भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

Submitted by बावरा मन on 20 February, 2013 - 05:32

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते. तसेच ते ज़ीया ना भुट्टो यांच्याबद्दल पण होते.त्यानी भुट्टो यांच्यावर निरनिराळे आरोप लावून त्याना मृुत्यदंड मिळेल याची व्यवस्था केली. पिलू मोदी या आपल्या जवळच्या मित्राला शेवटच म्हणून भेटायला पाकिस्तान मध्ये गेले. जवळचे मित्र असल्याने त्याना भुट्टो ना तुरुंगात जाउन भेटण्याची परवानगी लगेच मिळाली. भुट्टो हे तसे प्रचंड भारत विरोधक. १९७१ च्या युध्ाच्या वेळेला युनो मध्ये केलेले 'इंडियन डॉग्स' असा भारतीयांचा वारंवार उल्लेख करून केलेले भाषण खूप गाजले होते. इंटरनेट वर त्या भाषणाच्या क्लिप्स पण उपलब्ध आहेत. पण त्या शेवटच्या भेटीत भुट्टो यांच वेगळच रूप मोदी याना बघायला मिळाल. भुट्टो यानी मोदी याना सांगितल ,'' आम्हाला नेहमी भारतीय सांसदीय लोकशाहीची खिल्ली उडवायला आवडत. पण हे सांसदीय लोकशाहीच भारताच बलस्थान आहे. तुमच्या संसदेत नेहमी आरडाओरडा असतो, बजबजपुरी असते. पण या सगळ्यात एक उर्जा आहे. एक सुसूत्रता आहे. या लोकशाहिमुळेच भारत एकसंध आहे. नाहीतर भारताचे आतापर्यंत अनेक तुकडे झाले असते. " या कट्टर भारत विरोधकाने भारतीय लोकशाहीला दिलेली ही एक सलामीच.

हा किस्सा पुन्हा आठवायचे कारण म्हणजे पुन्हा काही पाकिस्तानी लोकांकडून हीच प्रतिक्रिया क्वेटा मध्ये झालेल्या भीषण बॉम्बबलास्ट नंतर ऐकायला मिळाली. मी http://www.defence.pk/ या पाकिस्तानी संस्थळाचा सदस्य आहे. हे एक डिस्कशन फोरम आहे. इथे अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होत असत. जरी हे पाकिस्तानी संस्थळ असल तरी इथे कुणीही चर्चा करू शकत असल्याने अनेक राष्ट्रियत्वाचे लोक मेंबर आहेत. भारतीय, चिनी, बांगलादेशी, अमेरिकन, युरोपियन, आणि अगदी विएतनाम चे पण नागरिक पण विविध विषयांवर इथे आपली मत देत असतात. पाकिस्तानी संस्थळ असून पण हे चक्क लोकशाही धर्तीवर याचे काम चालते. म्हणजे तुम्ही पाकिस्तान वर इथे जहाल भाषेत टीका पण करू शकता. पाकिस्तान च्या राष्ट्रीय धोरणांवर पण टीका करू शकता. (अवांतर- याच धर्तीवर एक भारतीय डिस्कशन फोरम पण आहेत. पण बहुतांशी संस्थळ ही अती उजव्या व आक्रमक भारतीय राष्ट्रवादचा पुरस्कार करणार्यांकडून कडून चालवली जातात. त्याना सोयीस्कर तेवढीच मत तिथ स्वीकारली जातात. वेगळी मत असणारी लोक तिथे स्वीकारली जात नाहीत. त्यामुळे निष्पक्ष चर्चा होण्याला मर्यादा पद्तात.त्यामुले अनेक संतुलित विचार करणारे भारतीय पण या फोरम पेक्षा पाकिस्तान डिफेन्स फोरम ला पसंती देतात.) सार्वजनिक संस्थळ असल्याने अनेक भारतीय व पाकिस्तानी कट्टर पंथीय पण तिथे धुमाकूळ घालत असतात. पण त्याचबरोबर अनेक देशामधले विचारवंत, मुत्सद्दी, निवृत्त लष्करी अधिकारी पण आपली अभ्यासू मत देत असतात. त्यात अनेक पाकिस्तानी लोकांचा पण समावेश आहे. सध्या पाकिस्तान मध्ये जे काही चालू आहे त्यामुळे या विचारवंतामध्ये अस्वस्थ विचारमंथन चालू आहे. आपल्यासोबतच स्वतंत्र झालेला भारत आज अनेक समस्या शी लढत इंच इंच पुढे जात आहे आणि आपण आपल्या अस्तित्वाचाच लढा लढत आहोत ही वस्तुस्थिती या 'Intellectuals' ना अस्वस्थ करत आहे. परवा क्वेटा इथे बॉम्बस्फोट होऊन ८४ शीया मारले गेल्यावर या अस्वस्थेचा स्फोट झाला. आणि या स्फोटा बद्दल भारताला जबाबदार धरणार्‍या काही पाकिस्तानी मेंबेर्स ला एका सीनियर पाकिस्तानी डिप्लोमॅट ने धारेवार धरले आणि भारतीय लोकशाही बद्दल झुल्फीकार अली भुट्टो च्या जवळ जाणारे हेच मत मांडले.

मात्र कट्टर राष्ट्रवादाचे चष्मे चढवून इथे येणार्‍या प्रत्येकाला सावधानतेचा इशारा. वर्षानुवर्ष आपण जपलेली काही ऐतिहासिक भ्रम इथे चकनाचुर होऊ शकतात. काय आहेत हे ऐतिहासिक भ्रम. १९६५ च युद्ध खरच आपल्याला सांगितल्या गेल तास आपण क्लीन स्वीप करून जिंकल होत का? का इतर आंतरराष्ट्रीय माध्यमानी या युध्ाला स्टेल मेट (म्हणजेच बरोबरीत सुटलेल युद्ध) ठरवल होत? कारगिल युद्ध खरच वाजपेयी सरकारने ढोल बडवाल्याप्रमाणे महान राष्ट्रीय विजय होता का सरकार आणि लष्कर यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा कारगिल युद्ध हा परिपाक होता? टाइगर हील जवळील पॉइण्ट ५३५३ हे शिखर अजुन पण पाकिस्तान च्या ताब्यात आहे. जर आपण हे युद्ध जिंकल असु तर हे शिखर अजुन पाकिस्तांन च्या ताब्यात का? कारगिल मध्ये नेमके किती जवान धारतीर्थी पडले? प्रश्न आणि नवीन प्रश्न. भारतासारख्या लोकशाही देशात जिथे मुक्त माध्यम आहेत त्या देशात पण राष्ट्रवादाचे ढोल बडवत सत्याचा कसा लोप केला जातो हे समजल्यावर मन खिन्न होत.

अजुन एक महत्वाच म्हणजे अनेक भारतीय मुस्लिम या संकेतस्थळावर भारत हा कसा सेक्युलर देश आहे हे हिरीरीने मांडत असतात. समाजातल्या एका 'brainwashed' हिश्श्याने या समाजाला कधीच 'पाकिस्तानी' असे घोषित करून वाळत टाकले आहे तरी पण ते हिरीरीने आपल्या देशाची बाजू मांडत असतात हे विशेष.

आपल्या जखमेवर मीठ शिंपडणारी अजुन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई दलावर अनेक चकमकित वर्चस्व गाजवले आहे. पुढची महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या या देशाचे लष्कर सध्या युद्ध चालवायला खरेच सक्षम आहे का? आपले रणगाडे रात्री धावू पण शकत नाहीत. तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे. ही तथ्य कळली की भारताने संसदेवरील हल्ल्यानंतर आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तान ला का प्रत्युत्तर दिले नाही हा प्रश्न पडेनासा होतो.

अस म्हटल जात की प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. तुमची, समोरच्याची आणि सत्याची. डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारायच का राष्ट्रवादाचा काळा चष्मा लावून त्याकडे बघायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्थान आपल्या पेक्षा लष्करी सामर्थ्यात वरचढ आहे हा साक्षात्कार प्रथमच होत आहे. दरवर्षी २६ जानेवारीला होणार्‍या लष्करी प्रदर्शन पहताना व त्याबाबतचे निवेदन ऐकताना उर भरुन येतो. पाकिस्थानी लष्कर वरचढ आहे याचे तौलनीक समर्थन करणारा मायबोलीवर कोणी लष्करी अधिकारी आहे का ?

माझ्या मते पाकिस्थानची राजनिती एकाच अजेंड्यावर केंद्रित होते ती म्हणजे भारत द्वेष आणि भारत विरोधी अतिरेकी कारवाया. यामुळे काही खोटी माहिती प्रसिध्द करुन भारतीयांचे मनोधैर्य कमकुवत करण्याचा हा पध्दतशीर प्रयत्न असु शकतो.

आपले रणगाडे रात्री धावू पण शकत नाहीत. >>>>>> अर्जुन रणगाडा माहीत आहे का आपणास ..
.
.तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे.>>> बोफोर्स नावाचा प्रकार काय आहे.. ? Uhoh

पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे. >>>> त्यांचे नुकतेच परिक्षण केलेले अत्याधुनीक क्षेपणास्त्राची रेंज १००० किमी सुध्दा नव्हती...ते ही चीन ने स्वतःच्या भंगारातुन काढुन दिलेले ;). आपल्या अग्नी ची रेंज ७५०० पेक्षा जास्त आहे असे इतर देश बोलतात आपण तर कमीच ५५०० बोलतोय..

पिनाक क्षेप्णास्त्र..>>>> एकाच वेळी १०० क्षेपणास्त्र सोडु शकणारे भारता कडे आहे आणि ते परत वापरात सुध्दा येउ शकते,,,.
.
लक्ष्यः>>> लाईट हेलिकॉप्टर हे हवेत उलटे (रिवर्स) देखील उडु शकते.. असे हेलिकॉप्टर फक्त ३ देशांकडेच आहे..(माझ्या माहीती प्रमाणे)

.
हे एकदम जाज्वल्य राष्ट्राभिमान म्हणुन नाही पण एक आपणास माहीती म्हणुन सांगितले...

पुढची महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या या देशाचे लष्कर सध्या युद्ध चालवायला खरेच सक्षम आहे का? आपले रणगाडे रात्री धावू पण शकत नाहीत. तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे. ही तथ्य कळली की भारताने संसदेवरील हल्ल्यानंतर आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तान ला का प्रत्युत्तर दिले नाही हा प्रश्न पडेनासा होतो.
>> कुठल्या सालातली माहिती आहे ही? http://ibnlive.in.com/news/the-strength-of-the-indian-and-pakistani-arme... हे वाचा.

भारताने संसदेवरील हल्ला आणि मुंबई हल्ला दोन्हीवेळेला न्यायप्रक्रिया पूर्ण करून दोषी व्यक्तींना सजा दिलेली आहे. पाकिस्तानावर हल्ला हे कशाचेही प्रत्युत्तर होऊच शकत नाही.

हे जर प्रतिसादात नितीनचंद्र, नंदिनी, उदयन यांनी लिहिलेय तसे असेल, तर ही लोक्स काँग्रेसला शिव्या का देतात? त्यांनीच बोफोर्स आणले अन इतरही रिसर्चला चालना दिली. मिसाईल मॅन कलाम देखिल नेहरू इंदिरेचे गुण गातात अग्नीपंखात??

(बुचकळ्यात) इब्लिस.

नंदिनी +१.
भारतीय सेनादले आणि त्यांची शस्त्र व सामर्थ्य ह्या विषयाचा मी पण एक चाहता आहे. कॉलेजमधे असताना पुण्याच्या ए आर डी ई मधे प्रोजेक्ट करायची संधी मिळाली होती तेव्हा तिथल्या लायब्ररीमधे ह्या विषयांवर जमतील तेवढी पुस्तके वाचली आणि नंतरही जमेल तसा ह्या विषयाशी संपर्क ठेवून आहे.

मला नाही वाटत कि भारतीय सेनादले आणि त्यांच्या सामर्थ्याबद्दल आपण जे काही वाचतो ते असत्य आहे.
आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि त्यातून आपण मिळवलेली विविध क्षेपणास्त्रे ह्यांच्या क्षमतेविषयी तिळमात्रही शंका घेता येणार नाही. ब्राह्मोस, पिनाक, अग्नी, प्रुथ्वी, राजेन्द्र (रडार प्रणाली), आकाश, नाग, अस्त्र सारखी विविध प्रकारची आणि रेंजची अस्त्रे स्वतः तयार करणे पाकिस्तानला जमले नाहिये. अर्जुन हा आपला रणगाडा जगात सर्वोत्तम नसेल पण वाईट नक्किच नाही. तेजस हे आपण तयार केलेले विमान आणि त्यासाठी वापरलं गेलेलं तंत्रज्ञान हे त्या प्रकारच्या विमानांमधे अग्रणी आहे (मी त्या प्रकारच्या म्हणतोय सरसकट सगळ्या विमनात नाही हे लक्षात घ्या). पाकिस्तानकडे आहे का असं काही? आपल्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचं अजून एक फलीत म्हणजे पी एस एल व्ही. हे दूरग्रह प्रक्षेपक. ते आज जगात अतिशय वरच्या दर्जाचे मानले जातात आणि त्यांची अचूकता वारंवार सिद्ध झाली आहे. ते विकसित करताना केलेलं संशोधन अग्नी तसेच सूर्य ह्या क्षेपणास्त्रांच्या विकासात उपयुक्त ठरलं आहे. आपल्या आरमाराकडे असलेल्या बर्‍याच विनाशिका आणि अणु इंधनावर चालणार्‍या पाणबुड्या आपण स्वतः बनवतो. शस्त्रांसाठी बाहेरील देशांवरचे अवलंबत्व आपल्यापेक्षा पाकिस्तानचे नक्किच जास्त आहे. अफगाणिस्तान मधल्या स्वार्थाला जपण्यासाठी अमेरिकेने फुकट देऊ केलेली शस्त्र मिरवणारा भारत नाही पाकिस्तान आहे.
हे मान्य कि आपल्याकडच्या लालफितीमुळे आणि राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे ढिसाळ कारभार चालतो. आणि त्याचे तोटे आपण प्रत्येक युद्धात सहन केले आहेत. आत्तापर्यंत झालेला विकास काहीच नाही किंवा अजून बराच पल्ला गाठायचाय असंही काही लोक म्हणू शकतील. पण जागतिक दबाव असताना आणि अमेरिकेचे कडक निर्बंध असताना स्वतःचे स्वतः अणु तंत्रज्ञान विकसित करून चाचण्या घेणे भारतानी करून दाखवले. त्याचं श्रेय घेण्यासाठी राजकारण्यांची चाललेली चढाओढ दुय्यम बाब आहे. अणस्त्र विकास, तेजस, अर्जून ह्यासारख्या उत्पादनांच्या विकासाला लागलेला प्रचंड वेळ नाकरता येणार नाही पण ६० वर्षांपूर्वी अक्षरशः शून्यातून सुरु करून एवढा पल्ला गाठणे भारताने करून दाखवले आहे. पाकिस्तानच्या अणूकार्यक्रमाविषयी न बोललेलेच बरे. 'न्युक्लीअर डिसेप्शन' चा सुधीर काळ्यांनी केलेला अनुवाद माबोवर उपलब्ध आहे. अजून काय सांगायचं!
इतिहास लिहिणार्‍याच्या नजरेतून वाचला जातो असं म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्याला आदर्शवत वाटणारे शिवाजी महाराज शेजारील राज्यात बरेच दिवस लुटारू म्हणून संबोधले जायचे.त्याचप्रमाणे ६५ व कारगिल युद्धांचं बाहेरच्या जगानी केलेलं विश्लेषण आपल्या देशात सांगितलं गेलं त्यापेक्षा वेगळं असणं शक्य आहे. पाकिस्तानसुद्धा त्या दोन्ही घटनांकडे पूर्ण पराभव म्हणून न बघता त्यांच्या सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याच्या गाथा सांगून वेगळं चित्र निर्माण करू पहाणारच. आपलेच सैनिक लई भारी आणि त्यांचे फुसके असं दोन्ही बाजू म्हणणार पण शेवटी युद्धात नुकसान दोन्ही बाजूंचं होतं आणि दोन्ही बाजूंचे सैनिक जीवाची बाजी लावतात हे अंतिम सत्य. कारगिल युद्धाकडे केवळ विजय म्हणून न बघता आपण त्यावेळी केलेल्या चुकांचही चितंन करणारे लेख मी वृत्त्पत्रातून वाचले आहेत (आपणही वाचले असतीलच). तेव्हा भारतातसुद्धा असा उहापोह होतो हे लक्षात घ्या. पण त्याच वेळी विजयाचा जयघोष न करता सतत त्यातल्या चुकांचं चिंतन व्हायला लागलं तर सामान्य माणसाचा आपल्याच सैन्यावरचा विश्वास कमी होईल. सैनिकही शेवटी माणूसच असतात. त्यांना उत्तेजन मिळावं म्हणून आपल्या विजयाचा उदो उदो करणं आवश्यकच आहे. आणि हे दोन्ही बाजूंना होणार.
'राष्ट्रवादाचा काळा चष्मा' न लावता, आपणही चुका केल्या आहेत आणि आपल्या यशांबरोबर काही अपयशेही आहेत हे लक्षात ठेवून मी हे लिहितोय हे कृपया समजून घ्या.

