मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
गद्यलेखन
.
चित्रावरून लिखाण- मुखवटा
माझ्या स्वतःच्या नजरेत मी कायमच उच्च स्थानावर राहिलेलो आहे. मी कायम सर्वांना समान वागविणारा आणि कोणतेही भेदभाव न मानणारा आहे, मी कोणालाही त्यांच्या आर्थिक परिस्थिती वरुन, रंगरुपावरुन, राहणीमानावरुन जज करत नाही, ते बघून त्यांच्याशी मैत्री करत नाही, संबंध ठेवत नाही, माझ्या साठी सगळे समान आहेत वगैरे वगैरे. पण आपणच स्वतःला ओळखण्यात अनेकदा कमी पडतो. एखाद्या प्रसंगात आपल्याकडून अशी कृती घडून जाते की ती घडून गेल्यावर आपल्याला वाटतं की शी: मी हा असा कसा वागलो. मी माझी एक छान प्रतिमा माझ्या मनात उभी केलेली आहे आणि स्वतःला मखरामधे बसवून ठेवलेले आहे.
माझा लेखन प्रपंच!
माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे.
अपहरण - भाग ६
द्वेष : एक भय गूढकथा, भाग ९
वेळ हळू हळू पुढे सरकत होता. अस्वस्थता... चित्त विचलित करणारी. शिवाय या अस्वस्थतेसोबत काहीशी भीतीही होतीच. ' करावं तरी काय ?' - राजाभाऊंना उमजत नव्हतं. ते फक्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते. निष्फळ प्रयत्न. परिणाम काही नाही. उलट हे मळभ कणाकणाने दाटतच चाललं होतं.
चित्रावरून लिखाण - पाणीच पाणी..
पाणीच पाणी..
चार दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत होता. मध्ये मध्ये पाऊस जर्रा कमी झाल्यासारखा वाटला, तेव्हा चंदाने बाहेर डोकवायचा प्रयत्न केला, पण पावसाची रिपरिप अखंड चालूच होती. बाहेर सगळा चिखल झाला होता. खिडकीच्या एवढ्याशा फटीतून सगळीकडे वहाणारं पाणी दिसत होतं.
बाहेरच कशाला, आता खोलीतही पाणीच पाणी दिसत होतं, आणी ते कसं आवरावं हे तिला कळत नव्हतं. तिचं घर म्हणजे होतंच काय..? तर जेमतेम दहा बाय दहा ची ही एवढीशी खोली.
अपहरण - भाग ५
आमचे धोत्रे गुरुजी (भाग ७)
अजूनही हवी तशी पक्की माहिती मिळत नव्हती.आम्ही हॉटेल वर परत आलो. विचार करता करता लक्षात आलं की त्या दिवशी मला दम देणारी माणसं शंकरभैया ऊर्फ शंकर पाटलाची होती. दोनतीन दिवसात फार काही साधेल असं वाटत नव्हतं. मलाही माझी नोकरी होती.बॉससुद्धा फार दिवस जमवून घेईल असं वाटत नाही.असो..... आता शंकर पाटलाचा वाडा शोधला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे झाल्यावर देखणे आणि पवार यांना न सांगता मी स्वतःच भटकायला निघालो. तसं आता बदलेलं गाव मी फारसं पाहिलं नव्हतं. भिडे आळीतून जाता जाता बरीच आरसीसी कन्स्ट्रक्शन दिसली. आमच्या वेळी जिथे जंगल होतं तिथे घरं दिसली.
गर्वहरण
सुश्रुतला रोज रोज सांगून आता गोष्टींचा ऐवज संपायला आला आहे. ‘एकीचे बळ’, ‘जशास तसे’, ‘दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ’ अश्या नेहेमीच्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आहेत. आता कधी कधी याच अर्थाच्या नवीन गोष्टी रचाव्या लागतात. परवा ‘गर्वाचे घर खाली’ या तात्पर्याची अशीच एक नवीन गोष्ट तयार केली.