चांदण्याला तेथे प्रवेश नाकारताना
जेथे शरीरसंपदा तुझी साकारताना
रेलावे की चूर व्हावे खेटून तुला ओणवे
रात्र"ही" थकून जावी अन् चंद्र मी व्हावे
गोपचांदण्या गोफ लोभसे पाहती बांधू मला
राधाअवनी प्रीत मोहक पाहती रांधू मला
तिला सतवाया जरासे कलेकलेने गुप्त व्हावे
भरती सागरास यावी अन् चंद्र मी व्हावे
उल्का लाखो, तारे चमचमणारे कोट्यावधी
निखळती नक्षत्रे सारी नजर तुझी पारधी
आकाशगंगा ही करी तुला पाचारण हळवे
नक्षत्र तू अठ्ठाविसावे अन् चंद्र मी व्हावे
परतीची वाट
तिरिमिरीत त्याने पायात चपला अडकवल्या अन् तो घराबाहेर पडला. बाहेर मे महिन्याचं ऊन रणरणत होतं. संतापाने त्याची लाही लाही होत होती. कडकडत्या उन्हाचं तर त्याला भानही नव्हतं.
प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार (मए) यांनी सन २००४ मध्ये दैनिक लोकमतच्या रविवार पुरवणीसाठी ‘पश्चिमप्रभा’ या नावाने स्तंभलेखन केलेले होते. यामध्ये त्यांनी विविध पाश्चात्य पुस्तकांचा वाचकांना परिचय करून दिला होता. या पुस्तकांमध्ये नाटक, कविता, कादंबरी, आणि पत्रव्यवहारादी साहित्यप्रकारांचा समावेश होता. त्या लेखनाचे संकलन करून मौज प्रकाशनाने ‘‘पश्चिमप्रभा’ हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्याची तिसरी आवृत्ती मी वाचली. या पुस्तकातील काही वैशिष्ट्यपूर्ण आणि मला भावलेल्या गोष्टी सांगण्यासाठी हा लेख.
हर किसमी मै है किस !!!
यंदा गणपतीत मित्राच्या घरी आरतीला गेलो होतो. आरती झाल्यावर त्यांनी प्रसाद म्हणून चक्क Hershey's Kisses वाटले. दिसायला मोदकांच्या आकाराचे असतात पण म्ह्णून गणपतीचा प्रसाद अमेरिकन चॉकलेट्स?!! बाप्पा ऐवजी प्रसाद वाटणाऱ्या यजमानांनाच 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करावसं वाटलं.
आपल्याकडे पूर्वी सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची पद्धत होती. त्याची जागा आधी हल्दीरामच्या 'सोनपापडी'ने आणि मग अलगद 'कुछ मीठा हो जाए' च्या जाहिरातीद्वारे "कॅडबरीने घेतली आहे.
समजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट.
परवा आमच्या गणोबाचे लग्न जुळल्याची बातमी उडत उडत आमच्यापर्यन्त पोहचली. बरेच दिवस ताटकळला होता. बातमी ऐकून आनंद वाटला. लग्न जुळत नाही म्हणून मध्यंतरी त्याने अविवाहित तरुणांची बैठक बोलाविली होती. मुली मिळत नाहीत म्हणून बैठकीत गणोबाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्याच्या मित्राने त्याच्या मनसुब्यावर पाणी ओतले होते. निराश गणोबाच्या नशिबात नियतीने मुंडवळया बांधल्या नसाव्यात, असा समज करून घेतला होता. नियती ज्या प्रमाणे एखाद्याचे आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याच प्रमाणे कोणाच्या येण्याने ते पूर्ण होणार किंवा नाही हे नियतीला पूर्णत: ठाऊक असते.
सरते वर्ष
बघता बघता एक वर्ष सरल
हळूच तेवढं जगणं काढून घेतल ….
नियती मोठी असते चलाख
काढून घेते कित्येकांचा घास
मापा मधले कपात कधी आले
कुणालाच कधी ना कळलं….
कुणाचे मायबाप गेले
कुणाचे काका मामा संपले
भाव विश्र्वामधले ऋणानुबध
कळले नाही कसे पोकळ बनल.,..
समाज जीवनाचा तोच तरंग
जाती धर्माच्या भट्टीत नाही भंग
तू तू मी मी करत चिखल फेकीने
फेकुंनी कसे सर्वांना मामा बनवलं….
थर्टीफस्ट
सरत्या वर्षाला देता निरोप
तिला गलबलून आलं
डबडबलेल्या डोळ्यांनी
तिला तो आठवला,
ज्याला कोरोनाने नेलं
एकुलते एक मूल ही
कसल्याशा आजाराने गेलं
असतं कुणीतरी तर
इतरांशी हेवा करत
घेतल असते जवळ
आता थिजले मन
अन् जातेय सर्व वेस्ट
कसला आनंद अन्
कसला आलाय थर्टीफस्ट
प्रा.महेश बिऱ्हाडे
जसं आहे तसं स्वतःला स्वीकारलं तर मनात चालणारं विचारांच तांडव बऱ्याच अंशी कमी होतं.
मी असाच का ? मी असा का नाही ?
या असल्या प्रश्नांना उत्तरंच नसतं मुळात.
मला अमुक व्यक्तीसारखं व्हायचंय हा विचार करणं म्हणजे जणू निसर्गाची प्रतारणा करण्यासारखंच.
माणसामाणसातील वेगळेपणा हि ईश्वराने माणसाला दिलेली देणगीच.
स्वभावातील, विचारातील, हसण्यातील, दिसण्यातील वैविध्यपणा प्रत्येकाला गूढ बनवतो .
अगदी आनंदाच्या परिभाषा ही प्रत्येकाच्या वेगवेगळया असतात उदाहरणच द्यायचं झालं तर,
हेच बघाना काहींना पावसात भिजायला खूप आवडत,
*महती माणुसकीची*
माणसं माणसाला
क्षणोक्षणी लुबाडतात
अन् महती सदा
माणुसकीची गातात......
घर असो की दार
सदैव स्वार्थाची पेरणी
आपल्याच लोकांची घेरणी
हाव संपत्तीची धरतात,....
प्रीत असो वा लंघोटी यारी
केसांनी गळा आवळती भारी
आव आणून जीव ओवळती
जिवलगा उताणा करतात...
उद्योग असो वां व्यवसाय
काढुनी वरची मलई साय
वैध अवैध मार्ग बेसुमार
मिलावटी जहर बनवतात...
शासन असो प्रशासन
देती फुकाचेच आश्वासन
आशा लावून दिवास्वप्नांची
जिवंतपणी दिवसा मारतात...