मी फार चिंता वाहिली.
बाग फुलेल का?
नदी वाहिल का योग्य दिशेने?
पृथ्वी फिरेल का तिच्या गतीने, तिला शिकवल्याप्रमाणे?
आणि जर का चूकली फिरताना ती, तर मग कशी बरं मी सुधारावी तिची चूक?
बरोबर केलं का मी? की वावगे होते माझे वागणे?
मिळेल का मला माफी? सुधारेन का मी जरा तरी?
गाता येईल का मला गाणे एखादे…कधीतरी?
चिमण्या सुद्धा गातात की…आणि मी…स्वरांच्या शोधात मी….
माझी नजर अंधुक होते आहे की काय?
की हे आहेत फक्त कल्पनेचे खेळ?
संधिवात, धनुर्वात किंवा स्मृतीभ्रंश तर नाही ना होणार मला?
चित्रपटाचे नाव - शैतान
दिग्दर्शक - विकास बहल
रिलीज डेट - ०८ मार्च २०२४
कलाकार :- अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका, Janki Bodiwala
•••••
चार मौलिक सूचनांसमोर
आदराने झुकवली मान
म्हटले या निमित्ताने
सोडवू जुन्या निरगाठी; होते - नव्हते गुंते
होईल संसार नावाच्या जटील कोड्याची उकल,
एका उद्दाम बेदरकारीने
घातला निरागस अक्षरांना वळसा
जिवाभावाच्या शब्दांना दिली
बेमालूम बगल
गजरा की बुके...बुके का गजरा
तळ्यातमळ्यात करताना, माझा-
लोण्याचा गोळा गटकावणारा बोका झाला,
- " साब धंदे का टायम हैं;
क्या मंगता जलदी बोलो.."
किरटा फुलवाला उगाच फिस्कारला..!
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला |
उठि लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला ||
कलंदर आयुष्याने ठेवला
हातावर शब्दाएवढा दाणा
म्हटला असू दे गाठीपदरी
जगायला एखादा बहाणा
हळूवार हातांनी रुजव
पाहून सुपीक काळी माती
सावली धरेल सांजसकाळ
जेव्हा गळून पडतील नाती
ह्यात दडलीय भविष्याची हाक
उफानत्या सागराची गाज
हुरड्यात आल्यावर कणीस
फिरवून फिरवून खमंग भाज
कैकदा आडवे येतील लोभ
वधारल्यागत वाटेल भाव
तेव्हाही फुलाफळांवर भागव
घालू नकोस मुळांवर घाव
सजग सावध काटी-कुपाटी
थोडा चोरा - ढोरांचा बंदोबस्त
जरा कुठे गाफील राहिल्यास
व्हायचे उभे आयुष्य फस्त..!
तूच ठरविली समरभूमी अन्
पलटण तुझीच सैन्य; लढाई
शस्त्रसज्ज मी कधीच नव्हतो
व्यूह तुझे अन् तुझी चढाई
पुरुषार्थाची न च अभिलाषा
रथ, अंबारी तूच वळवतो
नीती-अनिती बोट मधाचे
रोज थकवतो...पुन्हा पळवतो
आसक्तीचा कोंभ लकाके
कुणी ठेविला देही रुजवून
काय तुझा तो उदात्त हेतू
मी शब्दांतून येतो उगवून!
कौतूक कसले ओझे झाले
नकोत अक्षर कवचकुंडले
परत फिरू दे आज; माधवा-
व्यर्थ जिण्याची सहस्त्र शकले...
अंधारुन आले तरी परतली नाही अजून
जरा बघता का कोपऱ्यापर्यंत जाऊन...
- वयात आलेल्या मुलीच्या काळजीने
रडवेली बायको येरझारते अंगणात,
माझ्या आश्वासक शब्दांनी
तिचे होत नाही समाधान
तुळशीपुढची विझू-विझू जाते फुलवात
लाडकोडाला असावी एक मर्यादा
फार ढील देत गेलो तर उद्या-
हातची जायची पोर,
सांजसकाळ दळभद्री लक्षणं
नटणं मुरडणं.. फैशनबिशन
नसता मेला जीवाला घोर...!
सांग कुणाच्या श्रध्देमधून
उगवलास पहिल्या प्रथम,
कुणी केले लाडकोड अन् -
निगुतीने भरणपोषण...?
कुणी घातले पाळण्या- बिळण्यात
मुंज, लग्न, नामकरण,
वाऱ्या- बाऱ्यात लावली रांग
कोण आले पहिले शरण...?
काय प्रिय काय वर्ज्य
कुणी ठरवले विधी-निषेध ,
बेल फुले धूप दीप
केला कुणी बुध्दीभेद..?
वस्त्र शस्त्र शंख चक्र
दागिन्यांनी कुणी मढवले,
मूषक मोर गरुड नंदी
पशूपक्षांवर कुणी चढवले...?
उपास रोजे नैवेद्याची
कुणी बनविली मेन्यूकार्ड ,
मोदक मेवा मटण मुर्गा
कोणी केला राडा द्वाड...?
कुमारसरांनी सुरू केलेल्या 'मराठी लेखन घडते कसे' या उपक्रमामुळे आणि त्यात वाचायला मिळालेल्या हृद्य मनोगतांमुळे मलाही माझ्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटला.
कुमारसरांचे आणि उपक्रमात लिहिणार्या सर्वांचे त्याबद्दल अनेक आभार.
हा मागोवा म्हणजे बहुधा एक आभारप्रदर्शनाची मालिकाच ठरेल , कारण हा प्रवास अनेक आधारवडांच्या सावलीतून झाला आहे.
मागच्या भागात आणि या भागात खूप जास्त कालावधीच अंतर आहे हे मान्य आहे मला... थोडे व्यक्तिगत इश्युज सुरू होते त्यामुळे लेखनाला अजिबात वेळही मिळत नव्हता आणि लिंक सुद्धा लागत नव्हती आणि त्यामुळे बराच वेळ झाला झाला आहे त्याबद्दल क्षमस्व...