Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 September, 2013 - 13:12
मृत्यू !
तसा म्हटला तर
पूर्णविराम असतो
साऱ्या कर्तृत्वाचा
ऐश्वर्याचा माझेपणाचा
दारिद्रयाचा शोकाचा
आणि यातनेचा
खरतर तो कुणालाच
नको असतो
राजाला दारिद्र्याला
आजाऱ्याला भिकाऱ्याला
त्याला तिला तुला मला
जरी माहित असते
त्याची अटळता
कदाचित म्हणूनच
त्याची आठवण टाळत
असतो आपण जगत
आयुष्य भोगत
सतत अधाश्यागत
आणि होताच दर्शन
चुकून जरी त्याचे
नात्यामध्ये मित्रांमध्ये
शेजारी वा रस्त्यामध्ये
झटपट सारे
सोपस्कर उरकत
शक्य असेल तर
दुर्लक्ष करत
जाऊन बसतो
त्याच विस्मृतीच्या
आश्वस्त कोषात
पण...
आपल्या जाणीवेची
एक किनार
कितीही दडपली तरीही
असते सदैव फडफडत
क्षणा क्षणाचा
हिशोब सांगत
आणि आपण असतो
निरुद्देश धावत
मृत्यू आपल्याला
गाठे पर्यंत .
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा