ठीक 75 वर्षांपूर्वी 9 डिसेंबरला घटना परिषदेची (Constituent Assembly) स्थापना होऊन स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. भारताच्या इतिहासात प्रथमच असे घडत होते. देशभर झालेल्या निवडणुकांमधून निवडून आलेल्या 299 सदस्यांची ही घटना परिषद होती.
मी: हे काय चाललय तुझं ? का गाल फुगवून बसला आहेस? रुसूबाई! ४ दिवस झाले पाहतेय.
तो: नाहीतर काय? आजकाल इन्ग्नोर करतेस तु मला. . रोज कामावर जातांना देवांना नमस्कार करतेस तेव्हा माझ्याकडे बघतही नाही, कि पुर्वीसारखं "चल कान्हा, माझ्याबरोबर..." असेही म्हणत नाहीस.
मी: अरे किती गडबडीत नमस्कार करते देवांना माहित आहे ना. तुला दिसतेच की माझी सकाळची घाई. अन सगळ्या देवांना केला म्हणजे तुलाही पोचला की. "... केशवं प्रतिगच्छति" म्हटलंच आहे ना!
उद्या 21 नोव्हेंबरला मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ‘भा. नौ. पो. विशाखापट्टणम’ (आय.एन.एस. विशाखापट्टणम) ही स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका भारतीय नौदलात सामील होत आहे. ती भारतीय नौदलातील आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक, सर्वात मोठी आणि हिंदी महासागरातील सर्वांत शक्तिशाली विनाशिका ठरणार आहे. ही विनाशिका भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक, सामरिक, कौशल्यात्मक ताकदीचे प्रतीक बनणार आहे.
अग्नी-5 या भारताच्या दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची 27 ऑक्टोबर 2021 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पाच हजार किलोमीटर दूरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
अ..... आणि अस्मि
अ ---- हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो.
अस्मि ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो.
हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही.
8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील. हवाईदलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे 8 ऑक्टोबरला हिंदन हवाईदल स्थानकावर मुख्य आणि दिमाखदार समारंभ पार पडला.
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले.
प्राण्यांशी (कुत्र्यांशी) संवाद कसा साधावा यावर आधारित पुस्तक, प्राणीमित्र संस्था यांबद्दल माहिती हवी आहे.
ते आपणास काही सांगू इच्छित असतील तर कसे ओळखावे. आपल्याकडून त्यांना काही हवे असेल, त्यांना काही दुखत खुपत असेल, काही त्रास होत असेल, आनंद होत असेल, काही आवडत असेल अथवा नसेल या आणि अश्या अनेक गोष्टी माहित करून पाळीव अथवा इतर प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी काही उपाय / शिक्षण / पद्धती असल्यास आपापल्या अनुभवासहित माहिती मिळाल्यास अतिउत्तम.
१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या
उचंबळून येण्याचा प्रवाह मुक्त असतो.. पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ फक्त त्यांच्या मालकांच्या दिशेनेच..
२. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत..
समोर स्तब्ध पाण्याचा पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा..
थरथरतो.. वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे..
झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी मान डोलावली...