मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे! तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय! खूप भरून येतंय.
तू! तुझ्याबद्दल काय लिहू? लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू!
शब्दांनी सजवित जावे
वृत्तांचा ना हव्यास
मज वाटे कविता झाली
असतो रचनेचा भास
मी नाही कुठला पंथी
मज नकाच कोठे जुंपू
कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू
ही माझी स्वतंत्र रचना
हे माझे निराळे कूळ
तुंम्ही अर्थ शोधुनी जाता
तरी गवसत नाही मूळ
एकाकी या वळणावर
मी पुढे चालतो आहे.
शब्दांचा नाजुक गजरा
मी मनी माळितो आहे.
मज ठाऊक नाही पुढती
असणार कोठचे गाव?
नसतात तेथल्या गावी
कुणी राजा आणिक राव