|
एका स्वप्नाचा प्रवास... जवळ जवळ साडे तीनशे वर्षे झाली! पुण्याहून पंचवीस एक मैलांवरची सह्याद्रीची गावरान कूस. रांगड्या आडदांड पहाडांच्या पायांशी वसलेली मूठ मूठ झोपड्यांची खेडी. कोरभर भाकरी आणि कांदा हे तिथले ऐश्वर्य! सुलतानी जुलुमामुळे हैराण झालेली तिथली मावळी माणसं. त्यांच्या मनाच्या तळापर्यंत जाण्याचं धाडस केलं ते एका शिवरायानं आणि एका रामदासानं! " आनंदवने भुवने उभवू या येथे " अशा ध्यासानं मग ही मावळी मंडळी उभी राहिली आणि त्यांनी थेट दिल्लीपर्यंत घबराट निर्माण केली!..... जवळ जवळ चाळीस पन्^नास वर्षांपूर्वी सिंहगडाच्या माथ्यावर एक तडफदार तरुण उभा होता. त्याचं नाव आप्पा पेंडसे! तीनशे वर्षांत उलटलेले पावसाळे मावळच्या मूठ मूठ झोपड्यांच्या खेड्यांपर्यंत पोहोचलेसे वाटत नव्हते. तिथले कांदा भाकरी_एवढे ऐश्वर्य वाढलेले दिसत नव्हते. महाराष्ट्र परिवाहन मंडळाची बस दिसत होती. 'दोन किंवा तीन पुरेत' चा लाल त्रिकोण पोहोचला होता. पाच वर्षांनी जनतेला 'टिनोपाल' हसू दाखवणार्या पुढार्यांच्या जीपा तिथे पोहोचल्या होत्या. हातभट्ट्या पोहोचल्या होत्या. गरीब मजुरांच्या पैशांवर फटफट्या उडवणारे गावगुंड पोहोचले होते. पोहोचली नव्हती ती माणुसकी! त्या तरुणाच्या मनात संकल्प उमटले, " हो उदंड येथे नीतिमंत श्रीमंती | या घराघरातुन वसो क्षेम सुख शांती || आनंद भुवने उभवू या येथे........ " हातात पैसा, सत्ता, माणसं यातलं काही नव्हतं. पण रक्तात नवी सळसळ आणि मनात संकल्पाचं पाथेय घे_ऊन तो तरूण कल्याण दरवाज्यानं पाय्_उतार हो_ऊ लागला.... त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत शिवगंगा आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्यातल्या दोन तीनशे खेड्यांच्या विकासाचं काम उभं राहिलं. ते उभं राहत असलेलं पाहतानाच मी लहानाची मोठी झाले. त्या कामाचा लहानसा भाग उचलतांनाच मी त्या भव्य स्वप्नाचे काही कवडसे पाहिले, आपलेसे केले आणि त्या स्वप्नातल्या दगडमातीचा जिव्हाळा घे_ऊन अमेरिकेत आले. माझं स्वप्न अमेरिकेतल्या मराठी लोकांना सांगावं आणि त्यांच्याही डोळ्यांत फुलवावं असं वाटत होतं. तेव्हा संगणकाचं महाजाल नव्हतं. गुगलवर जा_ऊन माहिती काढण्याची सुविधा नव्हती. ओळखीच्या धाग्यादोर्यांतून कसरत करतांना यशवंत कानिटकरांचं नाव मिळालं. त्यांनी महाराष्ट्रा फा_ऊंडेशन ही संस्था सुरू केली होती. त्यांना माझं स्वप्न समजलं. त्यांनी काही सूचना केल्या आणि म्हणाले, " इथे काही लोकांची वृत्ती भिकार्याला पैसा द्यावा तशी असेल. तेव्हा तुम्हाला लोकशिक्षण बरंच करावं लागेल. पण घेतला वसा टाकू नका. " आपण अडाणी लोकांच्यात काम केलं आहे. त्यांचं लोकशिक्षण केलं आहे. इथे तर सगळे बुद्धिमान, उच्च शिक्षित - तेव्हा आपलं काम सोपं आहे अशी माझी समजूत. पण इथलं 'लोकशिक्षण' फारच अवघड आहे, असं लवकरच लक्षात आलं. मराठी मंडळाच्या कर्यक्रमात पाच मिनिटं लोकांना देणग्यांचं आवाहन करावं म्हणून मी संयोजकांशी बोलले. ती पाच मिनिटं मिळवण्यासाठी मला फारच 'लोकशिक्षण' करावं लागलं... तरीही मी चिवटपणे रंगमंचावर उभी राहून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला... तळमळीनं बोलले... एवढं हृदयस्पर्शी बोलल्यावर देणग्यांचा पा_ऊस पडेल अशी माझी भाबडी समजूत! पण समोरचा मराठी समाज थंड गोळ्यासारखा! विंगेतून नाटकवाले " अहो बस्स झालं - आवरा " अशा खाणाखुणा करत होते!... मी खचलेच! पण कानिटकरांसारखे काही समविचारी भेटत गेले. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात चर्चासत्र आयोजित करून आणखी काही लोकांपर्यंत पोहोचता आलं. दोन तीन वर्षांच्या चिकाटीनंतर १९८६ मध्ये मी प्रथम एका मराठी मंडळासमोर एका गावाच्या विकासाची कल्पना मांडली 'खेडे दत्तक योजना'. इथे प्रत्येक मराठी मंडळानं एक खेडं दत्तक घेतलं तर महाराष्ट्रातल्या ४० खेड्यांचे काही किमान गरजांचे प्रश्न सुटतील असं छोटंसं स्वप्न मी लोकांपुढे मांडलं... एकतामध्ये 'खेडे दत्तक योजना' हा लेख लिहून माझी कल्पना मी आणखी तीन चारशे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अखेर आणखी तीन वर्षांच्या 'लोकशिक्षणा'नंतर १९८९ मध्ये माझं 'खेडे दत्तक योजना' हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली. तेव्हा मी 'महाराष्ट्र फा_ऊंडेशन'च्या कार्यकारिणीवर होते. निधीसंकलनाचा कार्यक्रम करून त्यासाठी खेडे दत्तक योजनेचा प्रकल्प लोकांसमोर मांडायचा हे ठरलं. मी तपशीलवार योजना तयार केली. कार्यकारिणीतल्या काही लोकांना 'भारतातलं खेडं' हा प्रकार सर्वस्वी अज्ञात होता. अमेरिकेतून पैसे पाठवायचे. पण ग्रामविकसनाचं काम करण्यासाठी महाराष्ट्रातीलच सामाजिक कार्य करणारी संस्था हवी. त्या संस्थेचे खेड्याशी आणि अमेरिकेतल्या फा_ऊंडेशनशी ग्रह जुळायला हवेत. अशा बर्याच अटीतटीच्या घडामोडींनंतर शिवगंगा खोर्यातलं 'सणसवाडी' ५०० घरांचं गाव निवडलं आणि ज्ञानप्रबोधिनीने आपले कार्यकर्ते आणि यंत्रणा यांचं योगदान करून या ऐतिहासिक प्रयोगाला प्रारंभ झाला. कानिटकर फा_ऊंडेशनचे संस्थापक आणि समविचारी त्यामुळे या प्रकल्पाबद्दल त्यांचेशी विचारविनिमय होत होताच. त्यांच्या मनातल्या ग्रामविकासाच्या कल्पना ते उत्साहाने सांगत असत. 'झिरो पॉपुलेशन ग्रोथ' हे त्यांचं स्वप्न होतं. १९८९ च्या महाराष्ट्र फा_उंडशनच्या निधिसंकलन उत्सवात मी रंगमंचावर हा प्रकल्प लोकांसमोर मांडला आणि आवाहन केलं... ज्या प्रतिसादाची अपेक्षा मी १९८२ च्या रंगमंचावर केली तो प्रतिसाद मिळायला १९८९ साल उजाडलं होतं : रंगमंचावर विठ्ठल रखुमाईंच्या भव्य मूर्ती होत्या. त्या पंढरीच्या साक्षीनं माझी छोटीशी ओंजळ सुवर्णाची झाली आणि एका व्रतस्थ धुंदीनं मला भारून टाकलं. सिंहगडाच्या माथ्यावरून कल्याणकडे पाहताना आप्पांना तशाच धुंदीनं भारून टाकलं होतं का? - त्या व्रतस्थ योग्याने माझ्या मस्तकावर ठेवलेल्या हाताचा मनाला स्पर्श झाला, तो माझ्या 'दत्तक खेड्याच्या' व्रताचा आरंभ होता. - सुभाष देशपांडे आणि माधव देशपांडे हे ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते सणसवाडीच्या योजनांना आकार दे_ऊ लागले. त्यांचा ग्रामविकसनाचा अनुभव दांडगा असला तरी फा_ऊंडेशनच्या कार्यकारिणीच्या काही अपेक्षा होत्या. त्यांचे अमेरिकन वेगाचे आडाखे होते. तिकडे पत्र पाठवलं की एखाद्या दिवसात " फॅक्स " यावं अशी अपेक्षा करत. अपेक्षा होत्या कॉर्पोरेट ऑफीससारख्या. दर तीन महिन्यांनी कामाचा अहवाल हवा! आर्थिक अहवाल हवा! बंधारा घातला की त्याची जाडी किती इंच होती असे तपशील अपेक्षित असत. प्रत्यक्ष कामाचं स्वरूप आणि आवाका समजून घ्यायला मात्र आमच्या " फास्ट फॉरवर्ड " अमेरिकन आयुष्यात फुरसत मात्र कोणाला नसे! पुण्याहून सोळा मैल जायला दोन तास लागतात. तिथे अमेरिकेसारखं १६ मिनीटात जाता येत नाही. पैसा टाकला की पटकन शाळेची भिंत उभी राहात नाही. भराभर विहिरी खोदून, धरणं बांधून गावाचं रूप बदलता येत नाही. कारण लोकांच्या मनाची मशागत करण्याचं काम चिकाटीचं आणि दुस्तर असतं. कोणत्याही चिरस्थायी विकासाच्या कामाला यश येण्यासाठी गावकर्यांकडून सहकार्य मिळवणं सर्वात महत्त्वाचं! या सर्व गोष्टी फा_ऊंडेशनच्या कार्यकारिणीला समजावून सांगणं हे सणसवाडीच्या विकासापेक्षा जिकिरीचं होतं. महाराष्ट्र फा_ऊंडेशनने फक्त १५ - २० हजार डॉलर्स दिले. तेही हप्त्यानं. ते गावच्या अपेक्षित सर्वांगीण विकासाला अपुरे होते! शिवाय परदेशी पैशांवर अवलंबून न राहता काम करता आलं पाहिजे यावर ज्ञानप्रबोधिनीचा कटाक्ष होता. लोकांनाही ऐतखा_ऊपणाची सवय लावून चालणार नव्हतं. त्यामुळे फा_ऊंडेशनने पैसे दिले तर गावाने श्रमदान करावं, काय सुधारणा हव्यात हे गावानं ठरवावं, यावर भर दिला. त्यासाठी गावकर्यांची समिती ठरवली. गावकीचं राजकारण, लोकांच्या जुन्या सवयी, कामाचा वेग आणि पावसाळे अशा अनेक अडचणींतून वाट काढत काम चाललं होतं. दुर्दैवाने या प्रकल्पाची प्रगती पाहण्यापूर्वीच यशवंत कानिटकर स्वर्गवासी झाले. गावाने या प्रयोगाला कै. कानिटकरांच्या नावाची पाटी लावली. त्यांच्या पत्नी विजयाबा_ई सणसवाडीला जा_ऊन थोडे दिवस राहिल्या. गावाला हुरूप आला. " विद्यार्थी अनुगृहीत योजना " (स्पॉन्सर अ चा_ईल्ड) अमेरिकतील काही जणांना आवडली. त्यातून ४० जणांसाठी पहिल्या वर्षी ४००० /- उभे राहिले. " पालकाने " ५ वर्षे तरी पैसे द्यावेत अशी ही योजना. पण शंभर डॉलर्ससाठी लोकांना तीन स्मरणपत्रे आणि सहा सात फोन करावे लागतात हा अनुभव. तेव्हा एका विद्यार्थ्याला ते पैसे खर्च करण्या_ऐवजी " ग्रामीण विद्यार्थी विकास योजना " करण्याची कल्पना श्री. सुभाष देशपांडे यांनी सुचवली आणि साकारही केली. या कायमनिधीत होतकरू मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिरे, वैद्यकीय तपासणी, सकस आहार, सायकली अशी अनेक गोष्टींची सोय झाली. १९९२ मध्ये मी आणि माझा नवरा अशोक यांनी सणसवाडीला अचानक भेट दिली. पूर्वीचं गाव आणि आताचं यात खूप फरक जाणवत होता. देवळाबाहेर महाराष्ट्र फा_ऊंडेशनची पाटी होती. " ही पाटी कसली हो? " असा प्रश्न विचारल्यावर त्या गृहस्थांनी मला सगळी योजना व्यवस्थित समजावून सांगितली. एक दोघांनी गावातल्या विहिरी दाखवल्या. बंधारा दाखवला. पूर्वी बायकांना पाच मैलावरून पाणी आणावं लागे. आता पाण्याचा प्रश्न कमी झाला होता. प्राथमिक शाळेचं काम सुरू होतं. दहा घरातल्या परसात संडास आले होते. काही घरांत धूरविरहित चुली दिसत होत्या. एक घरात बा_ईंनी चूल दाखवली. मी छायाचित्रण करत होते. पण माझ्या हातातला तळहाता_एवढा कॅमेरा त्यांनी पूर्वी पाहिला नसल्याने ते त्यांना समजलं नाहीं मला त्यांनी धीटपणे, मोकळेपणे माहिती सांगितली. मग गावाची मंदिरात सभा झाली. तेव्हा मी " या पावण्याबा_ई " कोण याचा सर्वांना उलगडा केला. महाराष्ट्र फा_ऊंडेशनच्या बाई म्हटल्यावर लोकांना आनंद वाटला... " घार आकाशात असली तरी तिचं लक्ष पिलाकडे असतं ना? तसं तुमचं आमच्याकडे लक्ष असू दे... " अशा शब्दांत एका म्हातारबाबांनी फा_ऊंडेशनकडून गावाच्या काय अपेक्षा ते अगदी मार्मिकपणे सांगितलं! त्यानंतर पुनः मी १९९८ मधे सणसवाडीत आले. फा_ऊंडेशनची पाटी तीच होती. पण गावाचं स्वरूप आणखी बदललं होतं. गावाचं नाव 'नरवीर तानाजीनगर' असं गावकर्यांनी ठरवलं आहे. गेल्या पाच वर्षांत आणखी दोन विहिरी आणि एक बंधारा झाला. शाळा सुबकपणे उभी राहिली. मधल्या मोकळ्या जागी व्यायामशाळा आणि आंगणवाडीच्या टुमदार इमारती उभ्या राहिल्या. ग्रामीण विद्यार्थी - विकास योजना सुरू झाली. भूकंपात गावातल्या लोकांनी लातूरला जा_ऊन मदत केली. गावात महिलांची बचतपेढी सुरू झाली. बचतपेढीस न्यू जर्सीचे श्री. कमलाकर व अरुणा पेंडसे यांनी मदत दिली. सुवर्णा ही ज्ञानप्रबोधिनी आणि माझी विद्यार्थिनी दर महिन्याला ये_ऊन पैसे गोळा करते. दर महिन्याला एका सदस्येला रक्कम मिळते. त्यातून काहींनी शेरडं घे_ऊन छोटा उद्योग सुरू केला. सुवर्णा बचतपेढीच्या महिलांना एकत्र जमवते, तेव्हा सुखदुःखाच्या गप्पा करता करता 'लोक शिक्षण' ही चालू होतं. शिकलेल्या महिलांना बँक स्टेटमेंटस म्हणजे बचतपेढीचे कागद स्वतःच वाचता येतात. स्वावलंबनाचा आत्मविश्वास त्या महिलांच्या बोलण्यात दिसत होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर्षीच्या गावाच्या सरपंचही एक महिला होत्या. आम्ही गेलो त्यादिवशी अण्णा हजारे गावाला भेट देणार होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात सगळा गाव मंदिरापाशी जमा झाला. 'अण्णा हजारे' झपझप चालत आले. त्यांचं आयुष्य म्ह्णजे एक जिवंत व्रतोत्स्वच आहे. राळेगणसिद्धीला प्रथम त्यांनी आदर्श गावाचा प्रयोग केला आणि ग्रामविकसनाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या आदर्श गावाच्या कल्पनेतलंच हे नरवीर तानाजीनगर म्हणून ते मुद्दाम गावात आले होते. त्यावेळी त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानं महाराष्ट्र हलवला होता. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका म्हणून एक मशीनगन शिपाई पाठीराखा होता. अण्णांचं मंदिरात भाषण झालं. गावाच्या भाषेत, तुकाराम, चोख्याचे अभंग पेरत ते बघता बघता लोकांच्या मनात शिरले. गावकर्यांशी चर्चा करून दुधाच्या व्यवसायाची योजना तयार झाली. मग गावचे एक म्होरके पुढे आले. त्यांनी माझी ओळख करून दिली आणि गाव दत्तक योजनेची माहिती अण्णांना सांगितली. सरपंच बाईंनी अण्णांना आणि मला नारळ दिला. अंगणवाडीच्या खोलीवजा इमारतीत आमची पंगत मांडली होती. पत्रावळीवर भात, कालवण आणि द्रोणात गव्हाची खीर असा बेत! - अण्णांबरोबर पंगतीला बसायची, आणि गप्पा मारण्याची संधी मिळणं हाच माझा मोठाच सन्मान मला वाटला. मी पहात होते... गेल्या दहा वर्षांचा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर सरकत होता... गेली दहा वर्षं मीही या गावाबरोबर प्रवास केला होता. ना. धों. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर : "- या गावाने लळा असा लावला की | परस्परांच्या सुखदुःखांशी हसलो रडलो | आता तर जीवच हा अवघा असा वरखडला | मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ||" - असा तो प्रवास. या गावाबद्दलची रेखाटनं मी अमेरिकेत केली. ज्ञानप्रबोधिनीचे सुभाष देशपांडे यांनी त्यात रंग भरले आणि ती साकार केली. आम्ही दोघेही विशीत होतो तेव्हा आप्पा पेंडसे यांची भव्य स्वप्नं समजावून घेण्याचा प्रयत्न होतो. तो ध्येयप्रवास तेव्हा आणि तिथे सुरू झाला. त्याचा हा एक टप्पा आज गाठला होता. ते अण्णांच्या दुसर्या कडेला बसले होते. समोर विवेक, सुवर्णा होते. हे माझे विद्यार्थी. आज त्यांच्या विशी पंचविशीत बिझनेस मॅनेजमेंटसारख्या पदव्या धारण करून माझ्या विशीतल्या प्रवासाचा मागोवा घेत आहेत. त्यांचे पायरव कानांना सुखद वाटत होते आणि तेजस्वी डोळे पुढच्या प्रवासाची वाट उजळत होते. आदर्श गावाचे मेरूदंड अण्णाहजारे, त्यांचं बोट धरून निघालेले सुभाषराव, माधवराव आणि मी, आणि आमच्या मागे येणारे विवेक, सुवर्णा, हर्षा अशा तीन पिढ्या एका पंगतीला बसून " सहना ऽववतु " म्हणत होत्या... मला तो दिवस फार ऐतिहासिक वाटला... १९८९ मध्ये पंढरीच्या साक्षीने माझे इवले हात सोन्याचे झाले, त्या दिवशी वाटलं होतं " हा माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा दिवस " . पण तो १९९८ चा पंगतीचा दिवस तर त्याहीपेक्षा आनंदाचा होता कारण ती एका व्रताची सांगता होती - वास्तविक ज्ञानप्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून या प्रयोगात नवीन असं नव्हतं. ग्रामविकसनाचं काम ही संस्था गेली कित्येक वर्षं करीत आहे. त्यासाठी काही परदेशी मदत पूर्वीही मिळाली होती. पण महराष्ट्राबाहेरील मराठी लोकांनी एकत्रितपणे महाराष्ट्रातील खेड्यासाठी काही मदत पाठवण्याचा हा पहिला प्रयोग. पाठवलेले पैसे ग्रामविकसनाच्या दृष्टीने पुरेसे नव्हते. पण डॉलरमधली छोटी रक्कमही रुपयात मोठी असते. सणसवाडीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान (सेल्फ एस्टीम) वाढायला या मदतीचा खूप उपयोग झाला - आजूबाजूच्या गावकर्यांचं या कामाकडे लक्ष वेधलं आणि त्यांनी त्यापासून स्फूर्ती घेतली. प्रत्येक लहानमोठ्या प्रकल्पातून जनजागृती झाली. उदा. एका छोट्या बचतगटाच्या प्रकल्पातून सुवर्णाने गावोगावच्या महिलांची संघटना उभी केली आणि ज्यांनी कधी एस्टीत पाय ठेवला नव्हता त्या चाळीस पन्^नास महिला दिल्लीदौरा करून बाहेरचं जग पाहून, आयुष्यभरासाठी मोठा आत्मविश्वास आणि विशाल दृष्टीकोन घे_ऊन परतल्या. उत्तर अमेरिकेतल्या लोकांना आपण काहीतरी भरीव काम केल्याचा आनंद तर झालाच. पण " आपल्या पैशाचं होतं काय? " या प्रश्नाचं उत्तर त्यांना या प्रयोगानं दिलं.