आज खूप दिवसांनी तिचा नवरा फारचं रोमँटिक झाला होता. सकाळी उठल्यापासून चं त्यानं 'बाईसाहेब आपली काय सेवा करु 'असेचं डायलॉग चालू केले होते. ती पार गोंधळून गेली होती. सकाळी तर त्याने चक्क मुलांचं आवरायला मदत केली आणि सर्वात क्लायमॅक्स म्हणजे त्याच्या नावडीचं कामं म्हणजे मुलांना शाळेच्या बसमध्ये ही बसवून आला होता तो. तिला काही चं कळत नव्हते. आज याचा मूड इतका कसा कायं छानं...
तिने आठवायला सुरवात केली आज सासरच्या जवळच्या नात्यातल्या कोणाचा वाढदिवस आहे का की कोणी येणारं आहे का त्याच्यांपैकी जेणेकरून त्याला ते आपल्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तरं नाही ना!...
१.
"पक्या, जरा दमाने घे. जीव खालीवर हुतुय माझा."
"आग राणी असं दमून कसं चाललं, अजून तीन टेकाड वलंडायचित,"
"पक्या, आक्ख रान पालथं घातलया, तरी तीन टेकाड बाकी?"
"गप की राणी. हे घे. दोन घोट हाण... आणि चाल..."
दोन्हीही जिवाच्या आकांताने टेकडी चढत होते.
"पण पक्या, ती दावल ना व?"
"आग लिहून ठेवलंय... वाच..."
ती वाचू लागली.
'काळा कातळ, लाल घोडा,
शेंदूर फासतोय मारुती!
करा मारुती बाजूला,
भुत्याची करा आरती!
भुत्या बाजू होई,
गणाला आरोळी देई!
गण आला धावून
विहीर जावा पोहून!
मासा तळाला,
©मी पाहिलेले भूत
गडावर छान हवा सुटली होती. तंबू फडफडताना होणारा आवाज तेवढा ऐकायला येत होता. जो तो चांदण्या रात्रीच्या गडावरील वातावरणाने भारावून गेला होता. हे सगळे झाल्यावर त्यांना माझी भूताची कथा ऐकायची होती म्हणजे झोपायला एक वाजणार होता. हे नेहमीचेच होते. प्रत्येक नाईट ट्रेकला अशा भयकथांची मेजवानी लागायची. फक्त संकेतला भूताची गोष्ट नको होती. बाकीचे आता त्यासाठीच आग्रह करू लागले होते. मी कथा लिहूनच आणली होती. मी कथा वाचायला सुरुवात केल्याबरोबर संकेतने कानाला हेडफोन लावला.
अंकिताचं लग्न होऊन आता दोन वर्ष उलटली होती. तिच्या सा ऱ्याचं व्यक्तिमत्वावर तिचे सासू ,सासरे फारचं खूश होते.तिच्या स्वयंपाकाची तारीफ करुन सासूबाईंचे तोंड कसे दुखतं नाही असचं सा ऱ्या शेजारणींना वाटे. तिला स्वतःला देवाधर्माची आवड असल्याने ती ते सारे काही व्यवस्थियचं करे. या सगळ्यात तसा विवेकचा फारसा सहभाग नसे पण ती त्याला कधी चं जबरदस्ती करत नसे.
भाग १
https://www.maayboli.com/node/68392
सर्वकाही आठवण्याचा शाप भयंकर असतो, न आठवण्याचा सुद्धा...आणि ठरवून न आठवण्याचा सुद्धा... श्वेतला सर्वकाही आठवत होत. श्वेताला काहीही स्मृती नव्हती. आणि महाश्वेताने गतकाळातील काहीही न आठवण्यास स्वतःला प्रवृत्त केले होते. पण तो कालसेतू या तिघांना बांधत होता.... आणि एके दिवशी....'
"मने, ते पुस्तक ठेव आणि मला मदत कर बरे. सदानकदा काय त्या गूढकथा वाचत असतेस."
मने...मालतीबाई...सॉरी सॉरी... आई... आईने मला हे नाव दिल होत.