Healthy बाप्पा!!!
असे काही लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे.काही चुकले असल्यास कृपया सांभाळून घ्यावे.
धन्यवाद!!!
असे काही लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे.काही चुकले असल्यास कृपया सांभाळून घ्यावे.
धन्यवाद!!!
आज अभी येणार आहे भेटायला. काल फोनवर महत्वाचं काहीतरी बोलायचय म्हणाला. कॉलेज, इंटर्नशीप बुडवून येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. आज मुद्दाम मी त्याच्या आधीच तिथे जाऊन पोहोचलेय. इथे उभं राहिलं की कॉलेजच्या गेट बाहेरचा रस्ता अगदी लांबपर्यंत दिसतो.
ह्या सगळ्याला सुरुवात झाली ते कॉलेज जॉईन केल्याच्याच वर्षी. त्याच्यावर क्रश होता म्हणा ना. पण तेव्हा हे फक्त माझ्या आणि संयुक्ता मधेच होतं. सुरूवातीला त्याचं नावही धड माहीत नव्हतं आम्हाला.
तेव्हाचा नाव जाणून घेण्याचा प्रकार आठवून सुद्धा आता हसायला येतं.
(पुढचा भाग जरा मोठा आणि शेवटचा असल्याने हा भाग मुद्दाम लहान लिहिला आहे.)
भाग ८- https://www.maayboli.com/node/63785?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C7880406050
प्रतिशोध
भाग - ९
प्रसंग १
स्थळ: काव्याचं घर
"काव्या , गौरव जेवण तयार आहे,
किती वेळ गप्पा मारणार आहात?"
जवळपास 3 तास गप्पा मारत असलेल्या दोघा बहिण-भावांना आईने आवाज देऊन बाहेर बोलावलं.
"मम्मी पप्पा नाही आले अजून?"
आईला ताटं वाढताना मदत करताना काव्याने विचारलं.
श्रावणधारा
गुजरातचा पाऊस फारच लहरी, मृग नक्षत्राची ७ जून तारीख
सरून गेली तरी पावसाला त्याच्या येण्याची फिकीरच नसते. अहो ! 7 जून काय ? 7 जूलै झाली तरी कित्येकदा पत्ता च नसतो .तसा वळवाचा, गारांचा पाऊस पडून जातो म्हणा कधीतरी.
'मुझे इधर मारा... पकडो उसको... मुझे मारा है'... आपला थरथरता, अपंग हात खांद्यावरून मागे नेत तो कळवळून बोलत होता.
'कौन है, वो, किधर है?'... सोबतच्या ब्रदरने त्याला विचारलं आणि हवेत कुठेतरी बोट दाखवत तो भेसूर हसला...
काही वेळानं शांत झाला.
त्या दोघांमधला हा संवाद. नेहमीचाच.
आसपासच्या खाटांवरचा प्रत्येकजण आपल्यातच गुंतलेला दिसत होता. कुणी बसल्या जागी डुलत होतं, कुणी हवेत हातवारे करत होता, कुणी तोंडाने विचित्र आवाज काढत डोळे फिरवत होता, कुणी उभ्याउभ्या नाचत होता...
ते दृश्य केविलवाणं होतं.
कोकणात आगर म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर. अलिबाग साईडला वाडी ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तोच आमच्या भागात आगर ह्या शब्दाला.
आमचं आगर खूप मोठं आहे. पण आमचं घरच उतारावर असल्याने आगर ही तीन लेव्हल वर आहे . प्रत्येक लेव्हलला पाच सहा तरी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात आगरातल्या सगळ्या वाटा कोकणातल्या अति पावसामुळे उखडल्या जातात म्हणून दिवाळी पूर्वी सगळ्या वाटा चोपण्याने चोपून, शेणाने सारवून नीट केल्या जातात. दिवाळीत या वाटांवर पणत्या ठेवून त्या उजळल्या ही जातात . एरवी मात्र आगरात रात्री अगदी मिट्ट काळोख असतो.
प्रतिशोध भाग-८
भाग ५ - https://www.maayboli.com/node/63455?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C8512677730
भाग ६ - https://www.maayboli.com/node/63504?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C1914884605
भाग ७
"दादा स्वरा अजून कशी नाही आली,
कॉलेज हॉस्टेलवरून इथे यायला इतका वेळ नाही लागत रे दा.
ती ठिक असेल ना?
"तिला कॉल कर आणि विचार ग वेडाबाई.."
अहो ऐकताय ना?.."
" नाही.. कानात तेल ओतलयं मी.."
" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.."
" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?"
" ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?"
" काय आहे?..."
" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.."
" मग?.."
" मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.."
" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.."
" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.."
" बरं मग, तू जाऊन ये "
" मी एकटी नाही जाणार.."