आता आपण भेटलो, आणि काही बोलायलाच सुचलं नाही तर? बोलायचा प्रयत्न करावा लागला तर....
अगदी दुखर्या जागेवर बोट आहे हे. कॉलेजात जाण्याची हिम्मत होत नाही ते यामुळेच. ते थडगं बघायचं आणि त्यावर माती लोटायचं नशीब आपल्या पदरी येऊ नये म्हणून.
आता बरेच जुने मित्र भेटतातही, पण ते मैत्र सापडत नाही. सर्वांनी आपापल्या पायर्या क्धीच मागे सोडलेल्या असतात. आणि हळहळीत नंतरचे कित्येक दिवस निघून जातात.
मीही ह्याच भीतीने जुन्या मैत्रिणींना भेटायचे टाळते. एका मैत्रिणीला गेले दोन वर्षे फोनवर फक्त सांगतेय भेटु भेटू म्हणुन, पण अमुक एक जागी म्हणुन फोन अजुन गेला नाहीये.......
ते जुने क्षण जसे लक्षात आहेत तसेच तिथेच राहुदेत, उद्या जुनी मैत्रिण भेटली आणि काय बोलायचे ते सुचलेच नाही तर मग त्या जुन्या क्षणांना हे नवे क्षणही जाऊन मिळणार आणि मग नेहमी त्या सुंदर जुन्या आठवणीबरोबर ही नवी आठवणही येणार... त्यापेक्षा नकोच ते...
काल्पनिक पेक्षा मनोमनीचं पत्र...
"आपलं असं कध्धीच होणार नाही" असं म्हणता म्हणता आपलं तस्संच झालंय हे मन स्वीकारायला तयार होत नाही. नुकतीच या परिस्थितीला सामोरी जायला सुरुवात झाली असल्यानं दोन चार हुंदके दाटले एवढंच्..पुढे पुढे तेही होणार नाही एवढं मन निबर होईल याची कल्पना आहेच.
साजिर्या, अगदी.
वाह ! मस्त !
पत्र लिहावं लिहावं असं मनातून वाटत असतं, मनापासून. कधीतरी कुणालातरी हे सांगायचं असतं. स्वतःशीच प्रांजळपणे कबूल करायचं असतं. ते तू या निमित्ताने पूर्ण केलंस ते चांगलं केलंस.
अप्रतिम!
ते ३ इडियट्स पाहताना माझ्याही मनात हाच प्रश्न आला आणि लगेच स्वतःलाच चाचपडले व गप्प बसले कारण इथेही तीच परिस्थिती कितीतरी मैत्रीणी (ज्या एकेकाळी त्या त्या वेळी) जीवश्च, कंठश्च होत्या आज त्यांच्या फक्त आठवणीच आहेत.
बरेच वर्षांनी मधे एका मैत्रीणीला भेटले होते.. त्यावेळी पण अगदी हेच बोललो दोघी की काय बोलत होतो आपण इतकं तासन तास देव जाणे.. आता मात्र खरच विषय शोधावे लागतात..
त्या वयात कोणी सांगितलं असत की तुम्ही दुरावणार आहात तर विश्वास बसला असता? परत एकदा, दूर राहिल्यामुळे दुरावलेले आपण का? माझ्या बाबतीतपण असं झालं आहे.
माझी आतेबहीण आहे. तिचा शाळेपासून १० जणींचा ग्रुप होता. लग्न होऊन ७ जणी पुण्यात. महिन्या दोन महिन्याने सगळ्या एकत्र यायच्या. कोणाच्या घरी नाही बाहेरच. कारण काय तर मोठ्ठ्यांदा बोलणं हसणं ह्याचा घरी त्रास होऊ नये म्हणजे कोणि म्हणू ये एवढ्या मोठ्ठ्या झाल्या पण .... आता रिटायर झाल्यावर सगळ्या परत पुण्यात सेटल झाल्या आहेत. दर महिन्याआड १० जणी भेटतात. सगळ्या आज्या झाल्या आहेत आता पण बागेत जाऊन हसणं खिदळणं अजून शाळेसारखं चालतं त्यांच. थोडीशी असूया वाटते का मला?
स्वाती, पत्र छान आहे.. पण खरच अशी मैत्रिण असेल तर नक्की पाठव तिला!
who knows, कदाचित गोष्टी जुळुनही येतील पुन्हा!
अशीच विरतात ही नाती. का कोण जाणे.
>> कुणाची कविता ते आठवत नाही.. पूर्ण कविता आठवत नाही, फक्त "नात्यांनाही आपलं आयुष्य असतं, हे आता मला कळायला लागलय" अशा काहिशा ओळी होत्या, त्या आठवतात!
सुंदर आहे हे पत्र! अक्षरही अप्रतिम. पण स्वाती असा हेवा वाटण्याइतका संवाद जिच्यासोबत त्या वयात जडलेला असतो ना तो नाही तुटत. कदाचित प्रत्येक वेळी भेटल्यावर नाही होणार परत तशाच गप्पा पण तरी खूप काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त तिलाच समजून येतील असा एक विश्वास रहातो मनात. मधल्या काळात कधी त्या मुद्दाम उच्चारल्या जात नाहीत पण जणू काही तिच्यासाठीच राखून ठेवलेल्या असाव्यात तशा त्या आपल्या मनात रहातात. कधीतरी तसा माहोल जमतोच आणि संवाद आपोआप मनात उमलून येतो, मग अशावेळी आपण जिथे कुठे गप्पा मारत बसू त्या ठिकाणी त्या कॉलेजातल्या पायर्या आपोआप आजूबाजूला रचल्या जातात.
हा हे मात्र खर की नंतरच्या काळात आपल्या मैत्रिणीची जी कोणी जवळची मैत्रिण झालेली असेल ती आपल्याला मात्र कधीच आवडत नाही मनातून, तिचे उल्लेखही नाहीच आवडत आणि अगदी ते उघड दाखवण्याचाही बालिशपणा हातून घडतो. त्याचही काही वाटत नाही.
अतिशय आवडल...
आपल्या पायर्यावर कुणी बसलेलं बघवणार नाही...अगदी अगदी..
सुंदर पत्र. अशीच विरतात ही नाती. का कोण जाणे.
स्वाती, सुरेख पत्र, काल्पनिक आणि तरीही अगदी खरंखुरं.
खूप आवडलं हे पत्र.
ज्या मित्रासोबत रात्र रात्र गप्पा मारल्या तो आता भेटला तर विषय पण नाही सापडत बोलायला ....
आता आपण भेटलो, आणि काही बोलायलाच सुचलं नाही तर? बोलायचा प्रयत्न करावा लागला तर....
अगदी दुखर्या जागेवर बोट आहे हे. कॉलेजात जाण्याची हिम्मत होत नाही ते यामुळेच. ते थडगं बघायचं आणि त्यावर माती लोटायचं नशीब आपल्या पदरी येऊ नये म्हणून.
आता बरेच जुने मित्र भेटतातही, पण ते मैत्र सापडत नाही. सर्वांनी आपापल्या पायर्या क्धीच मागे सोडलेल्या असतात. आणि हळहळीत नंतरचे कित्येक दिवस निघून जातात.
अप्रतिम, स्वाती.
अगदी साजिरा.. पर्फेक्ट..
सुंदर पत्र...
मीही ह्याच भीतीने जुन्या मैत्रिणींना भेटायचे टाळते. एका मैत्रिणीला गेले दोन वर्षे फोनवर फक्त सांगतेय भेटु भेटू म्हणुन, पण अमुक एक जागी म्हणुन फोन अजुन गेला नाहीये.......
ते जुने क्षण जसे लक्षात आहेत तसेच तिथेच राहुदेत, उद्या जुनी मैत्रिण भेटली आणि काय बोलायचे ते सुचलेच नाही तर मग त्या जुन्या क्षणांना हे नवे क्षणही जाऊन मिळणार आणि मग नेहमी त्या सुंदर जुन्या आठवणीबरोबर ही नवी आठवणही येणार... त्यापेक्षा नकोच ते...
काल्पनिक पेक्षा मनोमनीचं पत्र...
"आपलं असं कध्धीच होणार नाही" असं म्हणता म्हणता आपलं तस्संच झालंय हे मन स्वीकारायला तयार होत नाही. नुकतीच या परिस्थितीला सामोरी जायला सुरुवात झाली असल्यानं दोन चार हुंदके दाटले एवढंच्..पुढे पुढे तेही होणार नाही एवढं मन निबर होईल याची कल्पना आहेच.
साजिर्या, अगदी.
सुंदर पत्र..
अरे हो, सुंदर हस्ताक्षर, छापल्यासारखं हे सांगायचं राहिलंच!
स्वाती हे पण तुमचे पत्र अप्रतिम .. अगदी हस्ताक्षरासहित. प्रत्येक परिच्छेद वाचताना 'अगदी अगदी हेच मलाही वाटतंय' असाच आतुन प्रतिसाद येतोय.
स्वाती, आवडलं.
अक्षराइतकच सुरेख आहे पत्र. अप्रतिम. साजिर्यानी म्हंटल्यासारखच दुखती रग! बर्याचदा वाचलं जाणार हे आता.
वाह ! मस्त !
पत्र लिहावं लिहावं असं मनातून वाटत असतं, मनापासून. कधीतरी कुणालातरी हे सांगायचं असतं. स्वतःशीच प्रांजळपणे कबूल करायचं असतं. ते तू या निमित्ताने पूर्ण केलंस ते चांगलं केलंस.