जखमेवर मीठ शिंपडणारा परिच्छेद काही पटला नाही.
http://www.indianexpress.com/news/the-strange-march-to-the-1965-war/1036...
http://www.indianexpress.com/news/from-gibraltar-to-grand-slam/1042727/0 - या लेखात पाकिस्तानी नेत्यांची /लष्करी अधिकार्‍यांची वक्तव्ये quote केलेली आहेत.
astri's public warnings that India would fight the war "at a time and place of its own choosing". अगदी हेच वाक्य भारताच्या सध्याच्या लष्करप्रमुखांनी अलीकडेच उच्चारले होते.

पाकिस्तानी लष्कराला आपण भारतापेक्षा वरचढ आहोत, युद्धात आपलाच विजय झाला/होईल हे पाकिस्तानी जनतेवर ठसवण्याची पराकोटीची गरज आहे. भारताला १९६२च्या युद्धात हार पत्करावी लागली, त्याबद्दल असे काही चुकीचे चित्र भारतात रंगवल्याचे दिसत नाही.
१९७१ च्या युद्धात पाक सैन्याने स्वीकारलेली सार्वजनिक शरणागती इतिहासातील एकमेव आहे.

माझया मताना सपोर्ट करणार्‍या या काही लिनक्स आणि एक आर्टिकल
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/nimittamatra/entry/%E0%A4%B...

SUNDAY TIMES, London, September 19, 1965.

"Pakistan has been able to gain complete command of the air by literally knocking the Indian planes out of the skies if they had not already run away.
Indian pilots are inferior to Pakistan's pilots and Indian officer's leadership has been generally deplorable. India is being soundly beaten by a nation which is outnumbered by a four and half to one in population and three to one in size of armed forces".

Peter Preston, The Guardian, London.
September 24, 1965.

"One thing I am convinced of is that Pakistan morally and even physically won the air battle against immense odds.
Although the Air Force gladly gives most credit to the Army, this is perhaps over-generous. India with roughly five times greater air power, expected an easy air superiority. Her total failure to attain it may be seen retrospectively as a vital, possibly the most vital, factor of the whole conflict.
Nur Khan is an alert, incisive man of 41, who seems even less. For six years until July he was on secondment and responsible for running Pakistan civil airline, which in a country, where now means sometime and sometime means never, is a model of efficiency. He talks without the jargon of a press relations officer. He does not quibble about figures, immediately one has confidence in what he says. His estimates proffered diffidently, but with as much photographic evidence as possible, speak for themselves. Indian and Pakistani losses, he thinks are in something like the ratio of ten to one.
"The Indians had no sense of purpose, the Pakistanis were defending their country and willingly taking greater risks. The average bomber crew flew 15 to 20 sorties. My difficulty was restraining them, not pushing them on".
" This is more than nationalistic pride. Talk to the pilots themselves, and you get the same intense story".

Patrick Seale, The Observer, London.
September 12, 1965.

"Pakistan's success in the air means that she had been able to deploy her relatively small army___ professionally among the best in Asia___ with impunity, plugging gaps in the long front in the face of each Indian thrust.
By all accounts the courage displayed by the PAF pilots is reminiscent of the bravery of the few young and dedicated pilots who saved this country from Nazi invaders in the critical Battle of Britain during the last war".

Roy Meloni, Correspondent of ABC,
September 15, 1965.

"I have been a journalist now for 20 years and want to go on record that i have never seen a more confident and victorious groups of soldiers than those fighting for Pakistan right now.
"India is claiming all out victory, i have not been able to find any trace of it. All i can see are troops, tanks and other war material rolling in a steady stream towards the front.
If the Indian Air Force is so victorious, why has it not tried to halt this flow?
The answer is that it has been knocked from the skies by Pakistani planes. These Muslims of Pakistan are natural fighters and they ask for no quarter and they give none.
In any war, such as the one going on between India and Pakistan right now, the propaganda claims on either side are likely to be startling, but if i have to take bet today, my money would be on Pakistan side.
Pakistan claims to have destroyed something like one third of the Indian Air Force, and foreign observers, who are in a position to know say that the actual kills may be even higher, but the PAF authorities are being scrupulously honest in evaluating these claims. They are crediting PAF only those killing that can be checked and verified from other sources.

