६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस आधुनिक भारतात कोण कोण युगपुरूष होते असा विचार करू जाता केवळ एकच नाव समोर दिसते.
मोहनदास करमचंद गांधी ! फॉर बेटर ऑर फॉर द व्हर्स - ही वॉज द मॅन इंडिया निडेड.
More you read about him, more you hate and more you read about him, more you respect !
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ! जय हिंद !
"बजरंगी भाईजान" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बनवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.
चित्रपटाचे नाव "मारुती भाऊ" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.
पुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.
याशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.
माझ्या घरात चुकून एक जास्तीचे स्वयंपाकघर झाले आहे. हल्ली तसाही पुण्यात घरी स्वयंपाक कमीच तयार होतो. त्यामुळे दोन खोल्यांत दोन ओटे हा मला जागेचा अपव्यय वाटतो. शिवाय घरात दोन दोन ओटे असून आपण किती कमी भांड्यांत स्वयंपाक करतो हा न्यूनगंड येतो. तेव्हा मी या समस्येच्या मुळावरच घाव घालायचे ठरवले आहे. घरातल्या कर्त्या स्त्रीने ओटा फोडला म्हणून स्त्रीमुक्तीच्या इतिहासात माझे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाणार आहे. त्याला मोत्यांची अंडरलाईन मिळावी म्हणून कृपया मला मदत करा.
१. खरंच हा ओटा फोडावा का? सध्या त्यावर इस्त्री केली जाते. हा अपमान सहन न होऊन तो काळवंडत चालला आहे.
डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम
मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.
कोंडल्याचे गाणे...
----
विशेष सुचना १:
एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू---- या परंपरागत गायल्या जाणार्या भोंडल्याच्या गाण्यावरून प्रेरणा मिळाली...
चाल अर्थात त्याच गाण्याची
माहित नसेल तर ऐकण्यासाठी मला वि पु करा... माझ्या मंजुळ आवाजात रेकॉर्ड करून पाठवेल
----
एक तडका मारू बाई दोन तडके मारू
दोन तडके मारू बाई तीन तडके मारू
तीन तडके मारू बाई चार तडके मारू
चार तडके मारू बाई पाच तडके मारू
पाचा तडक्यांचा पुरवठाsss
माळ घाली कवीराजाला
कवीराजाची सुस्साट गाडी
येता जाता कविता पाडी...
कवितांच्या भाराने पिचली जनता
अरे अरे राजा बस तुझी सजा....
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
नमस्कार मित्रानो ,
२४-०६-२०१५ रोजो दुर्गवीरच्या बागलाण तर्फे सटाणा बसस्थानकात प्रेक्षणीय आणि प्रेरणास्थळांच्या माहीतीचे फलक लावण्याचे कार्य बसस्थानकाच्या सहयोगाने लावण्यात आले .
अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?
१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !
सध्या वेगवेगळ्या शहरात होणार्या 'मराठा क्रांती मोर्चा'च्या निमित्ताने थोडे म्युजींग...
आरक्षणाबद्दल लाऊड थिंकींग:
1. राजकीय आरक्षणामुळे मुठभर लोक अफेक्ट होतात. त्यामुळे त्याला सर्वसामान्यांचा फारसा विरोध असेल असे वाटत नाही.
2. सरकारी नोकर्यांमधील आरक्षणालादेखील फार विरोध असायचे कारण नाही. कारण एकूण नोकर्यांपैकी हार्डली २ ते ३ % नोकर्या सरकारी असतील. त्यामुळे अफेक्ट होणारे लोक कमी आहेत. आणि त्यातही आपल्यावर अन्याय होतोय किंवा गुणवत्तेनुसार बढती मिळत नाही वगैरे भावना झालीच तर बाहेर इतके व्हास्ट खाजगी क्षेत्र उपलब्ध आहे त्यात ते जाऊ शकतात.
मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )
१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?