Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 27, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through September 27, 2006 « Previous Next »

Sanash_in_spain
Thursday, August 10, 2006 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफा, खरचं मूडी म्हणते तसे नशीबवान आहेस, भारतात येईल का कधी असे अनुभवायला.
एकदा म्युनिक ला आम्ही एका आजोबांना काहीतरी विचारत होतो पण त्यांना इंग्लिश येत नव्हते आणि आम्हाला जर्मन. ते आपले बडबड करताहेत शेवटी आम्ही thank you म्हणुन पुढे चालायला लागलो. त्यांनी पून्हा आम्हाला गाठले, हातवारे करुन(जर्मन मध्ये बोलूनच) समजेपर्यंत सोडले नाही. तसाच लंडन चा पण अनुभव, आम्ही नकाशा बघत उभे होतो, एका इंग्लिश आजोबांनी स्वता:हून येऊन विचारले, "Do you need some help?". आणि ते exactly सांगू सुद्धा शकले तो पत्ता.


Bee
Friday, August 11, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफ़े, तू न घाबरता पुढे पुढे येत गेलीस म्हणून तुला तुझे hotel मिळाले. त्या प्रशांतसारखी मागे मागे राहीली असतीस तर ते hotels मिळूच शकले नसते.

Kiran
Saturday, August 12, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wow, सोनचाफा खरच नशिबवान तु. खरेतर युरोपच्य लोकान्चे त्यंच्या भाशेवरील प्रेम अभूतपुर्वच आहे. अगदि आपल्यकदे मद्रास ला गेल्यावर जसा अनुभव येतो ना तसच france , germany, italy, austria ह्या देशात येतो. पण सगळेच तसे असतात असे नाही.

आम्ही france ला गेलो असताना चक्क तिथल्या train ची overhead wire तुटलेली. आणि फक्त आपल्यच मुंबईत असे होते असे नाही असे कळुन आनन्द झाला. पण त्यामुळे आमचि hotel वर जायचि पंचाईत झाली. तिथला railway tkt counter वरच्या माणसालाही english येत मव्हते किंवा बोलायचे नव्हते. पण आमच्या नशिबाने तिथे अजुन एक फ़्रेन्च माअणुस भेटला त्याला english बोलायची जाम हौस होती. कधीतरी शाळेत शिकलेला त्यनंतर कधी वपरयची वेळच नाही. पण त्यानेच मग आम्हाला मदत केली. आम्हि त्याला english शब्द सांगितले की तो खुश व्ह्यायचा!!


Sonchafa
Sunday, August 20, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय मित्रांनो, नशीबवान तर खरच आम्ही.. परदेशातले एकेकांचे अनुभव माहित असताना असा अनुभव येणं हे अश्चर्यच आहे.. पण आता हे परत वाचल्यावर वाटतय की कदाचित हे सगळे मी 'माझ्या वेंधळेपणाचे किस्से' ह्या बीबी वर लिहायला हवे होते! काय म्हणता?

Kiran
Monday, August 21, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या नव्हे तुझ्या मित्राच्या!!

Suhani
Wednesday, September 27, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एअर इंडिया बंद करा
नागरी विमान वाहतूक मंत्री काय करतायत?