त्यांच्या दातृत्वाला हे आवाहन होतं, " देण्याची वृत्ती निर्माण व्हावी लागते. तो ही एक करार असतो. 'कमिटमेंट टू शे_अर!' " - ती निश्चितच वाढीला लागली. सणसवाडीच्या पाझर तलावाभोवती जमिनीची धूप होऊ नये म्हणून झाडे लावण्यासाठी कॅनडातून महाराष्ट्र सेवा समितीने पैसे दिले. 'उत्तर अमेरिकेतील संघटनांनी एकत्र ये_ऊन काम करता ये_ईल' हा एक अधोरेखित संदेश त्यातून मिळाला. सणसवाडीच्या कामाच्या स्ला_ईडस दाखवून मी सॅन होजे व लॉस एन्जेलिसच्या लोकांना आवाहने केली. सॅन होजेच्या बे एरिया मंडळाने लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान 'चिखलगाव' दत्तक घ्यावे असे ठरवले व योगायोगाने १९९३ च्या कार्यकारिणीवर कै. यशवंत कानिटकरांचे चिरंजीव राजन कानिटकर होते. चिखलगावाचे काम श्री. राजा व रेणू दांडेकर करीत आहेत. आम्ही प्रत्यक्ष एकमेकांना भेटलो नव्हतो. पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आम्ही काही वर्षे एकत्र काम करत होतो. पण " समानशीले व्यसनेषु सख्यम् " अशी आमची मैत्री दिवसेंदिवस वाढतच गेली. राजाभा_ऊंच्या कामासाठी न्यू जर्सीच्या डॉ. अरुंधती विनोद यांनी जीपसाठी देणगी दिली. तर सविता गोखले यांनी त्यांना सवलतीची विमान तिकीटे दे_ऊन त्यांना अमेरिकेस बोलावले. त्यांचा छोटा कार्यक्रम आम्ही लॉस एन्जेलिसला आमच्या घरीच केला आणि दहा बारा मराठी मित्रांनी तिथल्या तिथे चर्चा करून मुलींच्या वसतिगृहाच्या प्रकल्पाचे पैसे उभे केले! श्री दांडेकर यांना हे अनपेक्षित होते! पण असे 'सहज' बघता बघता पैसे उभे राहण्यामागे दहा - पंधरा वर्षांच्या आमच्या ध्यासाची आणि लॉस एन्जेलिसमध्ये आम्ही केलेल्या कष्टांची परंपरा होती. लोकांनी डोळे मिटून पैसे द्यावेत, असा विश्वास आम्ही निर्माण केला होता. १९८२ साली मी लोकांना प्रथम आवाहन केले तेव्हा मार्ग फार दुष्कर वाटला. तो आता सोपा झाला होता. प्रसंगी बिनपगारी रजा घे_ऊन, प्रसंगी व्यक्तिगत प्रश्न बाजूला ठेवून, प्रसंगी नतेवा_ईकांचा रोष ओढवून चालू ठेवलेल्या माझ्या 'दत्तक खेड्याच्या' व्रताचे सार्थक झाल्याचे समाधान मला त्यादिवशी वाटले. 'मांगवलीची' ही अशीच गोष्ट. पुण्यातले श्री. शांताराम जावडेकर नावाचे सेवानिवृत्त गृहस्थ आपल्या गावात जा_ऊन झाडे लावतात. एवढीच माहिती मला बरेच वर्षांपुर्वी झाली. त्यांचेशी त्यानंतर पत्रव्यवहार चालू होता. काही लोकांना आवाहन करून मी तुरळक मदतही पाठवली होती... १९९५ मध्ये लॉस एन्जेलिसमधील लोकांना हे गाव दत्तक घ्यावे असे मी आवाहन केले. श्री. जावडेकर आणि गावकरी यांना खूप आनंद झाला. त्यांनी उत्साहाने ग्रामविकसनाचे काम सुरू केले. पर्यावरणाचा श्री. जावडेकरांचा डोळस अभ्यास, वनीकरणाची त्यांची तळमळ यामुळे मांगवलीच्या कामाला प्रथमपासून एक निश्चित दिशा होती. त्यांचे काम मांगवलीपुरते मर्यादित न रहाता त्यांनी 'सह्याद्री बचाओ' मोहीम उभी केली. महाराष्ट्रातील दोनशे पर्यावरणप्रेमी लोकांचे शिबिर त्यांनी आयोजित केले. त्यांनी पाच वर्षात केलेल्या प्रगतीचा आडाखा आम्ही २००० सालच्या कार्यक्रमात घेतला. योगायोगाने श्री. व