वृत्तपत्र

उरले जगणे, मरणासाठी !...

Submitted by झुलेलाल on 20 September, 2017 - 08:52

परवा एसटीच्या मुंबई सेंट्रल ऑफिसात एका मित्राला भेटायला गेलो होतो. खूप गप्पा मारल्या, आणि निघालो.
बाहेर पॅसेजमध्ये लवाटे भेटले.
तोच उत्साह, तीच घाई, तोच, काहीतरी शोधणारा चेहरा आणि तीच भिरभिरती नजर...
मला समोर पाहून दिलखुलास हसले. आणि पिशवीत हात घातला. एक कागदाचं भेंडोळं समोर धरलं.
हा नवा पत्रव्यवहार... ते उत्साहानं म्हणाले, आणि मला, दोन वर्षांपूर्वी भेटलेले लवाटे आठवले.
तेव्हा माझ्या ऑफिसात त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर खूप अस्वस्थता आली होती.
मग एक लेखच तयार झाला, आणि त्यावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

आपका स्वागत है , मेरे दोस्त !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 09:11

गेल्या ७० वर्षाम्तला भारताच्या पंतप्रधानांचा पहीला इज्राईल दौरा !!

गेल्या ७० वर्षांत ईज्रायल सारख्या सामर्थ्यवान देशाला ईग्नोर करण्याच महान काम आपल्या सरकारने आता पर्यंत
केलेल आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाईन सारख्या देशाच समर्थन सुद्धा केलेल आहे.

नितिन गडकरी साहेबांचे प्लान्स !!

Submitted by मिलिंद जाधव on 2 July, 2017 - 14:09

पर्यायी इंधन आणि स्वस्त परंतु आरामदायी व पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्था हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभ्यासाचा विषय. त्या क्षेत्रात त्यांनी कामही केले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’च्या ऊर्जापर्वाचा समारोप करताना त्यांनी त्यांचे अनुभवजन्य विचार मांडून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकाशवाटा उलगडून दाखविल्या.. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.

झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती !!

Submitted by मिलिंद जाधव on 1 July, 2017 - 04:30

शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!

गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा!

Submitted by इनामदार on 3 January, 2017 - 23:07

राम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.

‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री. दिलीप पाडगांवकर यांचं परवा पुण्यात निधन झालं. पॅरिसमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं त्यांची तेथील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी 'युनेस्को'त बँकॉक आणि पॅरिस इथे काम केलं. पुढे १९८८ साली 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा वर्षं ते या पदावर होते. पुढे या ना त्या स्वरूपात त्यांचा 'टाईम्स'शी असलेला संबंध कायम राहिला. डॉ.

प्रकार: 

येतील का ते दिवस...?

Submitted by Suyog Shilwant on 17 October, 2016 - 03:55

माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.

येतील का ते दिवस...?

Submitted by Suyog Shilwant on 17 October, 2016 - 03:47

माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.

आपले हवाईयोद्धे

Submitted by पराग१२२६३ on 7 October, 2016 - 14:31

८ ऑक्टोबर. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस. याच दिवशी १९३२ मध्ये अवघ्या ४ वेस्टलँड वापिटी विमाने आणि ५ वैमानिकांसह भारतीय हवाई दलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात भारतीय हवाई दलाने विविध संकटांच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर फोर्सचे इंडियन एअर फोर्स झाले.

दोन पावले मागे सरलेला सेनेचा 'वाघ' ...

Submitted by अजातशत्रू on 1 October, 2016 - 07:57

आज उद्धव ठाकरेंनी केलेले काम संजय राऊत यांनी सामनामधून वेळीच केले असते तर आज ही वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली नसती..
संजय राऊत यांनी वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची प्रसिध्द केलेली बातमी मराठा समाजाला त्या व्यंगचित्रापेक्षाही क्लेशदायक वाटल्याचे अनेक जणांच्या विचारांतून जाणवले.
सामना / संजय राऊत यांनी माफी मागून जे काम सहज शक्य होते ते त्यांनी केले नाही.
पण बुडत्याचा पाय खोलात या नात्याने संजय राऊत नामानिराळे होतात आणि शिवसेनेला तोंडावर पाडतात हे मागील सहा - सात वर्षात खूप वेळा घडले आहे.

Pages

Subscribe to RSS - वृत्तपत्र