marathi story

“कालचक्र- एक आठवणीतली गोष्ट”

Submitted by प्रतिक सोमवंशी on 1 July, 2019 - 02:38

आम्ही चार भावंडे मी, गण्या, विण्या,आणि पप्या, पंधरा सोळा वर्ष्याची असू तेंव्हाचा हा प्रसंग. तेंव्हा मस्त पाऊस पडायचा, गावाकडचे डोंगर हिरवा शालू नेसून पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज असायचे. आमच गाव तस डोंगरांच्या मधोमध वसलेले, एक नदी गावाला वळसा घालून पुढे जायची, तिला बारमाही पाणी असायच. त्यामुळे दुष्काळ वगैरे काय भानगड असते आम्हाला ठाऊकच नव्हतं. डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यांवरून उड्या मारत मारत शाळा गाठायचो, चिखलाने माखलेल्या चपला शाळेच्या प्रांगणात सोडून एकदा वर्गात बसल की थेट संध्याकाळीच घरी, तशी शाळा मात्र दुपारीच सुटायची पण मित्रांसोबत इकडे तिकडे भटकत फिरायचो.

घात (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 23 June, 2019 - 06:49

(व्हाट्सॲपवर पूर्वप्रकाशित)
...................................................................................

"मला वाच...."
सोमनाथ एवढचं म्हणू शकला, मग तो खोकू लागला.
मला वाच...का मला वाचव? याला नेमकं काय म्हणायचं?
सोमनाथची खोकल्याची उबळ कमी झाली, त्याच्या आईने त्याला पाणी दिले, तो खोकत कसंतरी पाणी पिऊ लागला, खोलीभर औषधांचा वास पसरला होता. मी सोमनाथकडे बघितले, त्याच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या, गालफड बसली होती, चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या, केस गळून पडले होते, हातापायांच्या काड्या झाल्या होत्या.

काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप

Submitted by चैतन्य रासकर on 27 September, 2017 - 13:47

काथ्याकूट (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 8 September, 2017 - 16:17

"डिव्होर्सच कारण काय होतं?"
"इराचं अफेअर होतं ना"
"अफेअर? सवालच नाही!" नीरव म्हणाला.
मी नीरवकडे बघितले, एवढा आत्मविश्वास? कसा काय? एखादा माणूस जर ठामपणे एखादी गोष्ट सांगत असेल, तर विश्वास ठेवायचा?
"अनिकेतचं अफेअर आहे" नीरव पुढे म्हणाला.
"कशावरून?" नित्याने विचारले.
"मला इरा म्हणाली" नीरव म्हणाला.
"कधी?" मी विचारले.
"सात-आठ महिने झाले असतील" नीरव म्हणाला.

अफेअर म्हणजे भ्रष्ट्राचार! कोणाचं कुठे चालू आहे, माहित नसतं, पण चालू लोकांचा चालू असतो.

निद्रानाश (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 20 July, 2017 - 18:39

मला आज नेहमीसारखी झोप येत नव्हती.
रात्रीचे अकरा वाजले होते, दहा वाजल्यापासून, मी बिछान्यावर लोळत होतो, मग मोबाईल सुरु केला, फेसबुकवर पस्तीस फ्रेंड्स ऑनलाईन होते, हो मी मोजले, तेवढाच टाईमपास!! पण मी कोणाला मेसेज केला नाही, मागच्या आठवड्यात, ऑनलाईन असलेल्या मोजून दहा लोकांना "हाय" असा मेसेज पाठवला, तर चार जण आपोआप ऑफलाईन झाले, दोघांनी रिप्लाय दिला नाही, तर उरलेल्या चार लोकांनी मला ब्लॉक केले, हा शॉक माझ्यासाठी फार मोठा होता.

Subscribe to RSS - marathi story