सौ. जावडेकर त्याच सुमाराला मुलाकडे अमेरिकेत आल्याचे समजले. त्यांना कार्यक्रमाला बोलावले. त्यांनी स्वतःच लोकांसमोर उभे राहून आवाहन केले. त्याचवेळी त्यांच्या गावासाठी लॉस एन्जेलिसच्या मित्रांनी कार्यक्रम कसा केला, त्यासाठी कसे कष्ट घेतली तेही श्री. जावडेकर यांनी समक्ष पाहिले. मांगवलीचं काम करायला " इट टेक्स अ व्हिलेज " हे त्यांना माहिती होतं - तसं त्या कामासाठी लॉस एन्जेलिसमध्ये पैसे उभे करण्यासाठीही " इट टेक्स अ व्हिलेज " याची प्रचिती त्यांना आली. खरं तर " इट टेक्स टू व्हिलेजेस " याची प्रचिती मला पुनः एकदा नव्याने आली. कारण हा प्रयोग " एकमेकां साहाय्य करू " अशा सहविकासाचा आहे ('पार्टनरशिप इन डेव्हलपमेंट'). महाराष्ट्राबाहेरच्या मराठी लोकांनी केवळ पैसे दे_ऊन थांबावं असं मला वाटत नाही. गावाच्या प्रगतीत आस्थेनं रस घ्यावा - प्रसंगी गावाला भेट द्यावी. गावालाही " या, वसंतराव, वाईच टेका. जरा चहा घे_ऊन जावा. " अशी आपुलकी वाटावी - सेवानिवृत्तीनंतर मराठी लोकांनी तिथे काही दिवस रहावं आणि आपल्या अनुभवाचा फायदा गावाला करून द्यावा. डॉक्टरांनी गावात जा_ऊन आरोग्य शिबिरं घ्यावीत. तरूण मुलामुलींनी सुट्टीत त्या गावात जावं - काम करावं. " यू एस कॉप " द्वारा आमची मुलं वीज आणि संडास नसलेल्या आफ्रिकेतल्या खेड्यात जात अशी संधी उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्रातल्या खेड्यातही जाऊ शकतील. महाराष्ट्रातही विविध संघटनांनी एकत्र काम करावं... मांगवलीतल्या 'सुंदरवना'चे अनुभव जावडेकरांनी चिखलगावच्या दांडेकरांना सांगावेत आणि चिखलगावची मुलं सणसवाडीला सहलीला जावीत. श्री. मधुकर देशपांडे यांची फिरती प्रयोगशाळा मांगवलीला यावी... माझं 'दत्तक गावाचं' स्वप्न असं विशाल आहे. " समोर दिसतो एकच तारा " तसा या स्वप्नाचा विचार माझ्या (आमच्या दोघांच्या) मनांत सतत असतो त्याबद्दल आम्ही जिथे जातो तिथे बोलतो. आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हाही मराठी लोकांसमोर ही कल्पना मांडली. मेलबर्नच्या त्या मित्रमंडळींनी त्या वर्षीच्या दिवाळीला माझ्याकडे एक चेक या कामासाठी पाठवला! एवढंच नव्हे तर डॉ. जयंत बापट यांचे सारखे मित्र त्यानंतरही प्रकल्पांना पैसे पाठवत आहेत... असाच एकदा जर्मनीतून एका जर्मन गृहस्थांचा माझ्या नावे भला मोठ्ठा चेक आला. बरोबर दोन ओळी आशय असा " मी डॉ. पेंडसे यांना ओळखतो, तुम्ही काहीतरी खेड्याचं काम करता असं समजलं त्यासाठी हे पैसे! " - एका नाव, गाव, देश, भाषा सर्वच बाबतीत परक्या अज्ञात माणसाने एवढ्या विश्वासाने माझ्या नावे चेक पाठवला - मला सर्व भरून पावलं! सणसवाडीचं जीपचं काम झालं. 'जनताजनार्दन' नावाचं परमेश्वराचं एक रूप मला ठाऊक होतं. हे दुसरं रूप पहायला मिळालं. कोणतेही चांगलं काम केवळ सदिच्छा, केवळ पैसे किंवा केवळ कार्यकर्ते यातून उभं राहू शकत नाही. त्या सर्वांचा मेळ जमावा लागतो आणि मग 'जनता जनार्दन' म्हणजे ज्यांच्यासाठी हे काम करायचं त्यांची कृपाही लागते. ग्रामविकसनाचा हा प्रयोग आमच्या गावात करावा अशी आमची इच्छा होती. त्यासाठी गावकर्यांशी बोलणी केली. गावाची पहाणी करायला ज्ञानप्रबोधिनीने माणूस पाठवला तर चिखलगावच्या राजाभाऊ दांडेकरांनी कामाला मदत करण्याचेही मान्य केले. पण गावकर्यांना कोणीतरी 'उपरे' येऊन आपल्या गावात काही करणार हे रुचलं नाही. गावातून ही जबाबदारी घ्यायला कोणी पुढे येईना. आजही आमचं कोकणातलं छोटं गाव तसंच राहिलं आहे. 