Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
shyamli
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » shyamli « Previous Next »

||श्री सरस्वती नमन्|||

या कुंदेन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता|
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वंदिता|
सा मा पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा||

*************************************

नमस्कार मंडळी....
सगळ्यांचं स्वागत
लग्नाच्या वाढदिवसाची ही अनोखी भेट मीळालीये मला आणि तीही १दिवस आधीच.....
काय लिहिणार हा खरं तर प्रश्नच आहे...पण तरीही बघूया कसं आणि काय लिहायला जमतंय ते..
तर आज पाहिलीच पायरी आहे म्हणून हे गोड मनूनं घ्या....

आदिमाया आदिशक्ती|
आठवू तुझी रुपे किती||
असावी लेकरावरी छाया|
माझी माय सरस्वती||

भाकर तुकडा

मी दरवेळेला माहेरी गेले की दारात आई उभी असे..
एका हातात पोळीचा तुकडा आणि एका हातात गरम पाणी...

तशी मी डोंबिवलीहून ४-५ महिन्यातून एकदा तरी माहेरी जायचे...पण प्रत्येक वेळेला हा सोपस्कार व्हायलाच हवा...
आम्हाला दारात म्हणजे गेटमध्येच उभं करायचं मग ती पोळी आम्हासगळ्यांवरुन ओवाळून टाकायची उनऊन पणी पायांवर घालून काहीतरी पुटपुटायची, आणि मगच आम्हाला घरात प्रवेश मिळत....
मी नेहमीच तिची चेष्टा करणार "काय हे आई अग मी पन्नास वेळा येते आणि जाते तू हे काय दरवेळी.... "आणि ती पण नेहमीचंच उत्तर देणार......"तुला त्याचा काही त्रास होतोय का? ...तुला काही करायला सांगते का मी नाही ना? मग गप्प बसत जा.... "

२ वर्षापूर्वी मी इकडे यायला निघाले तेव्हा एअरपोर्टला सोडायला आली होती आणि डोळे अखंड वाहत होते तिचे सारखं म्हणत होती "आता कधी गं भेट होणार आपली?" तर तेव्हाही मी हसले म्हणाले"काय आई अग ३-४ तासांच तर अंतर तू हाक मारलीस की मी हजर.... आहे काय त्यात एवढं?"

मला इथे येऊन जेमतेम ६ महीनेच झाले होते आणि एके दिवशी संध्याकाळी यांचा फोन आला की औरंगाबादांहून फोन होता आणि आईला तुझ्याशी बोलायचंय.............पण त्या दिवशी मी जरा गडबडीत होते आणि नेमका फोन करायचा राहिला............

रात्रीच्या १०:३० वाजता फोन वाजला म्हणजे देशातला १ वाजलेला, नं भावाचा दिसत होता म्हणून हे मला फोन घे म्हणत होते.......मी फोन वर बोलतिये तर माझ्याशी कुणी बोलायलाच तयार नाही.....तू प्रमोदला दे फोन आधी मी......मला काही समजेचना....... हे फोनवर बोलत होते.... आणि ह्यांचं पाहिलं वाक्य होतं अरे बाप रे..........

त्यानंतर मला काहीही कळलं नाही......मी कोसळले होते......शेजार्‍यांनी येऊन निघायची तयारी केली.....मुलांनी बॅग भरली......एअरपोर्टला जाऊन बसलो....तर नुकतीच एक फ्लाईट गेली होती आणि आम्हाला सकाळच तिकीट मिळालं होतं.....

मला माझी वाक्य आठवली अग मी ३ तासात हजर होईन बघ......
.
.
.
.
मी नाही हो पोहोचू शकले......शेवटच्या दर्शनासाठी पण नाही....:-(:-(
आणि आता मी जाणारे देशात सुट्टीला
पण मला हातात भाकर तुकडा घेऊन उभी असलेली आई कधीच नाही दिसणार.....
:-(
कुठेच काही खरतर
नसत कमी
पण काहितरी हरवतय
वाटतय मनोमनी
आता ह्याला काय म्हणावे....
अवस्था केविलवाणि
सांगेल का मला
ह्याच ऊत्तर कुणि?

मी ही झुळुक टाकली आणि...याचं उत्तर मला जयाच्या एका कवितेत मीळालं....

तीच कविता ईथे तुमच्यासाठी टाकतेय...






माझ्या परीची परी
दोस्तहो नमस्कार,
तीन्-चार महीन्यापूर्वी जयाची कविता वाचता वाचता चाल सुचली मला,आणि ती record करुन ऐकवली तुमच्यापैकीच काही मंडळींना.
चाल उत्तम असल्याचे अभिप्राय आले, बरच प्रोत्साहन मिळालं म्हणुन studio मधे जाउन recording करायची हिम्मत केली.

