खतखते

Submitted by दिनेश. on 16 September, 2013 - 03:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिकाम्या पोटी , भरदुपारी एक वाजता अशा रेसिपी वाचणे -----

दिनेशदा - मागे तुम्हाला म्हणालो होतो - पुण्यात आपल्याला एक चांगले खाद्यगृह काढायचे आहे (खास तुमच्या देखरेखीखाली, तुमचे मार्गदर्शन लाभलेले ) - ते मनावर घ्या बरं ..... Happy

या अशा स्पेशल डिशेस काय घेऊन/देऊन बसलात ---- तुम्ही केलेला साधा वरण भातही अगदी पेशल पेशल चवीचा असणार बघा - मला तर खात्रीच आहे पूर्ण ....

मस्तच.. Happy तळकोकण स्पेशल!! मी ही भाजी एका नरक चतुर्दशीला सातर्ड्याला खाल्लेली आहे माझ्या दिरांकडे. ती अप्रतिम झालेली आणि त्यात तिरफळे घातलेली होती. केळीच्या पानावर छान उठून दिसत होती, आम्हाला अगदीच नवा पदार्थ होता हा आणि जावेने मुद्दाम उलगडून कृती सांगितलेली त्यामुळे आजही ठळकपणे लक्षात आहे. करून बघण्यात येईल.

दिनेश झकास.
भारतात परत आलात की प्लिज माझा क्लास घ्या. मी स्वयंपाकाच्या बाबतीत अगदीच गयी गुजरी आहे हो Sad

लहानपणापासून या खतखत्याच्या आणि अंगारकी चतुर्थीच्या आठवणी आहेत. आई मला उपास करू देत नसे,
पण चंद्र उगवला का ते बघायला मात्र गच्चीवर मी जात असे. आधीच जेवण झालेले मग चंद्र बघण्यासाठी जागरण, असे झाल्याने रात्री केवळ एक मोदक खाऊन झोपत असे. मग दुसर्‍या दिवशी या खतखत्यावर ताव मारत असे मी.

अगदी सोपी भाजी आहे हि. अप्रतिम चव !

पारंपारिक आणि झकास पाककृती..

सध्या तरी पथ्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे नविन खाद्यपदार्थांची चव घ्यायचा चान्सच मिळत नाहीये. Sad

- पिंगू

यापैकी पाच, सात किंवा नऊ भाज्या घेतात.>> हे का बरं. सहा, आठ किंवा दहा घेतल्या तर खतखते बिघडत का?. Proud

आमच्याकडे थोडी वेगळयाप्रकारे ही भाजी करतात. लाल भोपळा, गवार, सुरण, बटाटा, रताळे यांच्या थोड्या मोठ्या फोडी करून शिजवल्यावर त्यात हळद ,मीठ व तिखट घालतात.ओले खोबरे व थोडीशी चिंच एकत्र वाटावे.वाटण गुळगुळीत झाल्यावर ५-६ तिरफळे घालून केवळ तिरफळे मोडेपर्यंत घसरा द्यावा.हे वाटण व गूळ घालून मंद गॅसवर उकळावे. गॅस बंद केल्यावर २ चमचे कच्चे खोबरेल तेल भाजीत घालावे. थोडे मुरल्यावर भाजी परत गरम करावी.म्हणजे कच्चा स्वाद लागणार नाही.
काहीजण थोडे शिजलेले वरण ( तुरीचे ) घालतात.पण आई घालत नसे.
( आई करते त्याला छान केशरी रंग येतो. )>>> हे मात्र एकदम खरयं.

येळेकर, गोव्याचे खतखते थोडे वेगळे असते. गोव्याला माझ्या घरमालकांकडे खुप वेळा खाल्ले आहे. खोबरेल तेल तसे मलाही काही भाज्यात वरून घातलेले आवडतेच.

वा सुंदर, आता मी करुन बघेन. माझं सासर देवगड तालुक्यातलं असून हा प्रकार माहितच नाही. हा मालवण साईडला करतात कां? गोव्यात करतात असे माहीती आहे.

मस्तच !

नी, कुठे हरवली होतीस ?
आईने हा प्रकार कुठून स्वीकारला ते तिला विचारावे लागेल. मालवणला आमच्या घरी आणि मलकापूरला पण हा प्रकार करत नाहीत.