मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
राजकारण
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु भारताने विकत घेण्याचे ठरवुन एक चांगला निर्णय घेतला आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जागतीक शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेला गेलेले असताना या संबंधीच्या काही तांत्रीक गोष्टी मार्गी लागल्या आणि केंद्र सरकारच्या वतीने लेटर ऑफ इंटेंड देऊन सरकारने ही वास्तु खरेदी करण्याचा निर्णय मार्गी लागला.
अखेर निवडणुकांचा खर्च जाहीर झाला.
२०१४ हे वर्ष तसे खास वर्ष राहिले आहे. मागच्या साठ-पासष्ठ वर्षापासून सेक्यूलरवादाच्या नावाखाली चाललेल्या राजकारणाला मोदीच्या रुपात आव्हान मिळाले. मोदीचे नाव जाहीर होताच बाहेरच्यानी तर ओरडा केलाच पण खुद्द पक्षातल्या ज्येष्ठानी सुद्धा नापसंदी व्यक्ती केली. पण मोदी गटानी सगळा विरोध झुगारून टाकत आपले म्हणणे दामटले. जोडीला संघ उभा राहिल्यावर मोदीनी जी भरारी घेतली ती चक्क संसदेत बहूमत हाशील करुनच दम घेतला. सेक्यूलर माध्यमे व देशातील विद्वान मंडळी आता मोदीच्या विजयाचे कोडे सोडवत बसली आहेत. कुणाला वाटते की मोदीची लाट होती तर कुणाला वाटते काँग्रेसच्या प्रतापांचा हा परिणाम होता.
जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़क नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते.
तरीही अशी कृती केली जात नाही. ते का?
ईसीस ! जगासाठी नविन खतरा !
शिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी
आणि दाऊदवर गोळी चाललीच नाही!
प्रमाणे अमेरिकेने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारले होते तशाच प्रकारे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला ठार मारण्याची संधी भारताकडे चालून आली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला हे मिशन रद्द करण्यात आल्याने १९९३च्या मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आजही पाकिस्तानात मोकळेपणे फिरत आहे.
भारतीय महिला राजकारणात कमी रस घेतात का? आणि का?
शीर्षक फारसे वाढू नये म्हणून फुल्ल वर्जन नाही लिहिले, पण ते वाचताना, असे वाचावे -
भारतीय महिला राजकारणात "पुरुषांच्या तुलनेत" कमी रस घेतात का? आणि उत्तर हो असल्यास तसे का?
किंवा
प्रत्येक नागरीकाकडून / मतदाराकडून अपेक्षित असतो किमान तेवढा ईंटरेस्ट दाखवत नाहीत का?
शीर्षकाला तळटीप - यात अपवाद असणारच हे गृहीत पकडावे, एकंदरीत प्रमाण लक्षात घ्यावे.
..................
असो, आता व्यक्त होतो!
..................
महानाटक
सेनेच्या सत्ता-सहभागाचे अनेक-अंकी महानाटक: सेने तुला काय हवय?
कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!
"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"
आता धागा सुरू करूया,
१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.