सप्टें च्या पहिल्या आठवड्यातील गोष्ट आहे. आम्ही भारतात सुट्टिवर गेलेले लोकं आपापल्या कामाच्या देशी परतत होतो. इतर कुठ्ल्याहि एअर लाइनचं कन्फ़र्म तिकीट मिळत नव्हते आणि आम्हलाही त्याच तारखेला येणं भाग होतं. त्यामुळे एअर इंडिया चं जेवढ्याला पडेल तेवढ्याला आम्ही तिकीट घेतलं होतं. म्हटलं चला आपल्याच देशाची एअर लाइन आहे!!!.... तिकीट काढलं तेव्हाच बर्‍याच लोकांकडून आम्ही एअर इंडियाची किर्ती ऐकली होती पण म्हटले ठिक आहे आपण स्वत: जाऊन बघू. पण खरच सांगते एवढी घणेरई एअर लाइन मी अत्तापर्यंत तरी बघितली नाही. इंग्रजीत ज्याला
rediculous आणि disgusting म्हणतात, तीच विशेषणे मी एअर इंडियाला लावीन.
आम्ही पुण्याहून मुंबईला येतो. त्यामुळे आम्ही रात्री बारा वाजताच विमानतळावर हजर होतो. खरं तर आमचे विमान सकाळी सात वाजता होते. पण रात्री उगाचच उशीर व्हायला नको म्हणून आम्ही बोर्डींगच्या आधी सात तास विमानतळावर आलो होतो. पहाटे३:३० च्या दरम्यान चेकींग काऊंटर चालू झाले. आम्ही पण मी, माझा नवरा आणि माझी पाच वर्षाची मुलगी ३:५० ला क्यू मध्ये उभे राहिलो. अएर इंडीयाच्या कर्मचार्‍यांनी घोषणा केली की फ़क्त फ़्रँकफ़र्ट ला जाणार्‍यांनी वेगळी रांग करा आणि शिकागो ला जाणार्‍यांनी वेगळी रांग करा.ठिक आहे म्हटलं कारण विमान मुंबईहून्- फ़्रँकफ़र्ट आणि मग पुढे शिकागो ला जाणार होतं.त्यातून आमचे तिकीटही कन्फ़र्म होते, आमच्याकडे सीट नंबरही होते. मग कसली आली होती चिंता? आणि क्यू मध्ये पण आमचा सहावा-का सातवाच नंबर होता.
पण त्यालाही आता एक तास होत आला होता,काऊंटर वर खूपच हळूहळू काम चालले होते. इकडे फ़्रँकफ़र्ट च्या काऊंटर वर भराभरा काम होऊन तो क्यू संपला सुद्धा आणि अचानक पाच वाजता एअर इंडीयाने आमचे काउंटर बंद केले.आणि सरळ निर्लज्ज पणे सांगितले की फ़्लाईटचे बुकींग फ़ुल झाले आहे,तेव्हा बाकिच्यांनी उद्याचे बोर्डींग पासेस घ्यावेत.तुमची रहाण्याची किंवा येण्या जाण्याची व्यवस्था केली जाईल. अरे ही काय सांगण्याची पध्दत होती? ना त्या एअर इंडीयाच्या कर्मचार्‍यांच्या शब्दां मध्ये दिलगीरी होती, ना विनयशीलता होती. ज़सा काही तिथे उभा राहिलेला प्रत्येक देशी प्रवासी एअर इंडीयाच्या काऊंटर पुढे भीक मागायला उभा होता.भिकार्‍याला सुध्दा कदाचीत नीट शब्दात लोकं सांगतील, इतकी मगरूरी त्यांच्या शब्दात होती.आणि त्यानंतर आम्ही काही लोकं जेव्हा संतप्त झालो आणि भांडायला लागलो(अर्थात आपल्या पांढर्पेशांच्या समाजात काहिच लोकं अन्याया विरूध्द भांडायला उठतात….) त्यावेळेला एअर इंडीयाचे एअर पोर्ट मॅनेजर व्ही.के.सावर्डेकर यांनी तर कहरच केला.आमच्याच अंगावर ओरडून तो माणूस आम्हालाच संस्क्रूती शिकवायला लागला. वा! रे एअर इंडीया!!!
मी माझी पाच वर्षाची झोपलेली मुलगी खांद्यावर घेऊन यांच्याशी भांडत होते, म्हणजे तरी काय आमचा हक्क मागत होते. आणि हे नालायक लोकं चोर दरवाज्याने
VIP कोट्यातून काही परदेशी नागरिकंना आणि अजून ३-४ लोकांना बोर्डींग पासेस इश्यू करत होते. आमच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा मी एका मॅनेजरच्या हातातून ते बोर्डींग पासेस काढून घेतले त्यात कोणा एका गोडबोले बाईंचा बोर्डींग पास होता. वास्तविक त्यांचा नंबर आमच्या नंतर होता. पण त्या बाई पण महान निघाल्या, त्या आमच्याशीच भांडायला उठल्या. वा! रे आपले देशी लोकं.
इथे आमचे भांडण कोणा एका व्यक्तीशी नव्हते. आणि एअर इंडीयाच्या म्हणण्या प्रमाणे जर विमानात ३-४च वेगवेग्ळ्या सिंगल जागा उपलब्ध होत्या तर त्यांनी क्यू च्या नंबरा प्रमाणे लोकां ना जे लोकं आधी रांगेत उभे होते त्यांना आधी प्रेफ़रन्स द्यायला हवा होता. कोण ३-४ लोकं जाणार हे त्यांनी का म्हणून ठरवायचं? फ़्रँकफ़र्ट ला जाणार्‍या लोकांना पण त्यांनी आधी पाठवले होते कारण त्यात बहुतांश परदेशी नागरीक होते, त्यांना अशी वागणूक दिली असती आणि थांबवले असते तर त्याचे परीणाम त्यांना माहित होते. या सगळ्यातून एकच गोष्ट मनात आली की, आपली गुलामगिरीतून मुक्तता पन्नास वर्षापूर्वी झाली खरी पण गुलामगिरीची भावना अजून तशीच आहे.