नवर्‍यानीही कौतुकानी या गोष्टीत भाग घेतला, support केला. :-)

आवाजाला रियाजाचा अभाव लगेचच जाणवतोय त्या बद्दल कान उघाडणिही झालीये :-)

तरीही माझं हे गाणं, जसं आहे तसं तुम्हा सर्वांना ऐकवावसं वाटतयं.

तर हे घ्या माझं पहिलं वहिलं गाणं मायबोली आणि मायबोलीकरांना सादर अर्पण


http://odeo.com/channel/411313/view






नमनाला ............. :-)
काल विकांत असल्यानी शांत असलेल्या मायबोलीवर भटकत होते मधेच वाटलं
एक मेसेज औरंगाबादवर पोस्टु या. उत्तर येणार नाहि माहित होतं पण जादुचि कांडी फिरावि तशी गम्मत झाली, आणि केदार जोशींनी गायत्री चाट भांडार चा विषय काढला, चर्चा रंगात आली केदार आणि अजय यांनी सुचवल कि लेख होवूनच जाउ दे. केदार, प्रसाद, पंचा हेही सांगातायत खाद्यंतीच्या स्थळांबद्दल.

प्रसाद, पंचा, अजय आणि केदार तुम्हा सगळ्यांचेच मनापासुन आभार.


घडाभर झाल असेल बहुदा!
:-)
जायके का सफर

धडक..........धडक......... धडक ..........धडक करत धावणारी ट्रेन, मागे पडत जाणारी स्टेशनं आणि प्रत्येक एपिसोडमधे नवीनं गावात खाद्यंती. "जायके का सफर" पूर्वी कधीतरी हा कार्यक्रम लागायचा कोणत्यातरी वाहिनीवर .'जायका' हा शब्द उच्चारतानाच कसं तोंडात रेशमी कबाब किंवा तत्सम पदार्थ विरघळल्याचा भास होतो (बघा बरं म्हणून). तर मी लिहितीये ते या कार्यक्रमाबद्दल नाही हो माझ्या जायक्या च्या सफर बद्दल लिहायचंय मला.

खाद्यंतीची वेगवेगळी ठिकाणं अजमावणं आणि परत परत तिथे जाऊन खाणं असा ब-याच जणांचा छंद असतो.
अर्थात खायची आवड असणा-यांबद्दलच बोलता येईल हे. तर माझ्या खाद्यंती च्या शोधयात्रेतली काही आवडलेली न-आवडलेली ठिकाणं.

जसं आठवतंय त्याप्रमाणे पहिलं hotel Darling न्यू उस्मानपु-यात असलेलं शेट्टीचं अर्थात उडुपी, पुर्णपणे शाकाहारी रेस्टोरेंट. याच्याकडचा darling special मसाला डोसा जबरी असायचा. अजूनही हे hotel त्याच जागेवर चालू आहे एका hotel ची बरीच hotels झाली आहेत म्हणे आता. घाटी दवाखान्याचं(govt hospital)canteen तेही याचंच याच्याकडे मिळणारा वडासांबार आणि बटाटावडा ब-याच वर्षापासून खात आलो आम्ही .सध्याचं स्टेटस माहीत नाही याचं पण स्वस्त आणि चवदार असा लौकिक होता याचा तेव्हा.

औरंगाबादच अजूनही फ़ेमस असलेलं नावं म्हणजे मछ्ली खडकला असलेलं उत्तम मिठाई याच्याकडची इम्रती आणि फाफडा अतिशय प्रसिद्ध आहे .तिकडे गेलात कोणी तर नक्की खाऊन पाहाच. याच्या लाईनीत असलेलं अमृतभांडार फक्त दह्यासाठी प्रसिद्ध. फक्त दह्याच्या जोरावर या माणसाचा धंदा अजूनही टिकून आहे.याच्या समोरच अजून एक दुकान मिठायांसाठी प्रसिद्ध मिलन मिठाई हे अलीकडे जास्ती पुढे आलंय . विश्वासाने सगळे पदार्थ आणु शकतो याच्याकडुन.


