रंगभूमी

एकटीच आहेस तु..

Submitted by दिपक ०५ on 18 June, 2017 - 16:33

ना विचार केलास,
नाही समजुन घेतलस तु..
.......................................
भावना अमृत होत्या माझ्या,
त्यात वीष ओतलस तु..
........................................
........................................

मोह नाही तुझ्या शरीराचा,
वेडे तुझा भास आहे..
.......................................
वर्षानू वर्ष भुकेल्या जीवाला,
फक्त तुझ्या प्रीतीची आसं आहे..
................................................
................................................

मन माझे सैराट... भाग ४

Submitted by दिपक ०५ on 8 June, 2017 - 14:50

भाग ३ पासून पुढे....

सागर ते पेकेट उघडूतो, त्यात तिकिट व राधाचा नंबर होता.. सागरने लगेच तो नंबर डायल केला...
रिंग होऊ लागते.. २-३ रिंग होताच एक कोमल आवाज त्याच्या कानी पडला...

हँलो... तो नाजुक आवाज ऐकून सागरच्या तोंडून शब्दच निघेनासे झाले..

हँलो.. कोण बोलतयं?.. राधा..

सागर अडखळत्या शब्दात उत्तर देतो...
मी मी सागर...

कोण सागर.. राधा..

मी गँलेक्सी सॉफ्टवेअर कडून सागर बोलतोय.. दिक्षित सर नि तुम्हाला माझ्याबद्दल सांगितले असेल... सागर..

घाशीराम कोतवाल

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 June, 2017 - 09:51

'घाशीराम कोतवाल' या नाटकाची माहिती नसलेला मराठी प्रेक्षक विरळाच, पण अनेकजणांना ते रंगभूमीवर पाहण्याचा योग आला नसेल. तो योग आता जुळून आला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ग्रँड रॅपिड्स अधिवेशनात नॉर्थ कॅरोलाईनाची 'तौर्य' ही संस्था हे नाटक सादर करणार आहे. त्यानिमित्ताने मायबोली टीमने या नाटकाचे निर्माते आणि ’तौर्य’चे संस्थापक माधव मांजरेकर आणि नाटकाचे दिग्दर्शक डॉ.आनंद लागू यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

विषय: 

" आई "

Submitted by दिपक ०५ on 5 June, 2017 - 19:03

एक आई तीच्या मूला बरोबर राहात होती... ते खुप गरीब होते आणि फक्त त्यांच्या गरजा पूर्ण होतील इतकेच पैसे त्यांना मिळतं...

संगीत संशयकल्लोळ - राहुल देशपांडे यांचे मनोगत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 5 June, 2017 - 10:59

संगीत संशयकल्लोळ हे अवघ्या एकशे एक वर्षांचं तरुण, बहारदार नाटक. गोविंद बल्लाळ देवलांनी लिहिलेलं. या नाटकाच्या शताब्दीच्या निमित्तानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणावं असं श्री. प्रशांत दामले यांना वाटलं आणि या नाटकाचे प्रयोग प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे यांनी सुरू केले. तत्पूर्वी राहुल देशपांडे यांनी ’कट्यार काळजात घुसली’ आणि ’सं. मानापमान’ या दोन नाटकांच्या जोडीनं ’सं. संशयकल्लोळ’ही रंगभूमीवर आणलं होतं. निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शन केलेल्या या नाटकात राहुल देशपांडे यांच्या जोडीला अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन हे कलाकार असत. या नाटकाचे चाळिसेक प्रयोग झाले.

विषय: 

गप्पा with ‘नटसम्राट’

Submitted by BMM2017 on 25 May, 2017 - 22:38
तारीख/वेळ: 
7 July, 2017 - 22:32 to 9 July, 2017 - 22:32
ठिकाण/पत्ता: 
ग्रँड रॅपिड्स

Nana_Flyer_Reveal.png

माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 

'पारदर्शी' - श्रीमती सुप्रिया विनोद

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

रिमाताईंनी श्री. रत्नाकर मतकरी यांच्या 'विठो-रखुमाय', 'घर तिघांचं हवं' या नाटकांमध्ये आणि 'जौळ' या कथेवर आधारित असलेल्या 'माझं घर, माझा संसार' या चित्रपटात रिमाताईंनी अभिनय केला होता. ('माझे रंगप्रयोग' या अप्रतिम आत्मकथनात्मक पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी आपल्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. या दोन नाटकांचा व चित्रपटाचाही त्यात समावेश आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा लेखाजोखा आहे.)

प्रकार: 

माझ्या आठवणीतील रिमा

Submitted by सुमुक्ता on 18 May, 2017 - 05:14

सिनेमा पाहून तो समजायला लागल्यावर रिमांना पहिल्यांदा पाहिले ते सलमान खानची आई म्हणून. नवऱ्याच्या विरोधात जाऊन स्वत:चे कंगन काढून लेकाच्या हातात देणारी आई हिंदी चित्रपटात तेव्हा फारच वेगळी पण खूप छान वाटली होती. आईने कसे कायम दु:खी आणि सोशिकच असले पाहिजे ह्या परंपरागत प्रतिमेला छेद दिला तो रिमांनी. त्यांच्यामुळेच तर स्वतंत्र विचारांच्या, आधुनिक आणि आनंदी आया प्रेक्षकांनी स्वीकारल्या. एक वर्षानुवर्षांची परंपरा मोडून काढणे हे कर्तृत्व मोठेच पण तेवढीच त्यांची ओळख नाही. त्या एक अतिशय ताकदीची अभिनेत्री होत्या हे मला खूप नंतर त्यांचे इतर सिनेमे / मालिका पाहिल्यावर कळले.

'जगावेगळी माय-लेक साकारताना' - माधुरी ताम्हणे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं आज सकाळी निधन झालं.

'सिंहासन', 'कलयुग, 'आक्रोश', 'रिहाई', 'नितळ', 'अनुमती', 'सावली', 'घराबाहेर' अशा चित्रपटांमधल्या त्यांच्या विलक्षण ताकदीच्या भूमिकांपेक्षा प्रसारमाध्यमांमध्ये रीमाताईंच्या चित्रपटांतल्या, विशेषतः सुपरहिट हिंदी चित्रपटांमधल्या, त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकांचीच चर्चा अधिक झाली.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

६४वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेता-अक्षय कुमार

Submitted by टीना on 8 April, 2017 - 13:55

सध्या चालू असलेला गदारोळ बघुन राहावलं नाही म्हणुन हा धागाप्रपंच..

यावर्षीचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'चा पुरस्कार 'रुस्तम' या चित्रपटासाठी 'अक्षय कुमार' याला प्रदान करण्यात आला.. याबद्दल सगळ्यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या.

या विभागातील पुरस्कारकरिता असलेल्या ११ ज्युरींच्या टिमबद्दल सगळ्यांनी बेकार जुरी डिसीजन असे निकष काढलेले दिसत आहे. यात मुख्य असलेल्या 'प्रियदर्शन' ला सर्वांनी टारगेट करुन केवळ अक्षय कुमारला फेवर करायचा म्हणुन त्याला पुरस्कार दिला असे आरोप लोकं त्याच्यावर करत असलेले दिसताहेत.

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी