एका सुंदर कार्यक्रमाहून परतत होते. गवयाचा गळा तापतो तशी माझीमाझीच मनाची मैफलही रंगली होती. त्याच तंद्रीत सिग्नलला उभी असताना अचानक एक अगदी टिपेचा चिरका स्वर कानावर पडला. थांबलेले सगळेच चमकून पलिकडच्या फुटपाथकडंं बघायला लागले आणि तिथंच खिळले. मीही रेंगाळलेच क्षणभरासाठी, खोटं का बोला, पण नशिबानं झटकन भानावर येऊन मान वळवली.
कॉन्फरन्स रूममधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. आरती आणि मनोज सध्या तिच्या टीमसाठी काही जणांचे इंटरव्यू घेत होते.
ती बोलत होती,"'अरे मॅगी करता येतं का?' हा काय प्रश्न आहे का कॅन्डीडेटला विचारायचा?".
"अगं पण तो बघ की? म्हणे माझा व्हिसा आहे तर ऑनसाईट कधी जायला मिळेल? इथे नोकरीचा पत्ता नाही अजून आणि डायरेकट ऑनसाईट? मग म्हटलं विचारावं तिथे जाऊन जेवण बनवता येईल की नाही ते. बरोबर ना? निदान सर्व्हायव्हल स्किल्स तरी पाहिजेत का नको?", मनोज.
"बिचारा किती विचार करत होता काय सांगायचं म्हणून. मग एनीवे हा पण नको का?", आरतीने विचारलं.
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.
"Everything is fair in love n war!"
"होका?" डोळे वटारत तीचं विचारणं.
"गप गं तुला काय माहीती प्रेम काय असतं ते?"
"बरं मग एक सांग कोण आहे ती भाग्यवान?" खांदे उडवत तिनं म्हटलं.
"नको."
"ए चल मग काहीही नको बोलत जाऊ. काय तर म्हणे मी प्रेम करतोय. मग तिचं नाव सांगायला का लाजतोस?"
आता कसं सांगू हिला 'ती' म्हणजे तूच आहेस ते.
"ए माझा इगो हर्ट नाही करायचा हा. माझ्या स्वप्नातल्या राजकुमारीला नावे नाही ठेवायचीत,काय?" माझं दरडावणं.
"लगी आज सावन की फिर वो झड़ी है।
वही आग सीने में फिर जल पड़ी है।
कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे।
चमन में नहीं फूल दिल में खिले थे।
े
वही तो है मौसम मगर रुत नहीं वो..
मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"
दरवेळेस पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?.कदाचित..
का गं अशी अचानक सोडून गेलीस मला?..असं मध्येच मला एकट्याला सोडून जाण्यासाठी का आपण एकत्र आलो होतो?..आज आठवतंय सगळं अगदी पहील्यांदा तुला कॉलेजमध्ये पाहून माझं मन तुझ्यावर 'लट्टू' झालतं त्या क्षणापासून ते आजवर घडलं आणि घडवलं गेलेलं जसंच्या तसं आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात..कसा गं आवर घालू या भावनांच्या कल्लोळाला?..कुठं गं शोधू सखे तुला?..तुझ्या आठवणींत रमणं हा तर आता एक छंदच होवून बसलाय...
Note:
Ayushyatala kahi tari lihinyacha pahilach prayatna....kahi chuk asel tar pls sanga kiva agadich vait lihila asel tarihi sanga mhanje punha lihinar nahi.....tumche lekh vachun lihavasa vatala mhanun lihila ahe.....
“Tuze dole ajunahi vachata yetat mala…” tyachya bolnyane ti bavarli… 3 varshane te doghe punha bhetat hote…..manachi ghalmel punha tashich hoti…
भाग १- http://www.maayboli.com/node/62743
बेडरूमचं दार बंद झालं आणि दोघेही एकमेकांकडे पाहून आनंदाने चित्कारले. त्याने तिला दटावून तोंडावर बोट ठेवलं. तरी तिच्या मनातला आनंद आणि चेहऱ्यावरचं हसू कमी होत नव्हतं. घुसळून ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्यानेही तिला प्रेमाने थापटलं. प्रेमाचा भर ओसरला तसे दोघे गादीवर बसले. ती त्याला चिकटून बसली आणि तो जरा भानावर आला.
म्हणाला,"जरा लांबच बसा दीपा मॅडम. मी एकदम सभ्य मुलगा आहे, मघाशी ऐकलंस ना?".