आणि हा झालेला सगळा प्रकार, आणि त्यांनी केलेले क्रुत्य एअर इंडीयाच्या त्या कर्मचार्‍यांनच्या मते अजिबात गैर नाही. फ़्लाइट ओव्हर बुक करणे, कॅअन्सल करणे अगदी कायद्याला धरून आहे. ज़गातल्या सगळ्याच एअर लाइन हे सर्व करतात. हे तुम्ही आम्ही मान्य करणं शक्यच नाहिये, पण जरं मान्य केलं, तरी पण……………….
१) तो उध्दट पणा अविवेकीपणा, अविनयशीलता, कस्ट्मरच्या अंगावर ओरडून त्यांनाच उलट धमकी देणे, चोर दरवाज्याने सीट भरणे, देशी नागरीकांना दुय्यम वागणूक आणि परदेशी नागरीकांना उच्च प्रतीची वागणूक हे ही काय सगळ्याच एअर लाइन करतात?
२) विमानातले स्वच्छता ग्रुह अस्वच्छ ठेवणे, स्वच्छ्ता ग्रुहात (किमान पक्षी) डिस इन्फ़ेक्टिंग साबण टाॅयलेट सीट कव्हर्स न ठेवणे, विमानात सीट कनेक्टिंग फ़ॅसीलीटीज न चालणे. आशा सर्व गोष्टी पण काय इतर एअर लाइन सुध्दा करतात?( कारण मी तरी अजून इतकी घाणेरडी एअर लाइन बघितलेली नाहि. म्हणून हे प्रश्नचिन्ह).
३) भरपाई म्हणून दिल्या जाणार्‍या रक्कमेची घोषणा सुध्दा कस्टमरना भीक दिल्याच्या अविर्भावात होती. आधी आम्हाला सांगितले होते की तुमची रहाण्याची व्यवस्था
Intercontinental मध्ये केलेली आहे, पण जे लोकं काही भांडले नाहित किंवा काहिही प्रतिकार ज्यांनी केला नाहि त्यांना त्यांनी दुसर्‍याच कुठल्यातरी कमी दर्जाच्या हाॅटेल मध्ये पाठवले.
४) याही पेक्षा सगळ्यात नालायकतेची उच्चतम पातळी गाठणारी गोष्ट म्हणजे एअर इंडीयाच्या आऍफ़िसमध्ये फ़ोन केल्यावर तो कोणीही उचलण्याचे कष्ट घेत नाहि ती. एअर इंडीयाने दिलेल्या मोबदल्याचा फ़आर्म कुठल्या पत्त्यावर पाठवायचा एवढाच प्रश्न विचरायचा होता. पण त्यासाठी तीन दिवस सतत दिवसातून दहा वेळा फ़ोन करावा लागला. यात एकाही शब्दाची अतिशयोक्ती नाही.
५) प्रवासी एवढे पैसे खर्च करून तुमच्या एअर लाइनचे तिकीट खरेदी करतात तेव्हा निदान सर्व विमानातल्या हवाई सुंदर्‍यांच्या आणि सुंदरांच्या तोंडावर हसू तरी असायला पाहीजे, आणि जरा किमान भाषिक औपचारिकता तरी असायला पाहिजे अशी जर प्रवाशांची अपेक्षा असेल तर त्यात गैर असं काहिच नाहिये.

अरे हे लोकं प्रवाशांना नीट औपचारीक वागणूक देत नाहीत, इ-मेल ला उत्तर तर लांबचीच गोष्ट आहे पण साधा फ़ोनही ही लोकं उचलत नाहीत, या एअर लाइनची विमाने सुध्दा वेळेवर सुटत नाहीत, सोयी अत्यंत वाईट असतात……… मग ही एअर लाइन नक्की करते तरी काय?

त्यापेक्षा बंद करा



Arch
Wednesday, September 27, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहानी, बर्‍याच वर्षांपूर्वी असा अनुभव आम्हालापण आला होता. त्यावेळी आमच confirm ticket असून फ़ुकटचे stand by वर प्रवास करणारे employees, flight वर आधी board केले. माझा मुलगा तेंव्हा असाच ३ वर्षांचा होता. सामानासकट आमची यात्रा hotel वर गेली. मोबदला दिला तरी सुट्टी नसते. inconveniences किती असतात. आतिशय उर्मट वागणूक ही air India ची खासियत आहे. confirmed passengers गोंधळ करायला लागले तर त्यात एका बिचार्‍याला चक्कर आली आणि पाकिटपण मारल गेल. it was a horrible experience. I sympathise with you.

Maitreyee
Wednesday, September 27, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच एअर इन्डीया चे असे खूप किस्से ऐकलेत! इतके बेपर्वा, उद्धट, आणि unprofessional attitude असताना चालते कशी ही एअर लाईन असा प्रश्न पडतो!
स्वच्छतेच्या बाबतीत तर सुहानि चा नं २ चा मुद्दा वाचून काय बोलावे तेच कळत नाहिये!


Kedarjoshi
Wednesday, September 27, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालते कशी ही एअर लाईन असा प्रश्न पडतो!

अर्धे लोक TCS चे onsite पब्लीक असतात. मी देखील ( x TCSer ) AI ने खुपदा आलो नी गेलो आहे. पण ईतका वाईट अनुभव नाही आला. एकदा दारच बंद होत न्हवते म्हणुन विमान १ तास उशीरा निघाले. उड्डान करताना एक मोठा आवाज आला वाटले की आता विमानाचे दोन तिन तुकडे होनार.
खरच AI नी नविन विमान घ्यायला पाहीजेत आता.
AI पण टेले चेक ईन करु देते. सुहानी तुम्ही टेले चेक ईन केले असते तर आधीच सिट अलोकेशन झाले असते.


Asami
Wednesday, September 27, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहानी तुम्ही टेले चेक ईन केले असते तर आधीच सिट अलोकेशन झाले असते.
>>
केदार अरे ह्या बाबतीमधे बहुतेक airlines देशातून सुटताना घोळ घालतात. तुम्ही दहा वेळा confirm केले असेल तरी seat allocation बसेप्रयंत तेच असेल ह्याची खात्री नाही राव. :-(

Milindaa
Wednesday, September 27, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे तिकिट बाहेरुन काढलेले होते ना? मग तुम्ही तुमच्या देशातल्या independent tribunal कडे तक्रार करु शकाल. जरी ती भारतीय airline असली तरीही त्या त्या देशात ते तिथल्या नियमांना बांधील असतात, आणि मनस्तापाबद्दल भरपाई मागणे हे काही चुकीचे नाही

वैयक्तिक, मला कधीच वाईट अनुभव नाही आला Air india चा, पण खूप किस्से ऐकले आहेत मी..


