दारूचे दुकान !
गल्लीत दारूचे दुकान उघडले, आणि दुधाचा धंदाच बसला !
- ऋन्मेष
---.---.---.---.---.----.---
काल ही लघुकथा लिहिली होती. मायबोलीवर प्रकाशित केली होती. पण आज तो धागा उडाला आहे. अर्थात याला बहुधा मीच जबाबदार आहे. मलाच कमीत कमी शब्दात अपेक्षित आशय वाचकांपर्यंत पोहोचवता आला नाही. त्यामुळे काही जणांनी आपल्या मनाने अर्थ काढले आणि धाग्यावर थोडासा गोंधळ उडाला.
अर्थातच, तो धागा गोंधळ उडवण्याच्या हेतूने काढला नव्हता. दारूला विरोध करणारे माझे या आधी बरेच प्रतिसाद मायबोलीवर येऊन गेले आहेत. या धाग्यामागेही तसाच उदात्त हेतू होता. त्यामुळे धागा उडाल्याचे वाईट वाटले. म्हणून कथेचा अर्थ समजावत धागा पुनर्रजिवित करत आहे. त्या अनुषंगाने ईच्छा असल्यास चर्चाही अपेक्षित आहे.
--------------------------
कथेचा अर्थ फारच सोपा आहे.
दुधाचा धंदा बसला कारण लोकांनी आपल्या मुलांच्या दुधाचे पैसे आपल्या दारूवर खर्च करायला सुरुवात केली.
दारूचे दुष्परीणाम म्हणून आपण बरेचदा स्वास्थ्य, आरोग्य, अपघात, मारामारया, दंगे या विविध पैलूंवर जास्त चर्चा करतो.
पण दारूचा सर्वात मोठा फटका आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांना बसतो. या दारूने आयुष्यात प्रवेश केल्यानंतर त्यांचे ईतर गोष्टींचे बजेट कोलमडून पडते. व्यसनाच्या आहारी गेलेल्याला दारू ही जीवनावश्यक गरज वाटू लागते. तिला तो प्राथमिकता देतो आणि ईतर जीवनावश्यक गोष्टींना त्यापुढे दुय्यम समजले जाते. मग बायकापोरांच्या दुधाचे, कपड्यांचे, शिक्षणाचे पैसे दारूसाठी वापरले जातात. त्या पैश्यांसाठी बायकापोरांना कामाला जुंपणे, मारहाण करणे हे ही ओघानेच होते. वर कथेत उल्लेखल्याप्रमाणे कित्येक गल्ल्या, कित्येक गावं आहेत या देशात. तिथून ही किड गेल्याशिवाय या देशाचा, आपल्या समाजाचा रूट लेव्हलवर विकास होणे अशक्यच आहे !
धन्यवाद,
ऋन्मेष
ऋन्मेष,
ऋन्मेष,
४ शब्दांचा धागा काढल्यामुळे तो अप्रकाशीत केला होता. यापुढे असा धागा काढू नका.
माहिती सांगताय की,
माहिती सांगताय की,
लोकांची मते जाणून घ्यायची आहे???
म्हणजे प्रतिसाद त्या अनुषंगाने द्यायला....
एडमिन, 8 शब्द होते
एडमिन, 8 शब्द होते
यापुढे काळजी घेईन. शब्दसंख्येपेक्षाही धागा निरर्थक होत त्यातून काहीच् निष्पन्न न होणे असे घडू नये याची
कथा वा धागा सुचायचे तात्कालिक कारण असे,
गेले वर्षभर आमच्या ऑफिसजवळ एक दुकानाचा गाळा बघतोय. सर्वात पहिले तिथे हॉटेल होते. जराही चालत नव्हते. मग ते हळूहळू फास्ट फूड स्नॅक्स ते अगदी चहाखारीच्या टपरीपर्यंत आले. पण तरीही चालत नव्हतेच. एवढी मोठी जागा फुकट जात होती. तिचे भाडेही निघत नसावे. त्यानंतर मध्यण्तरी तिथे ईलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान उघडलेले पाहिले. शुकशुकाटच दिसायचा. कालाण्तराने ते ही बंद पडले. मग एवढे दिवस तो गाळा बंदच होता. पण काल संध्याकाळी ऑफिसहून परतताना तिथे मरणाची झुंबड उडालेली दिसली. काय हा चमत्कार, काही फुकट तर नाही ना वाटत आहे म्हणून उत्सुकतेने पाहिले तर तिथे वाईन शॉप उघडले होते.
ओह.. आडमिंन ने स्वतः उडवलं
ओह.. आडमिंन ने स्वतः उडवलं काय.. मला वाटलेलं एका चाहादीखोर आयदी ने चहाडी केली तुमची.. मी काल बोललं होत ना.. पांगे घेऊ नका त्या आयदी शी...
चान आहे लेख...पुलेशु
दारूची सवय सुटणे फार फार फार
दारूची सवय सुटणे फार फार फार कठीण आहे हो. अगदी खूप सुशिक्षित, चांगल्या घराण्यातले, चांगले संस्कार झालेले, सध्या चांगल्या संगतीत असलेले, सगळे काही, म्हणजे नोकरी, घर, आर्थिक व्यवस्था, सर्वांचे शरीरस्वास्थ्य उत्तम असूनहि, लोक चक्क दारुडे बनतात. तशी सवय न लागणेच महत्वाचे, नंतर काही खरे नाही.
स्वानुभव हो, दुसरे काय?
नि मग ज्यांना कष्ट करूनहि पुरेसे पैसे मिळत नाहीत, परिस्थिती सुधारण्याची काही आशा दिसत नाही, मार्ग दिसत नाही, ते वैतागून दारूच्या मागे लगेच लागतात.
स्वातंत्र्यानंतर अनेक ठिकाणी संपूर्ण दारुबंदी होती - कायद्याने. मग हाटभट्टीची, शरीरास अत्यंत धोकादायक अशी दारू कमी पैशात मिळू लागली. कायदा पोलीस काही करू शकले नाहीत - थोडासा दोष लाचलुचपतीचा होता, पण ती कुठल्या देशात नसते? रशियात, अमेरिकेत, इतर देशात सुद्धा असते. तेंव्हा कारण ते नाही.
शेवटी कंटाळून सरकारने ठरवले दारुबंदी उठवावी. निदान कर, सरचार्ज इ. लावून पैसे तरी मिळतील.
अनेक अनेक गोष्टी व्यक्तीने स्वतः करायचे ठरवले तरच होतात, सांगून, कायद्याने होत नाहीत. जगभरात खून करू नका असे सांगतात, खून करण्याविरुद्ध कायदे आहेत. होतो का उपयोग?
जगभरात खून करू नका असे
जगभरात खून करू नका असे सांगतात, खून करण्याविरुद्ध कायदे आहेत. होतो का उपयोग?
>>>>>>>>
आता असा विचार करून बघा की खून करायचे लायसन काढले की तुम्ही कोणाचाही खून करू शकता. किंवा गल्लोगल्ली सुपारी (पानातली नाही (पान वहीतले नाही)) घेऊन खून करायची दुकाने उघडली आहेत. फक्त लोकांनी कोणाचाही खून करताना स्वत:च नितीमत्ता पाळावी अशी अपेक्षा ठेवलीय. तर मग सांगा खूनांचे प्रमाण वाढेल, कमी होईल, की आहे तेवढेच्ज राहील.
दारूची सवय म्हणा किंवा
दारूची सवय म्हणा किंवा कुठलंही व्यसन म्हणा माणसाला असतेच (ह्याला कोणीच अपवाद नसतो) ... कोणाला सिगारेट तंबाखूचं असेल कोणाला पान सुपारी मावा जर्दा वगैरेचे असेल ... परिणाम तर त्याचा नेहमीच वाईट होणार असतो अशीच आपली ( व्यसनं न करणाऱ्याची ) समजूत करून दिलेली असते लहानपणापासून. पण कधी कधी .... किंवा बऱ्याचदा आपण बघतो कि लोकं दारू पितात पण ती अगदी मस्त टुणटुणीत असतात तब्येतीने... काही हॉस्पिटलायझेशन नाही ... थोडक्यात आपल्या बच्चन साहेबांचा डायलॉग खोडून काढतात कि - "दारू पिने से लिव्हर खराब होता है ... "
हीच गोष्ट वर्षानुवर्षे ... अगदी वयात आल्यापासून आजन्म तंबाखू खाणाऱ्यांच्या बाबतीत पाहिलीय कि त्यांना काही कॅन्सर झालेला नाही शेवटपर्यंत ... मग काय निष्कर्ष काढायचा ह्यावरून ? काहीतरी लॉजिक फसतय ... कुठेतरी आपलाच समजून घेण्यात झोल होतोय कि नक्की काय दुष्परिणाम फोकस करायचे !!
ज्याची जशी ऐपत तसे तो व्यसने करत राहतो आणि नंतर आर्थिक कुचंबणा सुरु झाली तरी व्यसनाचा ग्राफ मात्र त्या प्रमाणात खाली न येता सतत वाढतच राहतो आणि हाच मोठ्ठा प्रॉब्लेम घडवतो सगळ्याच स्तरावर ! उदाहरणासहित पाहायचे झाले तर ...
व्यसन १) सिगारेट
दुष्परिणाम शारीरिक -
फुफुस श्वास नलिका विकार, पण हे सगळ्यांना सारखेच लागू नाही तर प्रत्येकाच्या तब्येतीनुसार आणि प्रारब्धानुसार चढउतार दिसतो.
दुष्परिणाम आर्थिक - हॉस्पिटलाझेशन झाले तरच खरी झळ अन्यथा फार नाही
दुष्परिणाम सामाजिक - स्वतःचे बजेट घसरले कि उधारी मागण्याची सवय. मग त्यातून वाद विवाद हाणामाऱ्या वगैरे आणि आधी सुरु केलेल्या स्वताच्या प्रेस्टिजसाठीचा ब्रँड जाऊन आता तंबाखूला तंबाखू म्हणून कुठलाही स्वस्त ब्रॅण्ड मनाला पचतो ... कॉलेजमध्ये हे डिग्रेडेशन गोल्डफ्लेक किंवा मार्लबोरो पासून सुरु होऊन सम्भाजी बिडीपर्यंत पोहोचलेलेसुद्धा पाहिले आहे काही जणांच्या बाबत
मुख्य सामाजिक प्रॉब्लेम धूर ... आणि पॅसिव्ह स्मोकिंगचे वाढते पेशण्ट
बाकीची उदाहरणे अशाच स्पष्टीकरणासहित भरपूर आहेत ... आणि दुर्दैवाने आर्थिक व शारीरिक पेक्षा सर्वांचेच सामाजिक परिणामच अधिक लिहावे लागतील.
आता असा विचार करून बघा की खून
आता असा विचार करून बघा की खून करायचे लायसन काढले की तुम्ही कोणाचाही खून करू शकता.
केला विचार.
दारुच्या दुकानाला लायसनच द्यायचे नाही असे ठरवले तरी बेकायदेशीरपणे दारू विकणे, विकत घेणे चालू राहिलेच होते दारुबंदीच्या काळात. पूर्ण दारुबंदीच्या काळात दारुच्या पार्ट्या होतच होत्या. मीच कधी कधी त्यात असे. काही लोकांनी संयम ठेवला नि ते नाही बनले दारुडे माझ्यासारखे. लायसन कुणालाहि नव्हतेच, ना दारू विकत घेण्याचे ना पिण्याचे!
आता दारू पिण्याचे हि "लायसन" (परवानगी) आहे, पण तरीहि अत्यंत कमी पिणारे किंवा अजिबात न पिणारेहि असतातच. व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे.
मा़झे म्हणणे असे की व्यक्तीने स्वतःच स्वतःला मर्यादेत रहायला शिकवले पाहिजे, फार फार थोड्या लोकांना ते जमते.
विशेषतः राग! राग मर्यादेत न ठेवता आल्यामुळे कायदा असला तरी लोक खून करतात.
स्वार्थीपणा. यावर मर्यादा नसल्यास मनुष्य प्राणी कुणाचाहि खून करायला वा करवायला मागे पुढे पहात नाही.
शिक्षण, शिक्षण शिक्षण नि नुसतेच कॅटचे स्पेलिंग, कॅल्क्युलस वगैरेच्या जोडीने, संयम इ.
दारूच्या नशेमुळे माणूस (?)
दारूच्या नशेमुळे माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे उदाहरण.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maha...
वाचून मन सुन्न होते.
माणूस समोरील प्रश्नचिन्ह काढा
माणूस समोरील प्रश्नचिन्ह काढा. दारू पिण्याआधी ती व्यक्ती माणूसच असते. आणि जर आधीच जनावर असेल तर ते अश्या पातळीला जाते. ती बातमी पुर्ण वाचवली देखील नाही.
बातमी वाचून सुन्न झालो. त्या
बातमी वाचून सुन्न झालो. त्या आईविषयी आणि मुलाविषयी सुद्धा वाईट वाटले.
त्या बातमीत सेंट्रींग च्या कामाचा उल्लेख आलाय म्हणून पुढे लिहीतोय..
बांधकाम क्षेत्रात साईटवर कष्टाचं काम करणारे मजूर, स्वच्छता काम करणारे कर्मचारी (सेप्टिक टैंक उपसणे व तत्सम) यांच्यातील बहुतांश जणांना दारूचं व्यसन लागलेलं असतं. आता ते का लागत असावं किंवा त्याची कारणं हा विस्तृत विषय आहे पण त्यातील मला वाटतं गरीबी हे सर्वाधिक महत्वाचं कारण आहे. दारू ही त्यांची जगण्याची गरज असते. हे एक दुष्टचक्र आहे, 'काम होत नाही म्हणून दारू पिऊन काम करणं आणि दारूनं शरीर पोखरलं जाऊन काम न झेपणं मग पुन्हा दारू पिऊन काम करणं'
कुठल्याही प्रकारच्या दारूचं मी समर्थन करत नाही तसेच दारूचा न् माझा आजवर कधीही प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध आलेला नाही; प्रत्यक्ष तर कधी येणारही नाही पण 'त्या' कष्टकरी मजूरांचं (जे ऑलरेडी पिताहेत) मी समर्थन करेल. कारण रोजची रोजीरोटी मिळवायला कष्ट करावेच लागतात आणि त्यासाठी काम झेपत नाही म्हणून प्यावंच लागतं हे वास्तव आहे, जे नाकारता येणार नाही.
काम झेपत नाही म्हणून प्यावंच
काम झेपत नाही म्हणून प्यावंच लागतं हे वास्तव आहे,
>>>>
गटार सफाई करायला आत उतरावे लागत असेल तर तो वास झेपायला मारूनव्ह उतरावे लागते असे मागे ऐकले होते.
पण बाकी अंगमेहनतीचे कोणते काम झेपायला दारूने शक्ती येते?
आणि दारू तर बुद्धीजिवी वर्गही पितोच.
पण बाकी अंगमेहनतीचे कोणते काम
पण बाकी अंगमेहनतीचे कोणते काम झेपायला दारूने शक्ती येते? >>>
मी शक्ती येती हे म्हटलो नाही.
अनेक असे मजूर असतात ज्यांचे लहानपणापासून शारीरिक कुपोषण झालेले असते. प्रचंड गरीबीमुळे, अशिक्षितपणामुळे त्यांना कष्टाचं काम करावं लागतं. ते झेपत नसतं, नशेमध्ये असताना मात्र केलं जातं. असं का होत असावं हे मला सांगता येणार नाही. 'कष्टांची जाणिव दारू पिवून विसरली जात असावी.'
म्हणजे दारू हे पेन किलरचे काम
म्हणजे दारू हे पेन किलरचे काम करते का? शारीरीक कि मानसिक कि दोन्ही?
म्हणजे दारू हे पेन किलरचे काम
म्हणजे दारू हे पेन किलरचे काम करते का? शारीरीक कि मानसिक कि दोन्ही? >>>
मी पिलो नाही, मला माहीत नाही!
माझे प्रत्यक्ष बघितलेल्या गोष्टींवर आधारीत बनलेली मतं असतात.
माझ्याकडे एक व्यक्ती कामाला येतो. चांगला कारागिर माणूस आहे. त्याला मी एकदा सांगितलं पिऊन कामावर येऊ नकोस. चांगला पगार मिलतोय तुला, पितोस का? त्यावर त्यानं सांगितलं, 'साहेब, पिलो नाही तर मी कामच करू शकत नाही. आणि जगूही शकत नाही.'
हे प्रातिनिधिक म्हणून एक उदाहरण सांगितलं. अशी भरपूर उदाहरणे माहित आहेत.
साहेब, पिलो नाही तर मी कामच
साहेब, पिलो नाही तर मी कामच करू शकत नाही. आणि जगूही शकत नाही.'
>>>>>>
पिण्याआधीही तो जगायचाच ना
आणि कामही करत असेलच. कारण काम शिकताना पिऊन शिकला नसेल.
तर सांगायचा मुद्दा हा, एक म्हणजे हे मानसिक असते. आणि दुसरे म्हणजे दारू हा अंमली पदार्थ आहे, ते एक रसायन आहे, ते तुम्हाला व्यसन लावतो, दारू घश्यात उतरल्याशिवाय तुम्हाला काही सुचतच नाही किंवा आयुष्य निरर्थक वाटू लागते. पण प्रत्यक्षात आयुष्यातला पहिला पेग घ्यायच्या आधीही तुमचे आयुष्य होतेच. कोणीतरी तुमच्या मनात भरवते (किंवा आजूबाजूचे बघून आपले आपण गैरसमज होतो) की दारू पिणे हे तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्यूशन आहे. गरीबांचा मुख्य प्रॉब्लेम गरीबी असते ईतकेच. प्रत्यक्षात श्रीमंतांमध्येही दारू प्यायली जातेच. त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात ईतकेच. आणि हो, दारूच्या दर्ज्यातही फरक असतो. गरीबांची हलक्या दर्जाची आणि जोरदार किक देणारी असते. श्रीमंतांची जीभेवर चव घोळवत प्यायची असते. काम मात्र तेच करते. म्हणून तर ऊंची दारू पिणारे आपल्या कारखाली लोकांना चिरडतात..
हे सगळे किती प्रमाणात पिता
हे सगळे किती प्रमाणात पिता यावर अवलंबून आहे. कुठली दारू पिता यावरहि अवलंबून आहे. अधून मधून घेतल्याने काही बिघडत नाही.
काही लोक 30 चा एक पेग घेतात..
काही लोक 30 चा एक पेग घेतात...काही चढत नाही..काही कळत नाही... thats waste...
काही लोक इतकी पितात की लोळयाला लागतात.. पितात त्याची मजा घेऊ शकत नाहीत...thats waste too
माझ्या मते इतकी पिली पाहिजे की थोडा स हलका सुरुर चढला पाहिजे,हलकी हलकी चढतेय आणी कळतेय पण -त्यात जी मजा आहे ती अनुभवल्याशिवाय कळू शकते नाही...
कुठली दारू पिता यावरहि
कुठली दारू पिता यावरहि अवलंबून आहे.
>>>>>>>
उदाहरणार्थ?
कुठली दारू तुमच्या मेंदूचा ताबा घेत नाही हे सांगाल का?
एडमिन, 8 शब्द होते>>>
एडमिन, 8 शब्द होते>>>
हाये कंबखत तुने पी ही नही !!
हाये कंबखत तुने पी ही नही !!
शिळ्या दारुला उकळि? बाकि विशय
शिळ्या दारुला उकळि? बाकि विशय सम्पले का?
हाये कंबखत तुने पी ही नही !!
हाये कंबखत तुने पी ही नही !! >>>
<दारू हा अंमली पदार्थ आहे, ते
<दारू हा अंमली पदार्थ आहे, ते एक रसायन आहे, ते तुम्हाला व्यसन लावतो, दारू घश्यात उतरल्याशिवाय तुम्हाला काही सुचतच नाही किंवा आयुष्य निरर्थक वाटू लागते.>
हे काय वाट्टेल ते या प्रकारातले आहे..
पुंबा +786
पुंबा +786
हीच गोष्ट वर्षानुवर्षे ...
हीच गोष्ट वर्षानुवर्षे ... अगदी वयात आल्यापासून आजन्म तंबाखू खाणाऱ्यांच्या बाबतीत पाहिलीय कि त्यांना काही कॅन्सर झालेला नाही शेवटपर्यंत ... मग काय निष्कर्ष काढायचा ह्यावरून ? काहीतरी लॉजिक फसतय ..
खरच काहीतरी लॉजिक फसतयं. कारण मी अशा एका व्यक्तीला बघितले आहे कि त्याला कुठलेही व्यसन न्हवते. होते ते फक्त देवाच्या नामस्मरणाचे. कायम देवपोजा आणि त्या बद्दल बरीच माहीती असणारा माणूस. पण याच व्यक्तीला तोंडाचा कॅन्सर झाला आणि सहा महिन्यात जीवनाचा अंत झाला. या ऊलट जे लोक तंबाखूचा तोबरा कायम तोंडात ठेवतात ते मात्र ठणठणीत दिसतात.
कारण मी अशा एका व्यक्तीला
कारण मी अशा एका व्यक्तीला बघितले आहे कि त्याला कुठलेही व्यसन न्हवते. होते ते फक्त देवाच्या नामस्मरणाचे. कायम देवपोजा आणि त्या बद्दल बरीच माहीती असणारा माणूस. पण याच व्यक्तीला तोंडाचा कॅन्सर झाला आणि सहा महिन्यात जीवनाचा अंत झाला.
>>>>>>>
यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की जगात देव नाहीये
बाकी तंबाखूचे माफक प्रमाणात सेवन फारशी हानी पोहोचवत नाही. माझ्या पणजोबांनाही हलकेच चुना लावून थोडासा तंबाखू टाकून पान चघळायचा शौक होता. सेंच्युरी मारून गेले.
पण तेच गुटखा खाणारे ऐन जवानीत सडून सडून मेलेले पाहिलेत.
बाकी तंबाखूचे माफक प्रमाणात
बाकी तंबाखूचे माफक प्रमाणात सेवन फारशी हानी पोहोचवत नाही.
>>>आपल्याला हे अगाध ज्ञान कुणी दिले.मी दिवसाला फक्त चार सिगरेटी फुकतो पण छातीचा खोका झाला आहे माझ्या.कृपया गैरसमज पसरवू नयेत.
कारण मी अशा एका व्यक्तीला
कारण मी अशा एका व्यक्तीला बघितले आहे कि त्याला कुठलेही व्यसन न्हवते. होते ते फक्त देवाच्या नामस्मरणाचे. कायम देवपोजा आणि त्या बद्दल बरीच माहीती असणारा माणूस. पण याच व्यक्तीला तोंडाचा कॅन्सर झाला आणि सहा महिन्यात जीवनाचा अंत झाला.
>>>>>>>
यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की जगात देव नाहीये >>>
कैच्या कै लॉजिक!
मी तंबाखू बद्दल बोल्लो, ते
मी तंबाखू बद्दल बोल्लो, ते खाऊन लोकं थुकायचे. सिगारेटचा धूर लोकं आत घेतात आणि वर जातात.
तसेच तंबाखूचे माफक प्रमाणा म्हटलेय. म्हणजे आठवड्याला कधीतरी एकदा तंबाखूचे पान चघळले आणि थुकले.
सिगारेटबाबत दिवसाला चार हे प्रमाण अफाट आहे. जरी तुम्ही त्यापुढे फक्त जोडले तरी चार सिगारेट म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, टी आणि डिनर अश्या चारही वेळी सिगारेट हे प्रमाण फक्त नाहीये.
Pages