क्रमश:
आता गुलमंडीवर फिरतोय आपण तर इथलीच सगळी ठिकाणं बघू या . :-)
इथे अगदी २५ वर्षापेक्षाही? अं ss नाही त्याहून जुनी असलेली काही hotels आहेत त्यापैकी एक म्हणजे मेवाड. हे अजूनही गर्दीने वाहतं असलेलं hotel,याचं लोकेशन पण अगदी heart of the city (आता काही संकेत बदलले असले तरी गुलमंडी ती गुलमंडी ) स्पेश्यालीटी; दही मिसळ,एकदम फर्मास मला अजूनही जावं वाटत इथे पण इथे येणारा crowd बराच बदललाय आणि स्टेटस, हायजिन असे काही नवीन शब्द माहीत झालेत मला :-(. गुलमंडीच्या ऐन चौकात असलेलं शामलाल कोल्डड्रिंक्स अजूनही चालू आहे . (माझ्या लहानपणच आइसक्रीमचं एवढंच एकमेव दुकान आठवतं मला).
याच रस्त्याने जरा पुढे सिटीचौकाकडे निघालं की " गायत्री चाट भांडार "भरपूर प्रसिद्ध असलेलं चाट भांडार आहे हे, याच्याकडची कचोरी,समोसा,मुंगभजे (एकदम स्पेशल),आलुवडा . हे ही बरंच जुनं आहे आणि अजून दणदणा चालतं. इथेच गुलमंडीवर असणारं पण आम्हा मुलींना वा बायकांना जाता न येणारं एक हॉटेल म्हणजे न्यू मराठा हॉटेल. लाल तर्री पातळ रस्सा आणि झणझणिताच्याही पुढचं तिखट असे अस्सल गावठी मासांहारी पदार्थ मिळणारं ठिकाण (आम्हाला पार्सलवरच समाधान मानावं लागायचं )अजूनही चालू आहे बहुदा.

आता जरा गुलमंडीवरुन अंबा अप्सरा talkies कडे निघायचं आपल्याला, याच्या समोर असणा-या गाड्या म्हणजे साबुदाणा वडयासाठी गर्दी खेचणा-या.औरंगपु-यात आलं की आली आमची शाळा आणि collage. अर्थात एस बी colony. इथे असणारं पुर्णानंद या दुकानाबद्दल तर किती लिहावं तेवढं थोडं आहे. इथे आलुवडा आणि समोसा भन्नाट मिळायचा पब्लिक वेडं झालं होतं तेव्हा ;अक्षरशः: घरीसुद्धा पार्सल मागवले जायचे .

आता collage मधून टिपी साठी गाठायची ठिकाणं :D
निराला बाजार मधलं ५६ भोग तेव्हाच्या तरुण पिढीसाठी 'दिल की धडकन " वगैरे होतं.हे हॉटेल खायला विशेष काही प्रसिद्ध नव्हतं , पण माहौल एकूणच फार छान असायचा. याच्या समोरच असणारं आर्चिज पण याचंच भावंड इथे पावभाजी छान मिळायची, हे रिनोवेट केलं वाटत आणि अजूनही चालू आहे..........
५६ भोग मात्र बंद पडलं केव्हाच. :-(

पैठणगेटवरच लकी ज्यूस सेंटर भरपूर जुनं अजूनही तेवढंच चालणारं . मग गोमटेश मार्केटमधलं राधिका (उडुपी), वरद गणेश समोरच मेषा दोन्हीही स्वस्त मस्त आणि आपले वाट्णारे. कधीही गेलं तरी पडीक पब्लिक सापडणारच इथे. (आता दोन्ही नाहीये). तिथून जरा पुढे जुन्या हेडगेवार hospitalच्या बाजूला एका साऊथ इंडियन माणसाने चालू केलेला stall . हा stall एवढा चालतो खरचच त्याच्याकडचा मेदूवडा,इडली, सांबार ,आणि सही ssss असणारी चटणी. क्रांती चौकातल्या पावभाजीच्या गाड्या , अजूनही आहेत, मस्त पावभाजी मिळायची. खास पावभाजीसाठी आम्ही एवढ्या लांब जायचो तेव्हाही.(नवीन जाणा-यांना क्रांती चौक आणि निराला बाजार छान option आहेत सटरफटर खाण्यासाठी).


क्रमश:
आता आम्हा सगळ्या औरंगाबादकरांचा लाडका म्हणजे भोलेशंकर चाटवाला. खरंतर सहजासहजी सापडेल किंवा पोचता येईल अश्या ठिकाणी अजिबात नाहीये पण याच्याकडच्या पदार्थांची चव एकदा एखाद्यानी घेतली तर सहजा सहजी दुसरीकडे भेळ,दहिपुरी इत्यादी पदार्थ खायला जाणार नाही याची फुल्ल ग्यारंटी . याच्याकडची भेळ म्हणजे आहाहा.......
भेळेसाठी केलेल्या चटण्या बघुनच तोंडाला पाणि सुटायला लागतं. हिरवी चटणी,मग गोड चटणी आणि लाल चटणी. ही भेळ एक डिशभर म्हणजे अजून काहि खायच विसरायचच, एवढी जास्त quantity असते भेळेची. तसे याच्याकडचे सगळेच पदार्थ छान असतात पण अजून एक आवर्जुन सांगण्यासारखा पदार्थ म्हणजे दही बटाटा पुरी. सहा का आठ पुऱ्या असतात एका डिशमधे पण हे ही पोटभरेल एवढं. यातल्या दह्याचं आणि गोड चटणीच झालेलं मिश्रण फारच चवदार लागतं. ही दहिपुरी खाताना तंद्रीच लागली पाहिजे एवढी भन्नाट चव असते. औरंगाबाद शहराच्या मध्यवस्तीत अप्पा हलवायाच्या दुकानासमोर आहे हे चाटभांडार.

गेली कित्येक वर्ष फक्त थाळीच देऊनही अजून तेवढ्याच जोरात चालणारं माझं अतिशय आवडतं ठिकाण म्हणजे bus-stand जवळचं भोज राजस्थानी भोजनालय. ४०ते५० रुपयात अमर्यादित थाळी. सुरवातीला जलजीरा, २सुक्या भाज्या, २ रस्सा भाज्या, डाळ, कढी, १ स्नॅक (बटाटावडा, समोसा किंवा ढोकळा) याच्याबरोबर चटणी, ठेचा, पापड, सॅलड, गरमा गरम आणि मऊ असे तुप लावलेले फुलके, बाजरीची छोटीशी रोटली (भाकरी) यावरही तुप. यातल्या सगळ्या भाज्या छान असतात पण मला खास आवडते ती इथली कढी. फारच चविष्ठ असते अगदी पुन्हा पुन्हा घेऊन सुद्धा समाधान होत नाही. आणि शेवटी भात / खिचडी तुम्ही दोन्हीही टेस्ट करु शकता. मस्त घोटून केलेली सरसरीत खिचडी आणि वर पुन्हा तूप. इथलं वैशीष्ठ म्हणजे सगळा स्टाफ राजस्थानी वेशभुषेत असतो. आणि लांब लांब मिशा असलेला मॅनेजर (मालक?) स्वत: पुन्हा पुन्हा येउन घरच्यासारखा आग्रह करत असतो.

रेल्वेस्टेशनरोडला असणारं फुड लव्हर्स आणि जालनारोडला असलेलं मास्टर्स कुक ही हॉटेलंपण माझ्या आवडत्या होटेल्सपैकी आहेत. हल्ली फौजी ढाबा जास्त लोकप्रिय झालाय पडेगावच्या थोडंस पुढे असलेला हा ढाबा फॅमीली पार्टीसाठी एकदम मस्त इथे लंच ला जाऊन दिवसभर मस्त टाईमपास करता येतो. मुलांना खेळायला खेळणी बसवलीयेत. पण हा ढाबा किंवा आजकालचे नविन ढाबे व्हायच्या आधीचा अस्सल ढाबा म्हणजे मिटमिट्याला असणारा पाशाभाईचा ढाबा फार सुरेख चव होती याच्याकडच्या चिकन मसालाची. आता हाही कमर्शीअल झालाय :-(.

साधारण नोव्हेंबर डिसेंबरमधे लायन्स क्लबतर्फे आयोजीत होणा-या आनंदनगरीमधे मिळणारा पापड कधिही न विसरता येणारा आहे. अजुनही मिळतो. फक्त या पापडासाठी पुन्हा एकदा या दिवसात औरंगाबादला जायची इच्छा आहे. :-)

सध्या माझं फ़ेवरेट असणारं हॉटेल म्हणजे वाळुजला असणारं लुधियाना ढाबा पिवर पंजाबी चव असते सगळ्या पदार्थांना, आणि हवं तसं बनवूनही देतो हा.

आणि शेवटी औरंगाबादची शान असलेलं तारा पान सेंटर कुठेही कधीही स्पेशल जेवण झालं की तारापान ची पानं घरी आलीच पाहिजेत असा दंडकच आहे बहुतेक औरंगाबादकरांचा. आणि तीथे जाऊन पान खाणं हा तर एक राजेशाही अनुभव असतो. गाडी तारापानच्या जवळपास उभी करायची कि लगेच याचा माणुस येउन order घेतो, पाचच मिनिटात सुंदर तबकामधे गुलाबाच्या पाकळ्या,चांदिचा वर्ख लावलेली रसदार पानं तुमच्या समोर हजर असतात. अगदी नवाबी थाटात :-). पोटभर जेवून पान चघळताना सहजच वाटून जात, सुख सुख म्हणतात ते याहून वेगळ ते काय असेल बरं. :-)

तशी ही खाद्य यात्रा न संपणारी आहे कारण चवी बदलतात, हात बदलतात आणि आपण खातच असतो . बरचसं राहून गेलय ब-याच आठवणी धुरकट झाल्या आहेत बरीचशी नावं आता आठवतही नाहियेत, हो पण चव मात्र जिभेवर रेंगाळत असते अजूनही. म्हणून किमान सध्या जेवढ आठवलं तेवढतरी जपायचा एक छोटासा प्रयत्न.

तुर्तास औरंगाबाद खाद्ययात्रा ईथेच समाप्त



tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner shyamli Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators