पुरुषसुक्त ही ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील एक प्रार्थना आहे.(ऋग्वेद १०.९० ) या मध्ये पुरुष म्हणजे कुठलाही विशिष्ट देव नसून परमात्मा आहे. याचे कर्ते नारायण ऋषी होते. पुरुषसुक्ताच्या दोन संहिता आहेत .एका संहितेत १६ ऋचा आहेत ,त्यातील १५ अनुष्टुभ छंदात आणि १६ वी त्रिष्टुभ छंदात .
दुसऱ्या संहितेत २४ ऋचा आहेत, यापैकी १८ पुर्वनारायण ज्यात पुरुषाची स्तुती आहे आणि ८ उत्तर नारायण ऋचा आहेत.
पुरुषसुक्त हे साधारण कुठल्याही यज्ञाच्या सुरवातीला गात असत. त्यामुळे त्याची सुरवात आणि शेवट शान्तिपाठाने होतो
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.
"हाय विजय"
"हॅलो निमिष, कसा आहेस?"
"ठिक. बरेच दिवस झाले तुला भेटायचं होत"
"मलासुद्धा. खरं तर आपल्या बायका भेटतात, बोलतात, त्यावरुन तुझ्याबद्दल माहीति होती, पण भेटीचा योग आज आला."
"खरय"
"काय रे थकला आहेस की काय?"
"नाही, का रे?"
"नाही चेहर्यावर फ्रेशनेस वाटत नाही, बरं आहे ना?"
"मी ठिक आहे रे..."
"कमॉन यार, xxxxxx सारख्या जगप्रसिद्ध कंपनीत आहेस, आमच्यासारखं नाही तुझं. कित्येक भारतीय रोजच भेटत असतील तुला, की कोरियन लोकांचा कंटाळा आला?"
"कोरिअन नाही, भारतीयांचाच कंटाळा आला?"
"म्हणजे, पॉलिटिक्स...?"
"नाही ते ही चाललं असतं, पण माझ्याच ऑफिसमध्ये मी वेगळा पडलोय..."
"का रे?"
भगवान बुद्ध, एक सर्वोच्च परिपुर्ण सम्यक संबुद्ध ( संपुर्ण जागृत). स्वतःच्या तेजोमय प्रकाशाने ज्याने ह्या विश्वातील अंधकार नाहीसा केला असा उज्ज्वल सुर्य म्हणजे तथागत भगवान बुद्ध..
तो आमचा मार्गदर्शक तारा आहे,, तो आम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगतो...
एक असा ज्याने संपुर्ण आयुष्यभर सर्व प्राणीमात्रांच्या सुखाकरिता प्रज्ञा, शील, व करुणेचा प्रसार केला... असा सत्याचा शिक्षक.
काय तो ईश्वर आहे?? ईश्वराचा अवतार किंवा त्याचा पुत्र आहे?? असा त्याने कधी दावा केला आहे काय? काय तो आपल्यासारखा मनुष्य आहे??
भगवान बुद्ध, एक सर्वोच्च परिपुर्ण सम्यक संबुद्ध ( संपुर्ण जागृत). स्वतःच्या तेजोमय प्रकाशाने ज्याने ह्या विश्वातील अंधकार नाहीसा केला असा उज्ज्वल सुर्य म्हणजे तथागत भगवान बुद्ध..
तो आमचा मार्गदर्शक तारा आहे,, तो आम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगतो...
एक असा ज्याने संपुर्ण आयुष्यभर सर्व प्राणीमात्रांच्या सुखाकरिता प्रज्ञा, शील, व करुणेचा प्रसार केला... असा सत्याचा शिक्षक.
काय तो ईश्वर आहे?? ईश्वराचा अवतार किंवा त्याचा पुत्र आहे?? असा त्याने कधी दावा केला आहे काय? काय तो आपल्यासारखा मनुष्य आहे??
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का
गैरोंकी चाहत मे मुहाजिर बन बैठे
आपनोंकी आखों मे अंगार बन बैठे ....
मजहब के नाम पे राह चले तो थे
आपनेही घर मे महेमान बन बैठे ....
इलहा की मर्जी पाने फितुर कर गए
तेरेही दरबार मे गुन्हेगार बन बैठे ....
अल-शुकर बनने की चाहत रखते थे
खुद ही खुदमै काफिर बन बैठे ....
ये गुमन आलम से 'अझाद' कर दे
हिन्दोस्तां मे देशद्रोही ना बन बैठे ....
__________________________________
काल द्सरा धुमडाक्यात साजरा होत असताना पुण्यात भारत विरुध्द आस्ट्रेलीया यांच्यात क्रिकेटचा सामना सुरु होता चिक्कार गर्दी होती स्टेडीयमवर घरी सुध्दा कित्येकाच्या घरी दूरर्दशनवर सामने पाहणारे कित्येक होते. येणार्या जाणार्याचे थोडक्यात स्वागत करुन पुन्हा मॅच मध्ये दंग होत होते. असे बर्याचदा आपल्या सणावाराला मॅचेस ठेवलेल्या असतात बरेच महाभाग सणावार विसरुन क्रिकेट पाहतात. एकवेळ क्रीकेटपटुंचे ठीक त्यांना पैसे मिळतात.परंतु नागरिकांनी तरी आपल्या सणावारांना यथोचित वेळ दिला पाहीजे. लक्ष्मीपुजन चालु असतानाही असेच अप्सरा आली किंवा अजय अतुल असे कार्यक्रम असतात. लोक सगळ सोडुन कार्यक्रमाला हजर .
स्वित्झर्लंड मधल्या एका "कॅण्टन" (प्रांत/राज्य/परगणा सारखे काहीतरी असेल) मधे संपूर्ण शरीर झाकणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालायला बंदी केलेला कायदा नुकताच पास झाला. याचा मुख्य उद्देश बहुधा मुस्लिम स्त्रियांना बुरखे घालायला बंदी करणे हा असावा.
http://www.swissinfo.ch/eng/swiss_news/Burka_ban_approved_in_Italian-spe...
त्याचे वरकरणी कारण सार्वजनिक सुरक्षा हे दाखवले जाते आहे. बुरखा असेल तर आत कोण आहे हे कळणार नाही वगैरे वगैरे. पण इमिग्रंट लोकांनी स्वत:ची ओळख जपल्यास ते मुख्य प्रवाहात मिक्स होत नाही असे सहसा 'उजवे' लोक म्हणतात त्याचाही हा एक भाग आहे.