Everett G Martin, General Editor, Newsweek,
September 20 1965.

"One point particularly noted by military observers is that in their first advances the Indians did not use Air power effectively to support their troops. By contrast, Pakistan, with sophisticated timing swooped in on several Indian bases and destroyed dozens of planes without any resistance from the Indians.
By the end of the week, it was clear that the Pakistanis were more than holding their own".

INDONESIAN HERALD,
September 11 1965.

"The chief of Indian Air Force could no longer ensure the safety of Indian air space. A well known Indian journalist, Frank Moraes, in a talk from All-India Radio also admitted that Indian Air Force had suffered severe losses and it was no use hiding the fact and India should be prepared for more losses.........".

Source: http://www.defence.pk/forums/military-history-strategy/161788-pakistan-a...

भारताला १९६२च्या युद्धात हार पत्करावी लागली, त्याबद्दल असे काही चुकीचे चित्र भारतात रंगवल्याचे दिसत नाही.
----- ६२ च्या भारत - चीन युद्धाची कारण मिमा.न्सा करणारा ब्रुक हॅ.न्डर्सन - भगत अहवाल आजही पन्नास वर्षानन्तर गोपनिय रहातो हे कशाचे प्रतिक आहे ?

आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि त्यातून आपण मिळवलेली विविध क्षेपणास्त्रे ह्यांच्या क्षमतेविषयी तिळमात्रही शंका घेता येणार नाही.
---- शंका घेणे आणि त्याचे निरसन करवुन घेणे नक्कीच चांगली गोष्ट आहे.

ब्राह्मोस, पिनाक, अग्नी, प्रुथ्वी, राजेन्द्र (रडार प्रणाली), आकाश, नाग, अस्त्र सारखी विविध प्रकारची आणि रेंजची अस्त्रे स्वतः तयार करणे पाकिस्तानला जमले नाहिये.
---- ठिक आहे, पाकला अशी शस्त्रे तयार करणे जमले नाही. पण असा सर्व शस्त्र साठा आपल्याकडे असतांनाही मुंबईवर केवळ १० लोकं चालुन येतात, अंदाधुंद गोळीबार करत अनेक निरपराध्यांचे प्राण घेतात. ते एक प्रकारचे युद्धच होते.

पाकने (म्हणजे पाक लष्कर आणि आय एस आय) अत्यंत तुटपुंजी गुंतवणुक केली होती आणि संपुर्ण भारताला जेरिस आणले होते. आता आपण खुप मोठा गाजावाजा करत कसाबला शिक्षा दिली... पण हल्ल्याचे नियोजन, आखणी करणार्‍यांच्या केसालाही आपण हात लावलेला नाही आहे आणि भविष्यांत त्यांच्या पर्यंत पोहोचण्याची शक्यता पण फार कमी आहे. शिक्षा जरुर झाली पण केवळ प्याद्याला.... Sad

ब्रम्होस, आकाश, नाग, पृथ्वी, अग्नी हे सर्व अस्त्र कारगिल, संसदेवरचा किंवा मुंबईवरचा हल्ला रोखण्यास असमर्थ ठरलेली आहेत.

थोडक्यांत पाक कडे अशी शस्त्रे बनवण्याचे सामर्थ्य नसेलही पण भारताला अत्यंत कमी गुंतवणुकीच्या लढाईत (कारगिल, संसद किंवा मुंबईवरचा हल्ला) जेरिस आणण्याचे सामर्थ्य जरुर आहे.

पण असा सर्व शस्त्र साठा आपल्याकडे असतांनाही मुंबईवर केवळ १० लोकं चालुन येतात, अंदाधुंद गोळीबार करत अनेक निरपराध्यांचे प्राण घेतात. ते एक प्रकारचे युद्धच होते.
>>त्यावेळेला क्षेपणास्त्रं चालवायला हवी होती???????

हे जर प्रतिसादात नितीनचंद्र, नंदिनी, उदयन यांनी लिहिलेय तसे असेल, तर ही लोक्स काँग्रेसला शिव्या का देतात? त्यांनीच बोफोर्स आणले अन इतरही रिसर्चला चालना दिली. मिसाईल मॅन कलाम देखिल नेहरू इंदिरेचे गुण गातात अग्नीपंखात??

>>> ही लोक्स मधे माझे नाव आहे म्हणून... जिथे उत्तम काम केलेले आहे तेव्हा त्याचे कौतुक होणारच, आणि जिथे शिव्या खाण्यालायक काम केलेले आहे तिथे शिव्या देणार- मग ते सरकार काँग्रेसचे असो, भाजपाचे, अथवा अपक्ष लोकांचे. बोफोर्स तोफांच्या क्वालिटीबद्दल कुणालाही शंका नसावी, पण त्या तोफांमधे झालेली लाचखोरी हा पूर्ण वेगळा विषय आहे, इथल्या चर्चेशी तो सुसंगत नाहीच.

थोडक्यांत पाक कडे अशी शस्त्रे बनवण्याचे सामर्थ्य नसेलही पण भारताला अत्यंत कमी गुंतवणुकीच्या लढाईत (कारगिल, संसद किंवा मुंबईवरचा हल्ला) जेरिस आणण्याचे सामर्थ्य जरुर आहे.
>> +१. पण अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने युद्ध पुकारणे याचे परिणामदेखील भयंकर आहेत. भारताला सीमासुरक्षेइतकंच महत्त्व अंतर्गत सुरक्षेसाठीपण द्यावे लागेल. आणी बर्‍याचदा गाडं इथेच अडतं.

मुळात भारताला (इथले नागरिक आणि सरकार) पाकिस्तानद्वेष हेच प्रायमरी काम नाही. सशस्त्र सेनादलासोबत अनेक क्षेत्रांमधे भारताने प्रगती केलेली आहे. याउलट पाकिस्तानमधे भारतद्वेष हेच एकमेव काम अजेंड्यावर असलेले चित्र दिसत आहे.

बावरा मन, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? किती सालातली माहिती देत आहात? १९६५ च्या लिंक्स देत आहात. सध्या २०१३ चालू आहे. ६५नंतर पाकिस्तानने किती स्थित्यंतरे पाहिली आहेत? किती लोकशाहीनिर्वाचित सरकारांनी कामकाज केले आहे? पाकिस्तानने एकंदरीत (सेनादले वगळता) इतर क्षेत्रांमधे काय प्रगती केली आहे? पाकिस्तानचा आयात निर्यात व्यापार कसा चालतो? त्याउलट भारताची परिस्थिती काय आहे? भारतामधे किती लष्करशहांनी डोईजड होण्याचा प्रयत्न (तरी) केला?

भारत हा परफेक्ट देश आहे असं बिल्कुल म्हणायचं नाही, पण एवढ्या प्रचंड भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक विविधता असतानादेखील भारताने प्रगती केलेली आहे हे निर्विवाद सत्य.

भारतीय हवाईदलातील नॅट विमानांच्या कामगिरीबद्दल अक्षरही नाही?

These Muslims of Pakistan are natural fighters and they ask for no quarter and they give none.> हे वाक्य बायस्ड आहे. चर्चिलपासून चालत आलेला अपप्रचार.

http://indianairforce.nic.in/show_page.php?pg_id=70
भारतीय हवाई दलाच्या संकेतस्थळावर १९६५ च्या युद्धाबद्दल असलेल्या माहितीतील शेवटच्या परिच्छेदात कोर्स करेक्शनच्या आवश्यकतेबद्दल लिहिले आहे.

पाकिस्तान आपल्या सैनिकांना टोळीवाल्यांच्या, दहशतवाद्यांच्या नावाखाली भारतात पाठविते आणि आमचा काही संबंध नाही अशा काखा वर करते, आपल्या सैनिकांचे मृतदेहही स्वीकारत नाही याबद्दल या संकेतस्थळावर काय बरे लिहिले जाते?

http://www.nation.com.pk/pakistan-news-newspaper-daily-english-online/co...
Kargil, like every other meaningless war that we have fought, brings home lessons we continue to refuse to learn
हे लिहिणारा निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी आहे.

भारत हा परफेक्ट देश आहे असं बिल्कुल म्हणायचं नाही, पण एवढ्या प्रचंड भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक विविधता असतानादेखील भारताने प्रगती केलेली आहे हे निर्विवाद सत्य.
------ निर्विवाद सत्य... याबाबत कुठलाही वाद नाही.

पण असा सर्व शस्त्र साठा आपल्याकडे असतांनाही मुंबईवर केवळ १० लोकं चालुन येतात, अंदाधुंद गोळीबार करत अनेक निरपराध्यांचे प्राण घेतात. ते एक प्रकारचे युद्धच होते.
>>त्यावेळेला क्षेपणास्त्रं चालवायला हवी होती???????
------ अजिबात नाही... किंवा संसदेवर हल्ला झाला आणि १० लाखाची फौज सिमेवर नेणे (किती खर्चिक काम आहे) असे पण सुचवायचे नाही आहे.

समोरचा देश त्याला हवे त्या वेळी/ स्थळी छोटे छोटे हल्ले करत रहातो आणि आपण केवळ हल्ला झाल्यावर ते परतवण्याचे किंवा त्या पासुन बचावाचे धोरण अवलंबतो (पर्याय आहे कुठे ?). शत्रु राष्ट्राची या हल्ल्यांसाठीची गुंतवणुक, आणि प्रतिक्रिया देत असतांना किंवा बचाव करतांनाची आपल्याला मोजावी लागणारी किंमत या मधे जमिन - आस्मानाचा फरक आहे.

आता अमेरिकेवर हल्ला झाला.... अफगाणीस्तान मधे त्यांच्या सैन्यांवर इतके हल्ले होतात... व्हिएटनाम मधे तोंड्घाशी पडले........इतका सामर्थ शाली देश तरी त्याच्या बाबतीत असे घडले... ???????????????

दोन आठवड्यातील बातमी होती की भारताकडे आता पाण्यातुन, हवेतुन आणि जमिनीवरुन अशी तिन्ही प्रकारे मारा करु शकतील अशी क्षेपणास्त्रे आहेत.

गैरसमज होतो आहे. पाकिस्तानी हवाइदलाने भारतीय हवाई दलावर १९६५ मध्ये प्रभुत्व गाजवले होते असे मानण्यात येते. त्यासाठी ही १९६५ ची लिंक दिली आहे. वरच्या अजुन २ लिंक पण पाहा की : )

हे जर प्रतिसादात नितीनचंद्र, नंदिनी, उदयन यांनी लिहिलेय तसे असेल, तर ही लोक्स काँग्रेसला शिव्या का देतात? त्यांनीच बोफोर्स आणले अन इतरही रिसर्चला चालना दिली. मिसाईल मॅन कलाम देखिल नेहरू इंदिरेचे गुण गातात अग्नीपंखात??

(बुचकळ्यात) इब्लिस.

मुळ मुद्याला धरुन लिहलत तर बर. माझ्या प्रतिसादात काँग्रेसच नाव घेतलल नाही. माझ काँगेसबाबत इतरत्र असलेल सर्वसाधारण मत आणि भारताची लष्करी क्षमता हे वेगळे विषय आहेत.

विषय निघालाच आहे म्हणुन लिहतो की लायक काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करायला मी मागेपुढे पहात नाही. स्वतःच्या हाताने सुत कातुन त्याचे कपडे घालुन जनहित साधणारे एक दिवंगत काँग्रेस कार्यकर्ते माझ्या वडीलांचे गुरु आणि माझे आदर्श आहेत.

बावरा मन २ गोष्टी
१) १९६५, १९७१ ची युद्धे शीतयुद्धाच्या काळखंडात झाली. यात अमेरिका आणि युरोपने पाकिस्तानला आणि रशियाने भारताला मदत केली होती त्यामुळे तो प्रोपोगेंडा प्रकाशित करण्यात काही हशील नाही. ते लेख नक्कीच बायस्ड आहेत.

तुम्ही रिझल्ट्स पाहुन पण युद्धाची स्थिती समजु शकतात.
त्या मुर्ख वार्ताहराला पाकिस्तानचा फ्रंटपर्यंतचा सप्लाय खंडित झालेला दिसला नाही त्याला कोणीतरी हा लाहोरजवळचा भारतीय तुकडीचा फोटो http://en.wikipedia.org/wiki/Lahore_Front दाखवायला हवा होता .
खेमकरणला पॅटन रण्गाड्यांचे जे स्मशान झाले ते दाखवायला हवे होते.

यात हे मान्य आहे की अमेरिकेने पाकिस्तानला पुरविलेली विमाने काही बाबतीत सुपिरिअर होती आणि यामुळे IAF चे जास्त नुकसान झाले हे सर्वश्रुत आहे. असे असुन सुद्धा भारताकडे एवढी विमाने होती की पाकिस्तानने युद्ध्बंदी केली नसती तर त्यांची अवस्था बिकट झाली असती. यानंतर भारतीय हवाईदलाचे आधुनिकीकरण करण्यात आले ज्यामुळे पाकिस्तानला १९७१ मध्ये सर्व युद्धात चीत करण्यात आले.

२) दुसरा बायस असा जाणवला की भारताने संपुर्ण वर्चस्व गाजवलेले १९७१ चे युद्ध संदर्भ लेखात वगळण्यात आले.
१९७१ मध्ये जर पाकिस्तान विमान दलाला तर दारुण पराभव स्वीकारवा लागला याचा उल्लेख कसा नाही. या युद्धात तर जॉर्डन, लिबिया कडुन भिका मागुन पाकिस्तानने कसे बसे हवाई युद्ध चालु ठेवले होते.

शत्रुचा पॉइन्ट ऑफ व्हु म्हणजे शत्रुचा प्रोपोगेन्डा नव्हे. १९६२ ला आपल्याला चीन विरुद्ध हार मानावी लागली हे जसे निश्चित आहे तसेच १९६५, १९७१ मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला हे निश्चित आहे. १९६५ मध्ये हवाइदलाचे आपले थोडे जास्त नुकसान झाले एवढेच फार तर म्हणता येइल (पाकिस्तानी हवाईदलाचा विजय झाला असे मुळीच नाही) जमिनीवर आणि समुद्रात काय झाले याचा चित्रांसकट पुरावा सर्वत्र आहे.

बावरा मन,

आपल्या लेखातल्या पाकिस्तानी वरचढपणाच्या वार्ता अतिशयोक्त वाटतात. मात्र तरीही आपण चर्चिलेले भारतीय सैन्याच्या त्रुटींच्या संदर्भातले मुद्दे महत्त्वाचे आहेत.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कारगिल युद्धाचा हेतू पूर्णपणे सफल झाला नाहीये. शिखर ५३५३ आजूनही पाकच्या ताब्यात आहे. केवळ विजय झाला असा गाजावाजा करून वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्यात तर आलेली नाही ना अशी शंका येते.

नेमकी हीच शंका १९६५ च्या युद्धाच्या बाबतीत वर्तवली जाते. खान अब्दुल गफारखानांनी तेव्हा पाकवर जहरी टीका केली होती. भारताने लाहोर जिंकून पुढे मुसंडी मरायला हवी होती. किंबहुना तशी जय्यत तयारीही चालू होती. मात्र तितक्यात सोव्हियेत संघाने हस्तक्षेप केला. (बरेच लोक अमेरिकेच्या सांगण्यावरून केला असं म्हणतात.) त्यावेळी अमेरिका भारताच्या विरुद्ध होती. म्हणून भारताच्या मित्रराष्ट्रात म्हणजे सोव्हियेत रशियात तहाची बोलणी झाली. हाच तो ताश्कंद तह. गफारखानांना आशा होती की भारतीय सैन्य पुढे येऊन वायव्यसीमाप्रांत पाकच्या जोखडाखालून मुक्त करेल. पण तसं झालं नाही.

तहावर सह्या झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी शास्त्रीजींना विषप्रयोग करून ठार करण्यात आलं. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा आचारी पाकिस्तानात पळून गेला. तो अगोदर मौलाना आझाद यांचा खानसामा होता. याबद्दल सावरकरांनी शास्त्रीजींना दोषही दिला आहे.

त्यामुळे १९६५ च्या युद्धात भारताने गमावलं भरपूर असं म्हणायला जागा आहे.

हाच प्रकार १९७१ च्या युद्धातही झाला. भारताने पाकव्याप्त काश्मीर मोकळं करायची सुवर्णसंधी दवडली. तसेच चीनपाकची अनधिकृत सीमारेषाही नष्ट करण्याची संधी वाया घालवली. याह्याखान आणि टिक्काखान या नराधमांवर खटले दखल केले नाहीत. शिवाय पाकची ९३,००० बलात्कारी डुकरे भारताच्या हाती लागली होती. त्यांना खाऊपिऊ घालून परत पाठवलं. परंतु आपले १५२ सैनिक पाकच्या तावडीत सापडले होते, त्यांच्याबद्दल एक चकार शब्दही काढला नाही. कित्ती कित्ती जय हो! हे सर्व चालू असतांना भारताची जी पंतप्रधान होती तिचं खरं नाव मी सांगत नाही (सत्यमेव जयते बरंका!). जिज्ञासूंनी स्वत: तपास करावा.

असो.

आता चालू घडामोडींकडे वळूया. ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन भारताच्या दौर्‍यावर आलाय. ब्रिटीश व अमेरिकी उच्चपदस्थ भारतभेटीवर आले की पाकमध्येही जातात. यावेळी परिस्थिती वेगळीच आहे. कॅमेरन पाकमधून धडपणे जिवंत परत येऊ शकेल का अशी शंका आहे. म्हणून पाकला चुचकारण्यासाठी पंतप्रधान परवेझ अश्रफला लंडन मध्ये बोलावून घेतलं. तुमचे शत्रू ते आमचेही शत्रू वगैरे जुनीच गाणी नव्याने आळवली.

कॅमेरन आर्थिक मंदीसाठी भारतात आलाय असं वरकरणी भासवलं जातंय. पण मंदी तर २००८ सालापासून चालू आहे. आत्ताच यायचं कारण काय?

लफडा असा आहे की अमेरिकेला गांधारातून सैन्य माघारी घ्यायची जबरी घाई झालीये. एकतर सैन्य अडकून पडतं आणि फलनिष्पत्ती काही नाही. तीच गोष्ट ब्रिटनचीही आहे. २०१४ ला शेवटचा अमेरिकी सैनिक गांधाराबाहेर पडेल. त्यावेळी भारतात ज्या संभाव्य घटना घडणार आहेत त्या आपल्याला अनुकूल असाव्यात म्हणून कॅमेरन भारतात चाचपणी करायला आलाय. अर्थात, यांत सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे मोदी यांचे दिल्लीतले सत्तारोहण.

भारतीय सैन्याची सर्वात मोठी रड म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा (व पाठबळाचाही) अभाव ही आहे. ही त्रुटी मोदी निश्चितच भरून काढतील असा विश्वास आम जनतेला वाटतो. त्यामुळे मोदींच्या वेळेस गांधारातील परिस्थिती भारताला फार मोठ्या प्रमाणावर अनुकूल होणार अशी अटकळ बांधण्यात येते.

या पार्श्वभूमीवर लेखातले निष्कर्ष तपासून पाहूया.

१. भारतीय सैन्याकडे पुरेसा दारूगोळा नाही.
२. सैन्याचे, नौदलाचे, वायुदलाचे आधुनिकीकरण फार हळू होते आहे.
३. १९६२, १९६५, १९७१ आणि कारगिल या युद्धांचे पारदर्शक मूल्यमापन झाले नाही.
... यादी अपूर्ण....

मोदींच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा निश्चितच समाचार घेतला जाईल असा अंदाज जगातल्या संरक्षणतत्ज्ञांनी बांधला तर तो फारसा चुकीचा म्हणता येणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

बावरा मन आणि सकाळ-फेम 'सुधीर काळे' ही एकच व्यक्ती आहे का?
त्यांची तुल्यबळ तुलना होउच शकत नाही.हे खरे बावरे मन वाले आहेत आहे की नाही हो.

मागे एकदा असे वाचनात आले होते की पाकिस्तान वर वर्चस्व ठेवायच असेल तर दोन्हिकडच्या लष्कराच प्रमाण (लष्करी तैयारि, साधनासामुग्री, संख्याबळ या निकषांवर) २:१ असे हवे. मागे वि. पी. सिंग
पंतप्रधान असताना हे प्रमाण ढासालले होते आणि तेंव्हा सिंग यानी त्याबद्दल जाहीर चिंता व्यक्त केली होती. आता पण दारुगोल्याचा अभाव, रात्री लढू शकणार्‍या टॅंक्स चा अभाव आणि प्रलंबित शस्त्र डील्स यामुळे पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण zआलि होती. माजी लष्कर प्रमुखानि ते पदावर असताना मनमोहन सिंघ याना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. लष्कराची परिस्थिती हंकी डॉरी नक्कीच नाही.

Pages