लौकिकार्थाने "शिक्षण" घेण्याची संधी कधीच न मिळालेली, पण कमालीची बुद्धिमान, अतिशय सुसंस्कृत, अतिशय विचारी, आणि अतिशय थोर मनाची अशी ३९ वर्षांची शुभा. ('अतिशय" हे क्रियाविशेषण अव्यय मला तीनदा वापरावंच लागलं आहे.)
*लढाई*
नेहमीप्रमाणे अपेक्षित टार्गेट पूर्ण न झाल्याने बॉसचे फायरिंग ऐकून जड पावलाने बँकेबाहेर पडलो. रोजचंच होतं हे.
राजकुमार हिरानीचे नाव वाचून डंकी बघितला. शाहरूखचे चित्रपट आवडत नाहीत असे नाही पण आवडतात असेही नाही. त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी "शाहरुखचा चित्रपट आहे" यापेक्षा "राजकुमार हिरानीचा आहे" हे कारण होते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या चित्रपटाचे वाचलेले परीक्षण (वजा जाहिरात), हे मुख्य कारण होते. युरोप अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणारे कोणत्या प्रसंगातून जातात याची आधीच साधारण कल्पना होती. आणि याचे वर्णन या परीक्षणात आले होते.
' आणखी एक वर्ष सरले
नव्याच्या स्वागतास जग सज्ज जाहले,,,,, ' त्या निमित्ताने जे सहजच मनात आले -
सन २०२३ जणू त्याचे क्षणभंगुर अस्तिव राहिल्याची साक्ष देत आपला निरोप घेत चालते झाले आहे . खरेतर हा एक कालचक्राचा अविरत चालणार खेळ . दिवस उगवतो दिवस मावळतो पण वर्ष सरत आले कि जी हुरहूर मनात दाटते त्या मनःस्थितीला शब्दात मांडणे खरेच कठीण जाते.
शुभं भवतु
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो आणि त्याच्याशी संलग्न माहिती वाचण्यात आली. अर्जेंटिना मधे एक कृष्णभक्त प्रत्येक वेळी प्रवास करताना स्वतः बरोबरच श्रीकृष्णाचं देखील तिकीट काढतो. त्या फोटोत दाखवल्याप्रमाणे विमानात आपल्या शेजारच्या सीटवर त्याने श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली आहे; इतकंच नव्हे तर त्याने श्रीकृष्णाच्या डोक्याखाली उशी आणि त्याच्या अंगावर (म्हणजे मूर्तीवर) ब्लँकेट घालून श्रीकृष्णाचा प्रवास सुखकर होईल याचीही काळजी घेतलेली दिसते.