Suhani
Wednesday, September 27, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी अरे माझ्याकडे सीट नंबरही होते. कारण इथून जाताना पण सीट नंबर होते म्हटल्यावर प्रश्नच नाही आला, तसेच तिकडून येताना कसा येइल. असेच आम्हाला वाटले. पण एअर इंडीया काहिहि करू शकते ते आता कळाले.आणि टेले चेक इन करणार कसे जर त्यांनी अदल्यादिवशीच्या लोकंना आधिच आमचे सीट नंबर देऊन बोर्डिंग पासेस इश्यू केले होते तर. कारण हा सिलसिला कधी पासून चालू होता माहिती नाहि कारण पुर्ण Intercontinental अशा वेगवेगळ्या फ़्लाइटच्या लोकांनी भरले होते.

Prasadp77
Wednesday, September 27, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Suhani's experience is totally shocking but I wonder if there is any possibility that she could complain to Ministry of Civial Aviation and send copies of those letters to all leading newspapers. Taking into account the possible response, someone may say that its not useful but I think we shuold be doing our job of protesting. If everybody does this then someday they have to note it, right?

Sampada_oke
Wednesday, September 27, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एअर ईंडिया म्हंटले म्हणजे अंगावर काटा येतो. मला स्वतःला एअर ईंडियाचा वाईट अनुभव आलेला नाही, पण माझ्या आईला या वर्षी येताना असाच काहीसा अनुभव आलाय. मागच्या वर्षी बाबांचे विमान ८ तास लेट. लेट होत असल्याचे कारण कोणीच सांगत नाहीत.
या वर्षी कहर म्हणजे आईचे विमान तब्बल २२ तास लेट.
शनिवारी सकाळी ७ ला सुटणारे विमान लेट होत होत रविवारी पहाटे ५ ला निघाले. शनिवारीच सर्व लोकांना( एकूण पॅसेंजर्स ४३६) 5 Star Hotels मध्ये पाठवण्यात आले.( एक रूम दोन जणांनी शेअर केली होती. प्रत्येक रूम चे जेवणासकट बील ७,००० रु.) फ़्रॅंकफ़र्ट विमानतळाचे नियम माहीत असूनही( म्हणजे माहीत असतील असा माझा गोड गैरसमज आहे.:-))मनात येईल ती वेळ सांगत होते. सरतेशेवटी रविवारी पहाटे ५ ला विमान निघाले. सुहानीने लिहिलेली स्थिती थोड्याफ़ार फ़रकाने तशीच होती. एअर ईंडियात क्रू म्हणून निवड करताना चेहर्‍यावर मग्रूरी असणे ही आवश्यक पात्रता असावी. त्याबद्दल बोलू तितके कमीच होईल. शनिवारी 5 Star Hotel मध्ये ठेवले म्हणून असेल एखादवेळेस, टेक ऑफ़ नंतर एकदाच स्नॅक्स देण्यात आले. त्यानंतर खायला प्यायला काहीही दिले नाही.
४-५ वर्षांपूर्वी फ़्रॅंकफ़र्ट विमानतळावर विमान उतरवत असताना एअर ईंडियाच्या पायलटने धावपट्टीचे 'नुकसान' केल्याच्या कारणावरून काही महिने एअर ईंडियाला लॅंडिंग करायला बंदी होती.
अशा विमानातून प्रवास केला की महाराष्ट्रातला ' लाल डब्बा'सुद्धा खूप चांगला, असे म्हणायची वेळ येते.
माझा एकच सल्ला आहे, ज्याला स्वतःचा जीव प्यारा आहे, त्याने कृपया चुकूनसुद्धा एअर ईंडियाने प्रवास करू नये.:-(




Deepanjali
Wednesday, September 27, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Air India चे अनुभव असा BB उघडला पाहिजे:-)

Moodi
Wednesday, September 27, 2006 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भयानक अनूभव आहे सुहानी तुझा. वाईट वाटले वाचुन आणि चीड पण आली. मी २ वर्षापूर्वी जेव्हा मुंबईला गेले तेव्हा विमान दिल्लीला १ तास थांबले होते, अर्थात ते व्हाया दिल्लीच होते. पण टेक ऑफ होताना आणि उतरतांना सुद्धा भयानक आवाज झाला, विमान धावपट्टीवर अक्षरश उड्या मारत गेले, आम्ही सगळे दचकुन सीट घट्ट पकडुन एकमेकाच्या तोंडाकडे बघत होतो की अचानक काय झाले म्हणून. प्रत्येक ठिकाणी तेच. तसेही ते हिथ्रोवरुन १ तास उशिराच निघाले कारण हवा खराब. विमानाची स्थिती तीच, काहीच चालत नव्हते. टॉयलेटपासुन सगळीकडे भयाण स्थिती.
पण आता खरच कहर केला त्यांनी.