'प्रत्येक मराठी मंडळाने एक गाव दत्तक घ्यावे' हे आवाहन मी जवळ जवळ वीस वर्षे करत आहे. पण आजपर्यंत फक्त तीन गावात काम सुरू झलं. त्याशिवाय लातूर भूकंपाच्यावेळी उत्तर अमेरिकेतून जे पैसे पाठवले त्यातून आणखी दोन तीन गावांचं काम अजून सुरू आहे. अंमळनेरला डॉ. अप्पा म्हसकरांना छोटीशी मदत पाठवली... पण साडे पाच लाख खेड्यांच्या देशात जिथे ७० % लोकसंख्या खेड्यात रहाते, तिथे तीन चार गावांचा विकास हे काम अगदीच छोटसं आहे. अमेरिकेतून पंचवीत - तीस गावं दत्तक घेण्याइतकी मराठी मंडळं निश्चित आहेत. मग वीस वर्षांतली ही प्रगती इतकी संथ का? - दरवर्षी मराठी मंडळांची कार्यकारिणी बदलते. त्यामुळे नवीन लोकांना पुनः सर्व समजावून सांगावं लागतं. कार्यकारिणीतल्या लोकांच्या मराठी मंडळाच्या कार्यक्रमांच्या यादीत दत्तक खेड्याला किंवा अन्य कोणत्याच सेवा कार्याला स्थान नसतं. अगदी घटनेत बदल केले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. एकूणच महाराष्ट्रातील चांगल्या कार्याबद्दल पुढाकार घेऊन काही करण्याची आस्था आणि वृती खूप कमी लोकांत दिसते. मांगवली, सणसवाडी, चिखलगाव या तीन्ही गावांच्या प्रगतीचे अहवाल येतात पण ते मराठी मंडळाच्या पत्रकात अथवा वेब साईटवर टाकण्याची तसदी घेतली जात नाही. मराठी मंडळ नाही. पण आम्ही घेतो जबाबदारी असं म्हणणारे मित्र गावात उभे राहत नाहीत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात चर्चासत्रे ठेवण्यासाठी बरेच वेळा खटपट करावी लागली. अशा चर्चासत्रांना उपस्थिती फारच थोडी होती. तेव्हा मला आणि आपल्या सर्वांनाच अजून पुष्कळ वाटचाल करायची आहे...जे अजून घडलं नाही त्याबद्दल मला असमाधान असलं तरी खंत मात्र नाही. कारण जे घडलं त्याबद्दल मला आनंद आहे. अमेरिकेत आल्या आल्या हे स्वप्न माझं एकटीचं होतं. पण आज वीस वर्षांनी ते स्वप्न अनेक मित्रही येथे पहात आहेत. मला माहिती असलेले आणि नसलेले समविचारी लोक आहेत. महाराष्ट्रातल्या संस्थांचे कार्यकर्ते आहेत आणि गावातले गावकरी आहेत. हे स्वप्न जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'एकता' या त्रैमासिकाची मला वेळोवेळी मदत होते. डॉ. जगन्^नाथ वाणी यांनी तर मराठी अधिवेशनाला श्री. अभय बंग यांना बोलावून बृहन्महाराष्त्ट्र मंडळाला हा दृष्टीकोन देण्याचा वरच्या पातळीवरचा प्रयोग केला आहे... आपलं स्वप्न असं अनेकांबरोबर अनुभवता येणं हाही आनंद काही थोडा नव्हे! - विद्या हर्डीकर (विश्वसेतू या संस्थेच्या अधिवेशन स्मरणिकेत २००० साली प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा संक्षिप्त भाग आहे. तो लेख फक्त १०० लोकांपर्यंत पोहोचला. या कामाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेख मुद्दाम दिला आहे.)
|
|