उषःकाल होता होता...

Submitted by कुमार१ on 12 December, 2016 - 07:42

'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले.
मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्या ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले.
तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात अस्ल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users