नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत
दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल
युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना
(हे रूढ अर्थाने 'नाट्यपरीक्षण' नव्हे. माझा नाट्यतंत्राचा अभ्यास नाही, त्यातलं काही कळतं असा दावाही नाही. मला जे जसं दिसलं आणि भावलं ते शब्दात पकडायचा एक प्रयत्न आहे. )
पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक मिनर्व्हा थिएटरचं पुनरुज्जीवन नुकतंच सरकारमधील काही जाणत्या नोकरशहांच्या पुढाकाराने करण्यात आलं आणि त्यानिमित्त पहिलं सरकारी रिपर्टरी थिएटरही सुरू करण्यात आलं. त्याचा शुभारंभ करायचा ठरवला किंग लियर च्या दोन अंकी बंगाली रूपांतराने आणि रिपर्टरीच्या अभिनेत्यांबरोबर मुख्य भूमिका करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं खर्याखुर्या नटसम्राटाला. सौमित्र चट्टोपाध्याय/ चॅटर्जी यांना.
आयुष्यात वेगळे काहीतरी करावे, आपले छंद जोपासताना त्याबरोबरच अर्थार्जनही करावे आणि नव्या वाटा चोखाळताना त्यात आपल्या कुटुंबियांची सर्वार्थाने साथ मिळावी अशी आकांक्षा अनेक स्त्रियांच्या मनात असणे सहज शक्य आहे. परंतु सर्वांनाच ते साधते असे नाही. वयाची चाळीशी उलटल्यावरही आपण काही करू शकतो, त्यातून व्यावसायिक यशासोबत इतरही बरेच काही कमावू शकतो ह्याची कल्पनाच अनेकींना नसते. सांसारिक जबाबदार्या सांभाळून आपल्या छंदाला एका वेगळ्या प्रकारच्या व्यवसायाचे स्वरूप देणार्या नागपूर येथील प्रेरणाताईंनी आपली कल्पना प्रत्यक्षात आणून ते साध्य केले.
"Mandita Kaiwar" is a Marathi translation of an English play named "Taking Sides".
It raises some fundamental questions about the relations between Art and Politics,Artist and the socity and the artist's sociopolitical responsibility.
१६ डिसेंबर १९७२. पुण्याच्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन' या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
विजय तेंडुलकर यांनी लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.
काय लिहीणे अपेक्षित आहे
- आंतरजालावर असलेले उत्तम दृकश्राव्य, किंवा श्राव्य कार्यक्रमांचे दुवे
श्रीराम लागू यांचे नाव हल्लीच मराठी संकेतस्थळावरील एका चर्चेत आले. तेही मी त्यांचे नास्तिकतेचे उदाहरण दिले म्हणून. नास्तिकतेची इतर अनेक उदाहरणे असताना मला लागूंचेच नाव सुचावे याचे कारण म्हणजे गेले काही दिवस मी वाचत असलेले 'लमाण' हे पुस्तक. हे पुस्तक मी अगदी प्रकाशित झाल्याझाल्या २००४-०५ च्या सुमारास पहिल्यांदा वाचले होते. लागूंची दरम्यान असलेली ओळख म्हणजे मराठी चित्रपटांत अप्रतिम अभिनय करणारा ( 'सामना', 'सिंहासन', 'पारध' ) आणि हिंदीत पाट्या टाकणारा ( 'हेराफेरी' (जुना) या चित्रपटातला त्यांचा वेड्याचे सोंग घेतलेला आणि अमिताभ बच्चन-विनोद खन्नाला अत्यंत नाटकीपणे 'क्यूं मिस्टर एम.ए.एल. एल.
कलत्या उन्हांना आपलं नाजूक मनगट हलवत निरोप देणारी, आपलं गुलाबी हसू ओठांवर खेळवणारी, सबंध पुण्याला आपल्या गार कुशीत घेणारी थंडी अवतरत असतांना पाहिलं सुबक प्रस्तूत, निर्माता सुनील बर्वे चे "हर्बेरिअम सिरिजचे" शेवटचे पान... एक मस्त मार्मिक नाटक... झोपी गेलेला जागा झाला!
लिमिटेड २५ प्रयोग, असा टॅग धारण करून ह्या सिरीजमधे ५ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले
त्यातील सूर्याची पिल्ले, हमिदाबाईची कोठी सुपरहिट दाद मिळवून गेले, असं ऐकिवात होतं!
ह्या सिरिजमधील एकही नाटक न बघायला मिळाल्याने मन जरा खट्टू झालं होतं!