यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती.
दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती.
त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते.
आज दिवसभरं ती तेच खात होती.
अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली.
यलम्माच देऊळ अगदीच लहान, एकाच खोलीचं.
पण इथे गुरव नव्हता म्हणुन सुनीनं बस्तानं बसवलेलं.
गुरवं सगळी तिकडे मोठ्या देवळाकडं, तिकडं ती कधीच जायची नाही.
नैवैद्य चोरणाऱ्या गावातल्या पोराठोरांना गुरवं हुसकावुन लावायची.
कुंपण
शेताला कुंपण घातल्याने
शेताची चिंता मिटत नाही
वाढत्या नैतिक बदलांमुळे
आता सुरक्षित वाटत नाही
अनुभव येता समजेलंच
आम्ही अफवा वाटत नाही
सांगा कोण गँरंटी देईल
की कुंपण शेत लुटत नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
छत्रपती शिवजी महाराजांनी ३ एप्रिल १६७९ रोजी लिहिलेले हे पत्र औरंगजेबाला लिहिलेले बहूदा शेवटचे पत्र असावे. ह्या पत्रात ते जिझिया कराकरिता औरंगजेबाचा तीव्र शब्दात निषेध करतात आणि पुर्वीच्या पादशहांची, खास करुन अकबराची आठवण करुन देतात. 'पादशहाचे घरी दारिद्र्याचा वास जाहला', 'या प्रकारचे करण्यातच पुरुषार्थ पादशहा समजतात', 'गरीब मुंग्या चिलटासारख्या आहेत त्यांस उपद्रव करण्यात मोठेपणा नाही.' असेही बजावतात.
*********************************************************************************
आग्नेय आशियातला एक महत्त्वाचा देश... सिंगापूर! नुकताच ९ ऑगस्टला सिंगापुरानं स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्यानिमित्तानं SG50 या नावानं पूर्ण वर्षभर सिंगापुरात विविध कार्यक्रम असणार आहेत.
टिपः या धाग्याच्या सोयीसाठी हिंदु / हिंदु धर्म = हिंदु धार्मीक समुह या अर्थाने वापरला आहे .
मासांहाराबाबतीत "काही" जण सोमवारी किंवा मंगळवारी न खाता ईतर दिवशी खातात.
ईथे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वार बदलतो.
ईथे मी कुणाच्याही श्रद्धेवर आक्षेप घेतलेला नाही. ती श्रद्धा पाळताना हे जे वारांचे गणित आहे ते योग्य आहे की नाही असा प्रश्न मला पडला आहे.
आपण जे सद्ध्या कॅलेंडर फॉलो करतो आहोत ते तर ख्रिती ग्रेगोरीयन कॅलेंडर आहे ना? भारतात ग्रेगोरीयन आणि हिंदु (नेपाळी) असे दोन अधिकृत कॅलेंडर असल्याचे कळते.
निष्कर्ष
कुणाच्या भावना आनंदल्या
कुणाच्या भावना कुस्करल्या
'महाराष्ट्र भुषण' वितरणाने
चर्चा जास्तच विस्फारल्या
वादावर पडदा टाकला तरी
पडद्याच्या आत परामर्श होतील
अन् वेग-वेगळ्या चर्चे मधून
वेग-वेगळे निष्कर्ष येतील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भविष्यात
मना-मनात फोफावणार्या
प्रसिध्दीच्या भुका आहेत
जातीय सलोखा साधने या
लांच्छनास्पद चुका आहेत
वर्तमानी केलेल्या चुकांचेही
ऐतिहासिक वर्म राहिले जातील
अन् पुरस्कारितांचे कार्य नव्हे
त्यांचे जाती-धर्म पाहिले जातील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
घडणार्या गोष्टींत
हव्या असलेल्या गोष्टींसह
नको त्याही गोष्टी असतात
हव्या,नको त्या गोष्टींसाठी
पुन्हा-पुन्हा पुष्टी असतात
कुणी नटलेले असतात तर
कुणी मात्र तटलेले असतात
कित्येक घडणार्या गोष्टींमध्ये
दोन्ही नाट्य थाटलेले असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मला आलेली एक मेल पाठवीत आहे. विचार करायला लावणारी आहे.......
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…
आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होतं तो एकच गोष्टीचा…पण ती देखील कुठे आहे कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच’ आपल्यावर येऊ शकते..
१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…
!! रणपंडीत बाजीराव !!!!