Asami
Wednesday, September 27, 2006 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहानी I was only quoting Kedar's post about tele checkin देशात सगळ्या airlines असे allocation मनात येइल तसे बदलतात. कुठूनही confirm करून काहिही उपयोग होत नाही. कळस म्हणजे bassinet seats etc पण change करतात

Kedarjoshi
Wednesday, September 27, 2006 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा उड्या मारन्याचा अनुभव मी पण घेतला आहे. सिंगापुर मुंबै अशा प्रवासात.उधळलेला घोडा जसा पाठीमागच्या पायावर चालतो तसे अर्धी धावपट्टी विमान आपले नाक वर ठेवुनच उतरत होते. मला असेही वाटले की त्याने landing abort केले व परत take off घेतोय सिंगापुरला. पण थांबले बाब एकदाचे विमान. लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या.

पण हे फक्त भारतीय विमान कंपन्यात घडते असे नाही. ३ आठवड्या पुर्वी मी शिकागो हुन ओमाहाला येताना पण असेच झाले गंमत म्हणजे गोर्या लोकांनी पण air hostess ला सांगीतले की you take care now for next landing . बहुदा नविन चालक असावा.


Mrinmayee
Wednesday, September 27, 2006 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहानी, खरंच संताप आणणारा अनुभव आहे तुझा. दीपांजलीनं म्हंटल्यासारखं... याचा वेगळा BB उघडायला हवा.
संपदा, अगदी बरोबर, एअर ईंडीयात नोकरीची पहिली अट म्हणजे 'तुम्ही किती मगृर होउ शकता'. याचा अनुभव तर मी पण घेतलाय. अगदी थोबाडित द्याविशी वाटली त्या एअर होस्टेसला!!
आणखी एक कहर आमच्या एक नातेवाईक आल्या अमेरिकेत एअर इंडीयानं. विमान मुंबईहून नेहेमीप्रमाणे उशीरा सुटलं. दिल्लीला पोचलं तर लॅंड करता येईन हवामानामुळे! परत मुंबईला नेलं. तासभर विमानातच बसवलं. दिल्लीला परत नेलं आणि तिथे परत २ तास विमानातच!! लोकांनी आरडाओरड केल्यावर नाश्ता देऊन गप्प केलं. दिल्ली-मुंबई या एक्स्ट्रा चकरेत विमानातलं पाणी संपलं हिथ्रो येईपर्यंत (??) आणि हिथ्रोला यायच्या आधी विमानात एक गृहस्थ गेले कार्डिआक अरेस्ट होऊन तर तिथे परत २ तास विमानात!! सगळ्या लीगल फ़ॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत. माफी मागणे हा प्रकार नाहीच!!! एकुण ५ तास विमानात बसून काढले त्यांनी आणि सहप्रवाशांनी!!!म्हणजे विमान जमिनीवर असताना!!


Moodi
Wednesday, September 27, 2006 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहीलेले चमत्कारीक वाटेल पण सत्यच आहे. मध्यंतरी जेव्हा संसदेत(चु.भु.दे.घे) मनोहर जोशी आणि नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल( दांडिया खेळायला गेले वाट्ट) दोघे म्हणाले होते की एअर इंडियाच्या हवाई उंदर्‍या सुंदर्‍या वयस्कर वाटतात, सौंदर्य स्पर्धेतुन मागवायच्या का?( असेच काहीतरी, नीट लक्षात नाही) तेव्हा वृंदा कारंथबाई खवळल्या आणि स्त्रीयांबद्द्दल अशी भाषा का वापरता असे म्हणाल्या, वरील सदस्यांनी माफी मागीतली, पण आता या बाई किंवा हे मंत्री प्रवाशांची तक्रार मनावर घेतील काय?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators