Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तांब्याच्या धातुमधील पाणी आरोग्य वर्ध...

Hitguj » Health » तांब्याच्या धातुमधील पाणी आरोग्य वर्धक असत का? « Previous Next »

Sanjubaba
Monday, July 17, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांब्याच्या धातुमधील पाणी आरोग्य वर्धक असत का?

माझ्या माहिति प्रमाने 'हो'. पण मला हे महित नाही की ते रोजच्या routine मध्ये घेतल्यावर काय परिनाम होतातते. तेव्हा कोणि त्याचे उपयोग दुरुपयोग सागाल तर बरे होईल.


Amayach
Monday, July 17, 2006 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहीती प्रमाणे, धातुच्या म्हणजे ताब्यांच्या भांड्यात रात्री पाणी भरुन ठेवावे आणी हे पाणी सकाळी अनोश्या पोटी प्यावे, असे पाणी प्यायल्याने पचन क्रिया सुधारते, द्रुष्टी सुधारते, पचनक्रिया सुधारते.

Amayach
Monday, July 17, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या पोस्ट मधे आणखिन एक भर म्हणजे, ब्लड प्रेशर देखिल कमी होते. जाणकार भर घालतीलच यामधे.

Sanjubaba
Tuesday, July 18, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी Electronic Filter च्या बदली मुद्दाम ताम्बाचा filter घेतला आहे. त्यामुळे ते पाणी रोजच आम्हि पितो. मला एकाने सान्गितल की ते पाणी पित्तावर गुणकारी आहे पण इतर कोणी घेतल तर त्रास होतो. हे कितपत सत्य आहे.

Bee
Wednesday, July 19, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो तांब्याच्या भांड्यातील पाणी चांगले असते शास्त्रानुसार. त्यामुळे पित्त कमी होते, डाग कमी होतात चेहर्‍यावरील. पण त्यासाठी पाणी रात्रभर भांड्यामध्ये राहिले पाहिजे. हे असे filter वगैरे बसवून काही होणार नाही. शिवाय तांबे शुद्ध असायला हवे. आजकाल धातूंची शुद्धता पूर्वीसारखी राहिली कुठे. आमच्याघरचा जुना कळस आणि आत्ताअच नविन कळस ह्यात जुना कळस किती शुद्ध तांब्याचा आहे हे लगेच कळते. नविन कळस सतत कळकतो आणि इतका पातळ आहे की लगेच वाकतो.

Sanjubaba
Wednesday, July 19, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

filter मधिल पाणि १२ तासापेक्षा जास्तच राहत. आणि ताम्ब्याची purity कमी असली तरी थोडा तरी गुण दिसतच असेल नाही.

Moodi
Thursday, July 20, 2006 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजुबाबा नेटवर तशी माहिती मिळू शकेल, आयुर्वेदीक वैद्यांकडे पण माहिती विचारु शकता. पण हा दै. पुढारीतील लेख म्हणजे ही लिंक बघा.

http://www.pudhari.com/Archives/july06/20/Link/P-arogyaB.htm

Moodi
Thursday, July 20, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तो फिल्टर म्हणजे ते पिंप किंवा जे पाणी साठवले जाते ते भांडे म्हण पाहिजे तर, ते तांब्याचेच असते. आपण फिल्टर म्हणतो नावाला पण भांडे तांब्याचेच अन आतला रॉड हा तांब्याचा नाही सिरॅमीकचा असतो.

त्यामुळे त्यातुन गाळले गेलेले पाणी खालच्या तांब्याच्याच भांड्यात रात्रभर रहाते. मग तो फिल्टर कामाचा नाही असे कसे तू म्हणतोस?
माझ्या सासरी आहे हा तांब्याचा " फिल्टर "

संजूबाबा काही प्रॉब्लेम नाही, वापरा ते पाणी प्यायला. अन तरीही शंका असेल तर मग वैद्य किंवा डॉक्टरांना जरूर विचारा.


Sanjubaba
Friday, July 21, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, माहिती दिल्याबद्दल खुप खुप आभारी आहे.

Vasant_20
Tuesday, August 08, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

he khare aahe ki taambyachya bhandyatil paani aarogyavardhak asate.
tyane pittach tras kami hotoch parantu tyabarobar liver varahi tyache changale parinam disun yetaat.
nuktyach eka prayogamadhe aadhlun aale ki tambyachya bhandyat paani thevale tar tyatil jeev jantu nasht hoatat(80-90%) tyacha referanse aata aathvat nahi

Chetanmule9
Saturday, October 06, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

priya milindji namaskar
me punha ekda mazi janma birth time det aahe. Birth 04-01-1974
time 6.00 am.
mumbai (bandra)
me punha tumhala toch prashna vicharto ke me kuthalys grahacha khada vaparu va to kiti karet asawa va kuthalya botat ghalu

Vishee
Tuesday, October 09, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शंका आहे. (कुठे टाकावं कळेना, इथे पाणी कशातुन प्यावे या संदर्भात आहे म्हणुन विचारते.)

मध्यंतरी एक मेल वाचनात आला (सगळीकडे फिरुन आलेला) की प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीखाली (तळाला) एक नंबर असतो. तो नंबर पाच पेक्षा जास्त असावा. जर तो कमी असेल तर त्यात पाणी साठवुन पिऊ नये. cancer होतो, कारण ते plastic पाण्यात विरघळतं.

हे खरच आहे का?

हो, हा नंबर असतो प्रत्येक plastic item वर. मी पण बघितलं. तो एका triangle मधे असतो ( recycle ची खुण असते). mineral water च्या disposable bottles वर हा नेहेमी "एक" असतो. (म्हणुन म्हणतात बहुतेक ह्या बाटल्या पाणी पिउन फेकुन द्यायच्या, पुन्हा वापरायच्या नाहीत.)

म्हणुन मी मध्यंतरी अशी bottle शोधत होते (५ पेक्षा मोठा आकडा असलेली), but to my surprise सगळ्यांच्या खाली १, २, ३ च होते ( made in china )



Anilbhai
Tuesday, October 09, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वॉटर कुलर चे प्लॅस्टीक कंटेनर असतात त्यावर ७ नंबर असतो.

Chafa
Wednesday, October 10, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशी, काही प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून दीर्घकाळ पाणी पिणे खरोखर आरोग्यास हानिकारक असू शकते. विशेषतः अश्या बाटल्यांमधून रात्रभर ठेवलेल्या पाण्याला दुसर्‍या दिवशी प्लास्टिकचा वास किंवा चव येत असेल तर. मी
इथे दोन कंपन्यांच्या वेबसाईट्सच्या लिंक्स दिल्या आहेत. तिथून एखादी कायम वापरता येणारी पाण्याची बाटली विकत घेणे उत्तम!

Vishee
Wednesday, October 10, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, लिंक बघितली. त्या प्लॅस्टिकच्या bottles आहेत की steel किंवा दुसर्‍या कोणत्या metal च्या वगैरे?
मला dollar shop मधे सगळ्या तिनपेक्षा कमी नं. च्याच दिसल्या, अगदी लहान मुलांच्या स्ट्रॉ वाल्या पण. आता walmart मधनं एक आणल्येय, पाच लिहिलेली.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators