कुणी कुणाचे नाही
रात्री खूप वेळ संगणकावर काम केल्याने थकलो होतो. सकाळची वेळ. नुकताच झोपेतून जागा झालो होतो. घरात नेहमीप्रमाणे रेडिओवर जुनी गाणी लागलेली होती. वातावरणामुळे खरखर असली तरी गाण्याचे बोल स्पष्ट ऐकू येत होते. जिव्हाळा या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेले ते गीत होते. अंथरुणावर पडूनच मी गाणे ऐकत होतो. ग.दि. माडगूळकरांनी लिहलेले व सुधीर फडकेनी गायलेले गीत माझ्या मनास खूपच भावले. गीताचे बोल असे होते-
“लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई,
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही.
पिसे, तनसडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे
गालावर तिच्या पापण्यांच्या सावल्या पाहत
मी अनेक तास घालवले आहेत,
झोपेत तिच्या ओठांवर खेळणारं निरागस स्मित
माझ्या मनाला शांत करून गेलंय....
छातीशी घेऊन थोपटत झोपवायचे,
तास लागला तरी वाटायचं
तिने इवलसं, लहानच राहावं कायम
पण आता ती कुशीत तरी कुठे मावते ?
लहानमुलांना दुस्वप्न कधी पडायला लागतात?
त्यांच्या बालपणातच कपाळावर काळजीच्या आठ्या उमटतात?
अज्ञाताची चाहूल लागून ती झोपेतही
आईची मुठ घट्ट पकडून ठेवतात ?
माझ्या मनातले अनेक अक्राळ विक्राळ विचार
अंधाऱ्या भिंतीवर नाचत –मला जागं ठेवतात...
अति लोभाचे फळ
राघव नावाचा एक गरीब कोळी गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीकाठी रहात होता. त्याचे घर अगदी साधे होते. नदीत मासे पकडायचे व ते गावात नेऊन विकायचे हा त्याचा उद्योग होता. या व्यवसायावर तो स्वतःची व पत्नीची उपजीविका करीत असे. त्याची पत्नी धूर्त होती. तिला गरिबीत राहणे पसंत नव्हते. तिच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या.
.
.
गोष्ट एका बजेटची
हुबालवाडी गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब होते. तस पाहिलं तर जेवून खाऊन सुखवस्तू असणाऱ्या पैकी हे एक कुटुंब. स्वतःचे तीन खोल्यांचे राहत घर. शासकीय अनुदानातून शौचालय बांधून घेतलेलं. दोन मुलं त्यांच्या बायका, दोन मुली अन गण्या व गंगी अस आठ जणांचं दणदणीत कुटुंब. घरात टीव्ही, डायनिंग टेबल, वॉशिंग मशीन या साऱ्या सुविधा. दोन्ही मुलं कमावती. दोन मुली कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. पैका अमाप मात्र खर्चाच्या बाबतीत कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. गण्या व गंगी इचार करायची की इतका पैका मिळून तो पुरत कसा नाय.