अतिशय सुरेख.. काल्पनिक वाटतच नाहिये हे पत्र..
समुद्र हा आणखी एक.. क्रश >> किती सुरेख कल्पना आहे ही..
अप्रतिम!
ते ३ इडियट्स पाहताना माझ्याही मनात हाच प्रश्न आला आणि लगेच स्वतःलाच चाचपडले व गप्प बसले कारण इथेही तीच परिस्थिती कितीतरी मैत्रीणी (ज्या एकेकाळी त्या त्या वेळी) जीवश्च, कंठश्च होत्या आज त्यांच्या फक्त आठवणीच आहेत.
अतिशय छान पत्र स्वाती...
बरेच वर्षांनी मधे एका मैत्रीणीला भेटले होते.. त्यावेळी पण अगदी हेच बोललो दोघी की काय बोलत होतो आपण इतकं तासन तास देव जाणे.. आता मात्र खरच विषय शोधावे लागतात..
अगदी मनातलं पत्र..
अप्रतिम पत्र! आणि अक्षर तर सुरेखच!
स्वाती,सुरेख पत्र.. आवडलं.. आणि अक्षरही...
छान लिहिलं आहेस. आणि अक्षरही सुंदर.
त्या वयात कोणी सांगितलं असत की तुम्ही दुरावणार आहात तर विश्वास बसला असता? परत एकदा, दूर राहिल्यामुळे दुरावलेले आपण का? माझ्या बाबतीतपण असं झालं आहे.
माझी आतेबहीण आहे. तिचा शाळेपासून १० जणींचा ग्रुप होता. लग्न होऊन ७ जणी पुण्यात. महिन्या दोन महिन्याने सगळ्या एकत्र यायच्या. कोणाच्या घरी नाही बाहेरच. कारण काय तर मोठ्ठ्यांदा बोलणं हसणं ह्याचा घरी त्रास होऊ नये म्हणजे कोणि म्हणू ये एवढ्या मोठ्ठ्या झाल्या पण .... आता रिटायर झाल्यावर सगळ्या परत पुण्यात सेटल झाल्या आहेत. दर महिन्याआड १० जणी भेटतात. सगळ्या आज्या झाल्या आहेत आता पण बागेत जाऊन हसणं खिदळणं अजून शाळेसारखं चालतं त्यांच. थोडीशी असूया वाटते का मला?
सुन्दर आणि सुवाच्य पत्र!
स्वाती, पत्र छान आहे.. पण खरच अशी मैत्रिण असेल तर नक्की पाठव तिला!
who knows, कदाचित गोष्टी जुळुनही येतील पुन्हा!
अशीच विरतात ही नाती. का कोण जाणे.
>> कुणाची कविता ते आठवत नाही.. पूर्ण कविता आठवत नाही, फक्त "नात्यांनाही आपलं आयुष्य असतं, हे आता मला कळायला लागलय" अशा काहिशा ओळी होत्या, त्या आठवतात!
>>पण ते मैत्र सापडत नाही.
अगदी पर्फेक्ट $भाय.
बाईबिबा - शतशः धन्यवाद !
अतिशय सुंदर हस्ताक्षर.
मस्त लिहिलंय !
सुंदर आहे हे पत्र! अक्षरही अप्रतिम. पण स्वाती असा हेवा वाटण्याइतका संवाद जिच्यासोबत त्या वयात जडलेला असतो ना तो नाही तुटत. कदाचित प्रत्येक वेळी भेटल्यावर नाही होणार परत तशाच गप्पा पण तरी खूप काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त तिलाच समजून येतील असा एक विश्वास रहातो मनात. मधल्या काळात कधी त्या मुद्दाम उच्चारल्या जात नाहीत पण जणू काही तिच्यासाठीच राखून ठेवलेल्या असाव्यात तशा त्या आपल्या मनात रहातात. कधीतरी तसा माहोल जमतोच आणि संवाद आपोआप मनात उमलून येतो, मग अशावेळी आपण जिथे कुठे गप्पा मारत बसू त्या ठिकाणी त्या कॉलेजातल्या पायर्या आपोआप आजूबाजूला रचल्या जातात.
हा हे मात्र खर की नंतरच्या काळात आपल्या मैत्रिणीची जी कोणी जवळची मैत्रिण झालेली असेल ती आपल्याला मात्र कधीच आवडत नाही मनातून, तिचे उल्लेखही नाहीच आवडत आणि अगदी ते उघड दाखवण्याचाही बालिशपणा हातून घडतो. त्याचही काही वाटत नाही.
खूप खूप आवडल स्वाती.
सुरेख लिहीलय. शर्मिला तुमची प्रतिक्रिया पण आवडली.
खूपच सुंदर पत्र!
खुप छान लिहिलय
अप्रतिम पत्र! आणि अक्षरही सुंदर.. !!